नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे नंदुरबारमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील नेहरू चौकात संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी पेढे आणि चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला तसेच पेपरफुटीविरोधी घोषणाबाजी केली.यावेळी बोलताना गुलाबराव वाघ यांनी नीटसारख्या राष्ट्रीय परीक्षेतील पेपरफुटी हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला गंभीर विश्वासघात असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला कारवाई करावी लागली असून हा विद्यार्थी शक्तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात जिल्हाप्रमुख पंडित माळी, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाटील ,महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे सह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…Byte – पंडित माळी जिल्हाप्रमुख विद्यार्थी