Category: इतर

नंदुरबार – ईद मिलाद व गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन; आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा…

Anc – आगामी ईद मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख सण उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा राखत शांततेत साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि नागरिक या बैठकीस उपस्थित होते.बैठकीत आगामी सणांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था, धार्मिक कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. ईद मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण परस्पर बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढविणारे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. सणांच्या काळात अफवा, गैरसमज अथवा वादग्रस्त बाबींना खतपाणी घालणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेशांपासून नागरिकांनी दूर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश, फोटो, व्हिडिओ अथवा पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला. नागरिकांनी सोशल मीडियावर कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,नंदुरबार जिल्ह्यातील शांततेची आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ईद मिलाद आणि गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा न देता साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले… Byte – अश्विनी सानपपोलीस अधीक्षक...

Read More

नंदुरबारमध्ये अजब कारभार! ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानाच्या प्रमाणपत्रावर चक्क ‘४० तारीख’!” “कॅलेंडरचे नियम बदलले का?

नंदुरबार येथील प्रसिद्ध ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानाच्या पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्रावर चक्क ‘४० तारीख’ टाकण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नियमांनुसार खाद्यपदार्थांच्या दुकानांना कीटक नियंत्रण म्हणजेच पेस्ट कंट्रोल करणे बंधनकारक असते. मात्र, हे प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित एजन्सीने किंवा कर्मचाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठत कॅलेंडरमध्ये अस्तित्वातच नसलेली ‘४० तारीख’ प्रमाणपत्रावर लिहून दिली आहे. या अजब कारभाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत”कॅलेंडरमध्ये महिना ३० किंवा ३१ दिवसांचा असतो, हे अगदी लहान मुलालाही माहिती असतं. फार-फार तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होतो. पण मित्रांनो, तुम्ही कधी ‘४० तारीख’ ऐकली आहे का? आश्चर्य वाटेल, पण नंदुरबारमध्ये चक्क ‘४० तारीख’ अस्तित्वात आल्याचे समोर आले आहे!नंदुरबार शहरातील एका प्रसिद्ध ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानात हा अजब आणि चक्रावून टाकणारा प्रकार पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी या कुल्फी दुकानदाराने आपल्या दुकानात पेस्ट कंट्रोल करून घेतले. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या एजन्सीने त्यांना रीतसर प्रमाणपत्रही दिले. मात्र, हे प्रमाणपत्र देताना संबंधित कर्मचाऱ्याने त्यावर पुढील पेस्ट कंट्रोल करण्याची तारीख चक्क ‘४० तारीख’ लिहून दिली!””आता कॅलेंडरच्या नियमांनाच आव्हान देणारी ही ‘४० तारीख’ नेमकी आली कुठून? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दुकानदार आणि प्रशासकीय तपासणी करणाऱ्या यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या या प्रमाणपत्राचा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर मीम्स बनवायला सुरुवात केली असून, ‘या महिन्यात पगाराचे ४० दिवस मोजावे लागणार का?’ अशी विचारणा केली जात आहे.””महत्त्वाची प्रमाणपत्रे जारी करताना किंवा त्यावर सह्या-शिक्के मारताना संबंधित...

Read More

Navapur:-ऑर्डर घेत असताना युवकावर चाकूने हल्ला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

*नवापूर -नवापूर तालुक्यातील धडधड्या येथे दुकानावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ऑर्डर घेत असलेल्या युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. कृणाल गोसावी, नामक युवक गोपाल वेफर्स नवापूर येथे ऑर्डर घेण्याचे काम करतो. जुन्या किरकोळ वादातून *कमलेश गोसावी, विशाल गोसावी, सुमित गोसावी, अक्षय बंजारा* अशी 4 ते 5 मुलांनी कृणाल यांच्या छातीवर धारदार चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. कृणाल यांनी हात आडवा घालून व धक्का देऊन जीव वाचवला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या पायाला चाकू लागून 2 टाके पडले आहेत. या प्रकरणी *नवापूर पोलीस ठाण्यात BNS कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत. या संदर्भात आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिडितकडून करण्यात आली...

