Category: क्रीडा

क्रीडा प्रबोधनीत सरळ व चाचणीद्वारे खेळाडूंना प्रवेश देणार – सुनंदा पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्त) – शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये सन 2024-25 साठी सरळ व कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना नवीन प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. राज्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जेचे खेळाडू देण्यासाठी राज्यातील प्रतीभवन खेळाडूची निवड करून त्यानां संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरविणे व सुसंघटीत करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधनी कार्यरत असून या प्रबोधनींमध्ये  प्रवेशासाठी 50 टक्के सरळसेवा व 50 टक्के कौशल्य चाचणीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपुर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणच्या क्रीडा प्रबोधनीमध्ये निवड प्रक्रीया होणार असून ज्युदो, जिम्नॅस्टीक, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेस्टीक, कुस्ती, बॅडमिंटन, अर्चरी, हॅन्डबॉल, वेटलिफ्टींग अशा एकूण 17 क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीतील सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी खेळाडू हा संबधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे  अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबत समिती समक्ष चाचणी देऊन प्रवेश देण्यात येईल, क्रीडा प्रबोधिनीत खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडू असावा. खेळाडूचे वय 19 वर्षाआतील असावे अशा खेळाडूना संबंधित खेळाचे कौशल्य चाचणीचे आयेाजन करुन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. या चाचणीमधून निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल. जिल्हास्तरावर चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी 5 जुलै 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल,...

Read More

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करावी – विजय रिसे

नंदुरबार (जिमाका वृत्त) – फ्रांन्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करावी असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. वर्ष 2024 मध्ये आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा ही जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन होणार असून या स्पर्धेत प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्यासाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था आदि संस्थेतील उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.   यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी https://Kaushalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर 7 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी.  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2002 व त्यानंतरचा असून आवश्यक असून याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार येथे प्रत्यक्ष अथवा  02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क...

Read More

जी.टी.पी.ची विद्यार्थिनी रिंकी पावरा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी चीनला रवाना

नंदुरबार: (प्रतिनिधी) येथील जी.टी.पाटील महाविद्यालयातील क्रीडा विभागाची विद्यार्थिनी रिंकी पावरा हिची नुकतीच विद्यापीठाच्या माध्यामातून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झालेली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अति दुर्गम भागातील खेड्यातील विद्यार्थिनी आहे. ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत असून तिने महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला. रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निवड होण्यापूर्वी अश्वमेध विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक, अंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत रौप्य पदक, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत रजत पदक तसेच खेलो...

Read More

क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे- सुनंदा पाटील

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायामशाळा विकास योजना, क्रीडांगण विकास योजना, युवक कल्याण योजना अशा क्रीडा विषयक अनुदान योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. व्यायामशाळा विकास योजनेतंर्गत नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे, व्यायामशाळा इमारत नूतनीकरण (15 वर्ष जूनी असल्यास), व्यायामशाळा साहित्य खरेदी व खुले व्यायामशाळा साहित्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, आश्रमशाळा, अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व शासकीय कार्यालयानी प्रस्ताव सादर करावे.यासाठी कमाल 7 लाख इतके अनुदान मंजूर करण्यात येते. क्रीडांगण विकास योजनेतंर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 ते 400 मीटर धावनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणात क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रुम, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, भांडारगृह बांधणे, फल्ड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था तयार करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिकलर यंत्रणा बसविणे, व मैदानावर रोलींगसाठी हँड मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी 7 लाख रुपये कमाल मर्यादेत व क्रीडा साहित्य खरेदीसाठी 3 लक्ष अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी 100 टक्के अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व शासकीय शाळांनी प्रस्ताव सादर करावे. युवक कल्याण योजनेतंर्गत ग्रामीण, नागरी भागातील नोंदणीकृत युवक मंडळांना आर्थिक सहाय्य  तसेच नोंदणीकृत युवक मंडळांना स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीरे, सामाजिक क्षेत्रात प्रशिक्षण...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Nandurabar:नंदुरबारच्या शुभम पार्कमध्ये मध्यरात्री चोरट्यांची टोळी; नागरिकांमध्ये भीती

११ ऑगस्टच्या मध्यरात्री साडे दोन वाजता शुभम पार्क परिसरात काही संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्या. त्यावेळी कॉलनीतील एक व्यक्ती जागी झाली होती. त्याच व्यक्तीच्या घराच्या दिशेने एक संशयित व्यक्ती आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागून आणखी दोन जण आल्याचे दिसून आले. काही वेळ परिसरात हालचाल केल्यानंतर हे संशयित तेथून निघून गेले. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही साधारण ८ ते १० जणांची चोरट्यांची टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या हातात हत्यारे असल्याचेही सांगण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शुभम पार्क परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती...

