Category: चालू घडामोडी

Nandurabar:नंदुरबारच्या शुभम पार्कमध्ये मध्यरात्री चोरट्यांची टोळी; नागरिकांमध्ये भीती

११ ऑगस्टच्या मध्यरात्री साडे दोन वाजता शुभम पार्क परिसरात काही संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्या. त्यावेळी कॉलनीतील एक व्यक्ती जागी झाली होती. त्याच व्यक्तीच्या घराच्या दिशेने एक संशयित व्यक्ती आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागून आणखी दोन जण आल्याचे दिसून आले. काही वेळ परिसरात हालचाल केल्यानंतर हे संशयित तेथून निघून गेले. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही साधारण ८ ते १० जणांची चोरट्यांची टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या हातात हत्यारे असल्याचेही सांगण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शुभम पार्क परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती...

Read More

नंदुरबार – शाळा परिसरात माकडाचा धुमाकूळ, वन विभागाचे दुर्लक्ष,विद्यार्थी-शिक्षक भयभीत…..

शहरातील डी आर हायस्कूल व डॉक्टर काणे प्राथमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूल शाळा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. हे माकड दिवसभर शाळेच्या आवारात फिरत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार सूचना देऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आज पुन्हा शाळेत माकडाने उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर माहिती मिळताच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पिंजरा सोबत आणला असतानाही तो लावण्यातच आला नाही त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शाळा परिसरात लहान मुले असल्याने माकड कोणावरही हल्ला करू शकते, अशी भीती पालक आणि शिक्षकांना आहे. गेल्या 3 दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माकड दिवसभर वर्गांजवळ, टाकीवर आणि झाडांवर फिरत असते. आम्हाला मुलांना सांभाळणे कठीण झाले आहे. वन विभागाने तात्काळ माकडाचा बंदोबस्त करावा. शाळा परिसरातील माकडाचा प्रश्न तातडीने सोडवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. Byte – घनश्याम...

Read More

इनंदुरबार – डिजीटल वीज मीटर प्रकरणी शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक,अधीक्षक अभियंत्यांना घेराव, 8 दिवसात कारवाई न झाल्यास गावबंद आंदोलन…

जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना डिजीटल वीज मीटरमुळे २ ते ३ पट जास्त बिले येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांना घेराव घातला.आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाढीव बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. ठेकेदारांनी परवानगी न घेता शासनाचा धाक दाखवून डिजीटल मीटर बसवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी डिजीटल मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत,डिजीटल मीटरच्या आधारे येणारी वीजबिले तोपर्यंत थांबवावीत ,रात्री अपरात्री होणारी वीज कपात थांबवावी , लेखी वीजबिल घरोघरी पोहोचवण्याची जुनी व्यवस्था सुरू करावीयेत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यात एक दिवस जिल्हा बंद करून कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी, महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, बापू महाजन, दिनेश भोपे, ईम्तियाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते… Byte – रीना पाडवीमहिला...

Read More

नंदुरबार – slug – गावित कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह भाषा : भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल…

Anc – माजी आदिवासी विकास मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत विजय चौधरी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. गावित कुटुंबीयांबद्दल केलेल्या अपशब्दांमुळे पक्षाच्या आणि जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल ऑडिओ क्लिपची तपासणी केल्यानंतर विजय चौधरी यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेमुळे नंदुरबार मधे राजकीय खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. Byte – सतीश गायकवाडउपविभागीय पोलीस...

Read More

नीट पेपर फुटी आंदोलनाला यश, शिवसेना उबाठा पक्षाचे विद्यार्थ्यांसोबत आनंदोत्सव….