Read More

नंदुरबार :- विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा होणार; नंदुरबार पोलिसांचा चोख बंदोबस्त,आदिवासी बांधवांचे पोलिसांकडून स्वागत; शस्त्रे व आक्षेपार्ह साहित्य न आणण्याचे आवाहन…

9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस सर्वत्र साजरा करण्यात येती.विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात तसेच शहरात उत्साहाचे वातावरण असून, हा दिवस शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम, रॅली आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात येणाऱ्या आदिवासी बांधवांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवत हा दिवस उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने मिरवणुकीत अथवा कार्यक्रमस्थळी शस्त्रे, धारदार वस्तू किंवा इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये आणि कोणालाही दुखापत होऊ नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.तसेच सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कायद्याचे पालन करावे आणि शांततेत हा दिवस साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे….Byte – अश्विनी सानप पोलीस अधीक्षक...

Read More

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण: भाजप नेते विजय चौधरी जिल्हा रुग्णालयात दाखल

नंदुरबार व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले भाजप नेते विजय चौधरी यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. विजय चौधरी यांच्या विरोधात दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासा दरम्यान न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय चौधरी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून उपचार व निरीक्षण सुरू आहे. दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणात पुढील तपासा दरम्यान काय निष्पन्न होते याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले...

Read More

शिरपूर आगाराच्या एसटी ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्वागत !

धुळे विभागातील शिरपूर आगारात आज नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून सेवेला शुभारंभकरण्यात आला या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात...

Read More

नंदुरबार – सिताखाई पॉईंटवर तरुण 3 हजार फुटावर अडकला …

तोरणमाळच्या सीताखाई पॉईंटवर झिप लाईनचा अनुभव घेण्यासाठी उतरलेला तरुण मध्येच अडकला यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटवर झिप लाईनवर अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली. तोरणमाळच्या सिताखाई पॉईंटवर असलेल्या 3 हजार 500 फूट खोल दरीवर पर्यटकांच्या साहसी खेळासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या झिप लाईनवर एका पर्यटकाचा थरारक अनुभव घेण्याचा प्रयत्न असतानाच पर्यटक झिप लाईनवरून जात असताना अचानक तांत्रिक अडचणीमुळे तो दरीच्या मध्यभागीच अडकला. यामुळे परिसरात काही काळ मोठा थरार आणि घबराट पसरली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून झिप लाईनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अतिशय कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश...

Read More

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करा -आ. डॉ. गावित समर्थकांची मागणी…

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याबद्दल अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली नंदुरबारच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी आ डॉ विजयकुमार गावित व त्याच्या कुटुंबियांवर खोटे आरोप करत अपशब्द वापरत असल्याचे ऐकायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला. जिल्ह्याच्या विकासात डॉ. गावित यांचे मोठे योगदान असताना त्यांचा अपमान करणे निंदनीय असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महामंत्री विजय चौधरी यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यासह गुन्हा नोंदवावा अशी लेखी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन सादर केले आहे . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील , नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते हिरालाल चौधरी, अविनाश माळी ,माजी जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे ,सागर तांबोळी ,नगरसेवक चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी यांच्या सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेमध्ये तीव्र संताप असून प्रसंगी जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे… Byte -दीपक...

Read More

डिजिटल स्मार्ट मीटरमुळे अवाजवी बिल,जुने मीटर पुन्हा बसवण्याची शिवसेना-युवासेनेची मागणी

जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून बसविलेल्या डिजिटल स्मार्ट मीटरमुळे सामान्य नागरिकांना अवाजवी वीज बिल आणि वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांना निवेदन देण्यात आले. युवासेना उपजिल्हाअधिकारी दिनेश भोपे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात म्हटले की, डिजिटल मीटर बसवल्यापासून घरगुती व शेतकरी ग्राहकांना मागील बिलाच्या तुलनेत 2 ते 3 पट जास्त बिल येत आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यात यामुळे आर्थिक समस्या वाढल्या आहेत. म्हणून डिजिटल मीटर तात्काळ काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, बिले तात्पुरती स्थगित करावीत आणि वीज खंडित करण्यापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे. या प्रश्नाची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर डिजिटल मीटर फोडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख *पंडित माळी*, युवासेना जिल्हाधिकारी *सागर पाटील*, *रमेश पाटील, सुनील सोनार, दिनेश सोनवणे* आदी पदाधिकारी उपस्थित...

