दिल्लीतील जंतर मंतरवर NEET पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी ने आज रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा ने जाहीर पाठिंबा दिला. बंदच्या समर्थनार्थ नंदुरबार येथे तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. लाठीचार्जमध्ये अटक झालेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका, मृत विद्यार्थ्यांना शहीदाचा दर्जा व 1 कोटी नुकसान भरपाई, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत आणि पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच बीजेपी-आरएसएस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. विक्रम गावित म्हणाले, हे सरकार आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहे. नंदुरबार जिल्हा वंचितच्या बंदमध्ये पूर्णपणे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कॉ. रंजीत गावित, कॉ. करणसिंग कोकणी, कॉ. मनोहर वळवी, कॉ. राजेश वळवी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