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे नंदुरबारमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील नेहरू चौकात संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी पेढे आणि चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला तसेच पेपरफुटीविरोधी घोषणाबाजी केली.यावेळी बोलताना गुलाबराव वाघ यांनी नीटसारख्या राष्ट्रीय परीक्षेतील पेपरफुटी हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला गंभीर विश्वासघात असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला कारवाई करावी लागली असून हा विद्यार्थी शक्तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात जिल्हाप्रमुख पंडित माळी, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाटील ,महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे सह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…Byte – पंडित माळी जिल्हाप्रमुख...

Read More

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचितच्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर मंतरवर NEET पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी ने आज रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा ने जाहीर पाठिंबा दिला. बंदच्या समर्थनार्थ नंदुरबार येथे तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. लाठीचार्जमध्ये अटक झालेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका, मृत विद्यार्थ्यांना शहीदाचा दर्जा व 1 कोटी नुकसान भरपाई, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत आणि पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच बीजेपी-आरएसएस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. विक्रम गावित म्हणाले, हे सरकार आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहे. नंदुरबार जिल्हा वंचितच्या बंदमध्ये पूर्णपणे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कॉ. रंजीत गावित, कॉ. करणसिंग कोकणी, कॉ. मनोहर वळवी, कॉ. राजेश वळवी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित...

Read More

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहने

*अग्निशमन आपत्कालीन सेवेचे बळकटीकरणासह सक्षमीकरण* नंदुरबार (प्रतिनिधी)- अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहन नगर विकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे दिली आहे. अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्यासाठी व या सेवेचा सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने अग्निसुरक्षा अभियान राबविण्याचे निर्णय शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे. नंदुरबार शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता अग्निशमन वाहनाची गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नगर विकास विभागाकडे वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावाही केला होता. आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मागणीची दखल घेत अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला ९० लाखाचे १ अशा २ वाहनांना १ कोटी ८० लाखाच्या निधी मंजूर केला आहे. नंदुरबार शहराच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळेवर उपाययोजना करण्यासाठी नगर विकास विभागाकडे अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असता नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहनांना मंजुरी मिळालेली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. – आमदार चंद्रकांत...

Read More

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताचे भान जपत भारतीय स्टेट बॅंक एस.सी., एस.टी., बी.सी. कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना भारतीय स्टेट बॅंक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. गणेश वाघमारे, प्रेसिडेंट श्री. राकेश कांबळे, असिस्टंट जनरल सेक्रेटरी डॉ. मनोज पिंपळे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश पाटील आणि सरचिटणीस श्री. अमोल शिंदे यांची होती. या शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या यशस्वी आयोजनासाठी श्री. उल्हास लांडगे, श्री. प्रवीण देवरे, श्री. आनंदराव करनकाळ, श्री. दीपक सोनवणे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. वसंत पाटील, श्री. रावसाहेब पाटील, श्री. संजय बाविस्कर, श्री. बापू साळवे, श्री. नागसेन पेंढारकर, श्री. मनेश बिरारे आणि श्री. हरलाल मोरे यांचे विशेष योगदान लाभले. या शिबिराच्या नियोजनात श्री. देवेंद्र बोरसे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे संयोजन, समन्वय व प्रचार या बाबींचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमात अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केले. सामाजिक एकोपा, जबाबदारी आणि बांधिलकीचे दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काही तरी चांगले करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या रक्तदान शिबिराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. आयोजकांच्या सहकार्यामुळे आणि रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर अत्यंत...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

नंदुरबार – ईद मिलाद व गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन; आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा…

Anc – आगामी ईद मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख सण उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा राखत शांततेत साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि नागरिक या बैठकीस उपस्थित होते.बैठकीत आगामी सणांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था, धार्मिक कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. ईद मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण परस्पर बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढविणारे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. सणांच्या काळात अफवा, गैरसमज अथवा वादग्रस्त बाबींना खतपाणी घालणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेशांपासून नागरिकांनी दूर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश, फोटो, व्हिडिओ अथवा पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला. नागरिकांनी सोशल मीडियावर कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,नंदुरबार जिल्ह्यातील शांततेची आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ईद मिलाद आणि गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा न देता साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले… Byte – अश्विनी सानपपोलीस अधीक्षक...