Read More

गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिना निमित्ताने कार्यक्रम उत्साहात संपन्न

नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क ब चौ उमवि जळगाव डॉ एम जे रघुवंशी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ॲड. पी एन देशपांडे सर होते. यावेळी ॲड पी एन देशपांडे सरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जागतिक लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे म्हणून बेरोजगारी महागाई वाढत आहे. नोकरी मिळणे कठीण झाले आहे म्हणून युवकांनी स्वयं रोजगाराकडे वळावे असा मौलिक सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम जेरघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक लोकसंख्या वाढीमुळे कमी जागेत जास्त उत्पन्न घेत असल्यामुळे विविध रसायनांचा वापर होतो आणि त्यामुळे शेतीचा ऱ्हास होत आहोत असे सांगून एकत्र कुटुंब पद्धतीने मुलांमध्ये कशी संस्कारांची रुजवणूक होते याबद्दल मार्गदर्शन करतांना कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आपण आदर करावा असे आवाहन केले. ज्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एम आर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डी ए पाटील उपस्थित होते तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ अमोल भुयार यांनी केली तर सूत्रसंचालन प्रा एम बी पाटील यांनी केले तर आभार प्रा मोईन शेख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ एफ आर खांडेकर डॉ दिनेश देवरे प्रा एम जी पाटील डॉ संजय कपले डॉ संदीप भावसार मनीष सावंत प्रा गंगाराम वसावे डॉ डी एस पाटील ,श्री पिंपळे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक प्राध्यापके तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित...

Read More

धुळ्यात एलसीबीची मोठी कारवाई: तब्बल १२ किलो गांजा हस्तगत करत दोन जणांना ठोकल्या बेड्या

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अमली पदार्थ तस्करांविरोधात एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरात बेकायदेशीरपणे गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. दोन इसम एका ॲक्टिवा दुचाकीवरून (क्रमांक MH-18/BK-0311) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची विक्री करण्यासाठी डी.मार्ट जवळील विश्वकर्मा भवन येथे येत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोउनि अमित माळी व त्यांच्या पथकाने विश्वकर्मा भवन परिसरात सापळा रचला. संशयास्पद वाटणाऱ्या त्या दोन तरुणांना थांबवून राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच आणि फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत त्यांची झडती घेण्यात आली.या झडतीदरम्यान पोलिसांना त्यांच्या ताब्यातील गोणीत तब्बल १२ किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.याप्रकरणी आरोपींविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात NDPS (अंमली पदार्थ विरोधी) कायद्यांतर्गत गु.र.नं. २०९/२०२६ नुसार कलम ८(क), २०(ब), २(क), २२(क) आणि २९ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अंमलदार आरिफ पठाण, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील व सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. धुळे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Nandurabar:नंदुरबारच्या शुभम पार्कमध्ये मध्यरात्री चोरट्यांची टोळी; नागरिकांमध्ये भीती

११ ऑगस्टच्या मध्यरात्री साडे दोन वाजता शुभम पार्क परिसरात काही संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्या. त्यावेळी कॉलनीतील एक व्यक्ती जागी झाली होती. त्याच व्यक्तीच्या घराच्या दिशेने एक संशयित व्यक्ती आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागून आणखी दोन जण आल्याचे दिसून आले. काही वेळ परिसरात हालचाल केल्यानंतर हे संशयित तेथून निघून गेले. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही साधारण ८ ते १० जणांची चोरट्यांची टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या हातात हत्यारे असल्याचेही सांगण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शुभम पार्क परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती...

