नंदुरबार – ईद मिलाद व गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन; आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा…
Anc – आगामी ईद मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख सण उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा राखत शांततेत साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि नागरिक या बैठकीस उपस्थित होते.बैठकीत आगामी सणांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था, धार्मिक कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. ईद मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण परस्पर बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढविणारे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. सणांच्या काळात अफवा, गैरसमज अथवा वादग्रस्त बाबींना खतपाणी घालणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेशांपासून नागरिकांनी दूर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश, फोटो, व्हिडिओ अथवा पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला. नागरिकांनी सोशल मीडियावर कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,नंदुरबार जिल्ह्यातील शांततेची आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ईद मिलाद आणि गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा न देता साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले… Byte – अश्विनी सानपपोलीस अधीक्षक...
Read More