नंदुरबारमध्ये अजब कारभार! ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानाच्या प्रमाणपत्रावर चक्क ‘४० तारीख’!” “कॅलेंडरचे नियम बदलले का?

नंदुरबार येथील प्रसिद्ध ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानाच्या पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्रावर चक्क ‘४० तारीख’ टाकण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नियमांनुसार खाद्यपदार्थांच्या दुकानांना कीटक नियंत्रण म्हणजेच पेस्ट कंट्रोल करणे बंधनकारक असते. मात्र, हे प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित एजन्सीने किंवा कर्मचाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठत कॅलेंडरमध्ये अस्तित्वातच नसलेली ‘४० तारीख’ प्रमाणपत्रावर लिहून दिली आहे. या अजब कारभाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत”कॅलेंडरमध्ये महिना ३० किंवा ३१ दिवसांचा असतो, हे अगदी लहान मुलालाही माहिती असतं. फार-फार तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होतो. पण मित्रांनो, तुम्ही कधी ‘४० तारीख’ ऐकली आहे का? आश्चर्य वाटेल, पण नंदुरबारमध्ये चक्क ‘४० तारीख’ अस्तित्वात आल्याचे समोर आले आहे!नंदुरबार शहरातील एका प्रसिद्ध ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानात हा अजब आणि चक्रावून टाकणारा प्रकार पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी या कुल्फी दुकानदाराने आपल्या दुकानात पेस्ट कंट्रोल करून घेतले. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या एजन्सीने त्यांना रीतसर प्रमाणपत्रही दिले. मात्र, हे प्रमाणपत्र देताना संबंधित कर्मचाऱ्याने त्यावर पुढील पेस्ट कंट्रोल करण्याची तारीख चक्क ‘४० तारीख’ लिहून दिली!””आता कॅलेंडरच्या नियमांनाच आव्हान देणारी ही ‘४० तारीख’ नेमकी आली कुठून? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दुकानदार आणि प्रशासकीय तपासणी करणाऱ्या यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या या प्रमाणपत्राचा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर मीम्स बनवायला सुरुवात केली असून, ‘या महिन्यात पगाराचे ४० दिवस मोजावे लागणार का?’ अशी विचारणा केली जात आहे.””महत्त्वाची प्रमाणपत्रे जारी करताना किंवा त्यावर सह्या-शिक्के मारताना संबंधित...

Navapur:-ऑर्डर घेत असताना युवकावर चाकूने हल्ला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

*नवापूर -नवापूर तालुक्यातील धडधड्या येथे दुकानावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ऑर्डर घेत असलेल्या युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. कृणाल गोसावी, नामक युवक गोपाल वेफर्स नवापूर येथे ऑर्डर घेण्याचे काम करतो. जुन्या किरकोळ वादातून *कमलेश गोसावी, विशाल गोसावी, सुमित गोसावी, अक्षय बंजारा* अशी 4 ते 5 मुलांनी कृणाल यांच्या छातीवर धारदार चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. कृणाल यांनी हात आडवा घालून व धक्का देऊन जीव वाचवला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या पायाला चाकू लागून 2 टाके पडले आहेत. या प्रकरणी *नवापूर पोलीस ठाण्यात BNS कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत. या संदर्भात आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिडितकडून करण्यात आली...

नंदुरबार :- विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा होणार; नंदुरबार पोलिसांचा चोख बंदोबस्त,आदिवासी बांधवांचे पोलिसांकडून स्वागत; शस्त्रे व आक्षेपार्ह साहित्य न आणण्याचे आवाहन…

9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस सर्वत्र साजरा करण्यात येती.विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात तसेच शहरात उत्साहाचे वातावरण असून, हा दिवस शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम, रॅली आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात येणाऱ्या आदिवासी बांधवांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवत हा दिवस उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने मिरवणुकीत अथवा कार्यक्रमस्थळी शस्त्रे, धारदार वस्तू किंवा इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये आणि कोणालाही दुखापत होऊ नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.तसेच सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कायद्याचे पालन करावे आणि शांततेत हा दिवस साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे….Byte – अश्विनी सानप पोलीस अधीक्षक...