NANDURBAR NEWS:-फरशी पुलाचे काम ठरले शेतकऱ्यांसाठी संकट; लोये परिसरातील शेते पाण्याखाली

नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील लोये गावाजवळ फरशी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने नाल्याला पूर आला असून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकांसह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी भरल्याने शेताचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा मोठ्या पाईपची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महसूल विभाग आणि कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ऑनलाइन पूर्वसूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील, याची काळजी घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली...

NANDURBAR BREAKING: लायन्स क्लब नंदुरबारचा मोठा पुढाकार; नगरपालिकेचा बेघर वृद्धाश्रम एक वर्षासाठी घेतला दत्तक!

नंदुरबार शहरातून एक अत्यंत सकारात्मक आणि माणुसकीला उजाळा देणारी बातमी समोर येत आहे. ‘सेवा परमो धर्म:’ हाच संदेश देत ‘लायन्स क्लब नंदुरबार’ने शहरात सामाजिक सेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. गरजूंना अन्नदान करण्यासोबतच, क्लबने आता बेघर आणि निराधार वृद्धांनाही मायेचा आधार दिला आहे.भुकेलेल्यांना अन्न देणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. हाच वसा हाती घेत लायन्स क्लब नंदुरबार तर्फे शहरात अविरत अन्नदान उपक्रम राबविला जात आहे. नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि सायंकाळी, अशा दोन्ही वेळेस मोफत अन्नदान केले जाते. एवढेच नव्हे, तर ‘निम्स’ हॉस्पिटल या ठिकाणीही सायंकाळच्या वेळी गरजूंना भोजन पुरविले जात आहे.या अवाढव्य आणि निरंतर चालणाऱ्या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची आवश्यकता भासत असते. याच पार्श्वभूमीवर, लायन्स क्लब नंदुरबारने शहरातील सर्व दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आपल्या हक्काच्या शहरातील कोणीही भुकेलेला झोपू नये, यासाठी नागरिकांनी या अन्नदान यज्ञामध्ये सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक क्लबचे अध्यक्ष, सचिव किंवा कोणत्याही सदस्याशी थेट संपर्क साधू शकतात.लायन्स क्लबचे सामाजिक कार्य इथेच थांबत नाही, तर त्यांनी आणखी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. नंदुरबार नगरपालिकेकडून चालविला जाणारा ‘बेघर व निराधार आधार वृद्धाश्रम’ लायन्स क्लबने पुढील एक वर्षासाठी पूर्णपणे दत्तक घेतला आहे.आता या वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्व गरजू आणि बेघर ज्येष्ठ नागरिकांना लायन्स क्लबतर्फे दोन्ही वेळचे सकस जेवण, चहा आणि नाश्ता दिला जाणार आहे. केवळ अन्नच नव्हे, तर त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत वैद्यकीय सुविधाही मोफत पुरविल्या...

“ब्रेकिंग न्यूज: चांदसैली घाटात भीषण दरड कोसळली; तळोदा-धडगाव संपर्क तुटला!”

सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण दरड कोसळली आहे. घाटातील माकड टेकडीजवळ ही मोठी दुर्घटना घडली असून, रस्त्यावर भलेमोठे दगड आणि मातीचा ढीग आलाय. यामुळे तळोदा-धडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी तब्बल ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.”नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात माकड टेकडीजवळ अचानक डोंगराचा कडा कोसळला. रस्त्यावर आलेले भलेमोठे दगड आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे या मार्गावरील वाहतूक शंभर टक्के ठप्प झाली आहे.घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन वसावे, कनिष्ठ अभियंता सुधाकर चौरे आणि पोलीस कर्मचारी अजय पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रस्त्यावरील दगडांचा आकार प्रचंड मोठा असल्याने आणि पाऊस थांबत नसल्याने हा रस्ता तातडीने सुरू करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान ४ ते ५ दिवस लागतील असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लहान वाहनांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा ‘अलर्ट’ अजूनही कायम असल्याने, प्रशासनाने नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घाटमार्गावरील प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे.””तर ही होती चांदसैली घाटातील दरड कोसळल्याची थेट अपडेट. आमचे प्रेक्षक आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आमचे आवाहन आहे की, पुढील काही दिवस चांदसैली घाटमार्गाने प्रवास करणे टाळा आणि...

NANDURABAR – दीड महिन्यानंतर समादीड महिन्यानंतर समाधानकारक पाऊस, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा…

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पिकांनाही मोठा फटका बसला होता. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या भागात आता पिकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड महिन्याच्या कोरड्या कालावधीनंतर झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणही आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला...

Loading

क्राईम

Latest

धुळे:- कॉलेजांसमोर हिरोगीरी करणाऱ्यांवर कारवाई पोलीसांनी कॉलेज बाहेर काढायला लावल्या “उठाबशा”

धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे शहर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच जे.आर. सिटी हायस्कूल परिसरात विनाकारण वावर करणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संबंधित युवकांकडून २५ उठाबश्या काढून घेत त्यांना समज देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा टवाळखोरी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने...

नंदुरबार – slug – गावित कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह भाषा : भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल…

Anc – माजी आदिवासी विकास मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत विजय चौधरी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. गावित कुटुंबीयांबद्दल केलेल्या अपशब्दांमुळे पक्षाच्या आणि जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल ऑडिओ क्लिपची तपासणी केल्यानंतर विजय चौधरी यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेमुळे नंदुरबार मधे राजकीय खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. Byte – सतीश गायकवाडउपविभागीय पोलीस...

Read More

शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू….

शिंदखेडा (प्रतिनिधी): शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकरी दगा लक्ष्मण सोनवणे यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दगा लक्ष्मण सोनवणे हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांना विषारी सर्पाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि डॉ. तेजस जैन यांनी त्यांना मृत घोषित केले.कै, दगा लक्ष्मण सोनवणे यांना दोन मुल एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे कर्ले गावावर शोककळा पसरली असून, शेतकऱ्याच्या अकाली निधनाने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये दुःखाचे वातावरण...

Read More

प्रकाशा सिंहस्थ पर्वणीसाठी १२७ कोटींच्या विशेष निधीची मागणी; मंत्री हसन मुश्रीफ यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्रात २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ पर्वणी अर्थात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी १२७ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात प्रकाशा हे तापी, गोमाई आणि पुलिंदा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले महाराष्ट्रातील प्राचीन तीर्थक्षेत्र असून “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केदारेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर, पुष्पदंतेश्वर आणि मनसापुरी देवीची मंदिरे तसेच सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवकालीन ऐतिहासिक वारसा या क्षेत्राचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतात. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ पर्वणीत मागील वेळी सुमारे दहा लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती. यंदा २० ते २५ लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर घाट, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, नदी संवर्धन, वाहनतळ, निवास व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षा, प्रकाश व्यवस्था आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी तातडीने करण्याची आवश्यकता निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. याशिवाय त्रिवेणी संगमाचा विकास, प्राचीन मंदिरांचे संवर्धन, नद्यांचे सुशोभीकरण आणि वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी “प्रकाशा कॉरिडॉर” विकसित करण्याचाही प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ पर्वणीसाठी आवश्यक विकासकामांचा सविस्तर आराखडा तयार करून १२७ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली असून, हा निधी मंजूर झाल्यास भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासोबतच प्रकाशा तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला...

Read More

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहने

*अग्निशमन आपत्कालीन सेवेचे बळकटीकरणासह सक्षमीकरण* नंदुरबार (प्रतिनिधी)- अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहन नगर विकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे दिली आहे. अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्यासाठी व या सेवेचा सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने अग्निसुरक्षा अभियान राबविण्याचे निर्णय शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे. नंदुरबार शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता अग्निशमन वाहनाची गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नगर विकास विभागाकडे वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावाही केला होता. आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मागणीची दखल घेत अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला ९० लाखाचे १ अशा २ वाहनांना १ कोटी ८० लाखाच्या निधी मंजूर केला आहे. नंदुरबार शहराच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळेवर उपाययोजना करण्यासाठी नगर विकास विभागाकडे अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असता नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहनांना मंजुरी मिळालेली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. – आमदार चंद्रकांत...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!