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण: भाजप नेते विजय चौधरी जिल्हा रुग्णालयात दाखल

नंदुरबार व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले भाजप नेते विजय चौधरी यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. विजय चौधरी यांच्या विरोधात दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासा दरम्यान न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय चौधरी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून उपचार व निरीक्षण सुरू आहे. दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणात पुढील तपासा दरम्यान काय निष्पन्न होते याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले...

शिरपूर आगाराच्या एसटी ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्वागत !

धुळे विभागातील शिरपूर आगारात आज नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून सेवेला शुभारंभकरण्यात आला या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात...

Loading

All

Latest

NANDURBAR NEWS:-फरशी पुलाचे काम ठरले शेतकऱ्यांसाठी संकट; लोये परिसरातील शेते पाण्याखाली

नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील लोये गावाजवळ फरशी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने नाल्याला पूर आला असून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकांसह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी भरल्याने शेताचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा मोठ्या पाईपची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महसूल विभाग आणि कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ऑनलाइन पूर्वसूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील, याची काळजी घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली...

क्राईम

Latest

धुळे:- कॉलेजांसमोर हिरोगीरी करणाऱ्यांवर कारवाई पोलीसांनी कॉलेज बाहेर काढायला लावल्या “उठाबशा”

धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे शहर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच जे.आर. सिटी हायस्कूल परिसरात विनाकारण वावर करणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संबंधित युवकांकडून २५ उठाबश्या काढून घेत त्यांना समज देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा टवाळखोरी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने...

NANDURABAR – दीड महिन्यानंतर समादीड महिन्यानंतर समाधानकारक पाऊस, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा…

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पिकांनाही मोठा फटका बसला होता. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या भागात आता पिकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड महिन्याच्या कोरड्या कालावधीनंतर झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणही आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला...

Read More

नंदुरबार – सिताखाई पॉईंटवर तरुण 3 हजार फुटावर अडकला …

तोरणमाळच्या सीताखाई पॉईंटवर झिप लाईनचा अनुभव घेण्यासाठी उतरलेला तरुण मध्येच अडकला यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटवर झिप लाईनवर अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली. तोरणमाळच्या सिताखाई पॉईंटवर असलेल्या 3 हजार 500 फूट खोल दरीवर पर्यटकांच्या साहसी खेळासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या झिप लाईनवर एका पर्यटकाचा थरारक अनुभव घेण्याचा प्रयत्न असतानाच पर्यटक झिप लाईनवरून जात असताना अचानक तांत्रिक अडचणीमुळे तो दरीच्या मध्यभागीच अडकला. यामुळे परिसरात काही काळ मोठा थरार आणि घबराट पसरली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून झिप लाईनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अतिशय कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश...

Read More

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करा -आ. डॉ. गावित समर्थकांची मागणी…

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याबद्दल अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली नंदुरबारच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी आ डॉ विजयकुमार गावित व त्याच्या कुटुंबियांवर खोटे आरोप करत अपशब्द वापरत असल्याचे ऐकायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला. जिल्ह्याच्या विकासात डॉ. गावित यांचे मोठे योगदान असताना त्यांचा अपमान करणे निंदनीय असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महामंत्री विजय चौधरी यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यासह गुन्हा नोंदवावा अशी लेखी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन सादर केले आहे . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील , नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते हिरालाल चौधरी, अविनाश माळी ,माजी जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे ,सागर तांबोळी ,नगरसेवक चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी यांच्या सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेमध्ये तीव्र संताप असून प्रसंगी जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे… Byte -दीपक...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!