Navapur:-ऑर्डर घेत असताना युवकावर चाकूने हल्ला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

*नवापूर -नवापूर तालुक्यातील धडधड्या येथे दुकानावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ऑर्डर घेत असलेल्या युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. कृणाल गोसावी, नामक युवक गोपाल वेफर्स नवापूर येथे ऑर्डर घेण्याचे काम करतो. जुन्या किरकोळ वादातून *कमलेश गोसावी, विशाल गोसावी, सुमित गोसावी, अक्षय बंजारा* अशी 4 ते 5 मुलांनी कृणाल यांच्या छातीवर धारदार चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. कृणाल यांनी हात आडवा घालून व धक्का देऊन जीव वाचवला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या पायाला चाकू लागून 2 टाके पडले आहेत. या प्रकरणी *नवापूर पोलीस ठाण्यात BNS कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत. या संदर्भात आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिडितकडून करण्यात आली...

नंदुरबार :- विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा होणार; नंदुरबार पोलिसांचा चोख बंदोबस्त,आदिवासी बांधवांचे पोलिसांकडून स्वागत; शस्त्रे व आक्षेपार्ह साहित्य न आणण्याचे आवाहन…

9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस सर्वत्र साजरा करण्यात येती.विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात तसेच शहरात उत्साहाचे वातावरण असून, हा दिवस शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम, रॅली आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात येणाऱ्या आदिवासी बांधवांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवत हा दिवस उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने मिरवणुकीत अथवा कार्यक्रमस्थळी शस्त्रे, धारदार वस्तू किंवा इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये आणि कोणालाही दुखापत होऊ नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.तसेच सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कायद्याचे पालन करावे आणि शांततेत हा दिवस साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे….Byte – अश्विनी सानप पोलीस अधीक्षक...

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण: भाजप नेते विजय चौधरी जिल्हा रुग्णालयात दाखल

नंदुरबार व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले भाजप नेते विजय चौधरी यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. विजय चौधरी यांच्या विरोधात दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासा दरम्यान न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय चौधरी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून उपचार व निरीक्षण सुरू आहे. दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणात पुढील तपासा दरम्यान काय निष्पन्न होते याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले...

शिरपूर आगाराच्या एसटी ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्वागत !

धुळे विभागातील शिरपूर आगारात आज नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून सेवेला शुभारंभकरण्यात आला या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात...

NANDURBAR NEWS:-फरशी पुलाचे काम ठरले शेतकऱ्यांसाठी संकट; लोये परिसरातील शेते पाण्याखाली

नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील लोये गावाजवळ फरशी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने नाल्याला पूर आला असून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकांसह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी भरल्याने शेताचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा मोठ्या पाईपची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महसूल विभाग आणि कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ऑनलाइन पूर्वसूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील, याची काळजी घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली...

Loading

क्राईम

Latest

धुळे:- कॉलेजांसमोर हिरोगीरी करणाऱ्यांवर कारवाई पोलीसांनी कॉलेज बाहेर काढायला लावल्या “उठाबशा”

धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे शहर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच जे.आर. सिटी हायस्कूल परिसरात विनाकारण वावर करणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संबंधित युवकांकडून २५ उठाबश्या काढून घेत त्यांना समज देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा टवाळखोरी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने...

नंदुरबार – शाळा परिसरात माकडाचा धुमाकूळ, वन विभागाचे दुर्लक्ष,विद्यार्थी-शिक्षक भयभीत…..

शहरातील डी आर हायस्कूल व डॉक्टर काणे प्राथमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूल शाळा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. हे माकड दिवसभर शाळेच्या आवारात फिरत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार सूचना देऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आज पुन्हा शाळेत माकडाने उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर माहिती मिळताच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पिंजरा सोबत आणला असतानाही तो लावण्यातच आला नाही त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शाळा परिसरात लहान मुले असल्याने माकड कोणावरही हल्ला करू शकते, अशी भीती पालक आणि शिक्षकांना आहे. गेल्या 3 दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माकड दिवसभर वर्गांजवळ, टाकीवर आणि झाडांवर फिरत असते. आम्हाला मुलांना सांभाळणे कठीण झाले आहे. वन विभागाने तात्काळ माकडाचा बंदोबस्त करावा. शाळा परिसरातील माकडाचा प्रश्न तातडीने सोडवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. Byte – घनश्याम...

Read More

नंदुरबार – सिताखाई पॉईंटवर तरुण 3 हजार फुटावर अडकला …

तोरणमाळच्या सीताखाई पॉईंटवर झिप लाईनचा अनुभव घेण्यासाठी उतरलेला तरुण मध्येच अडकला यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटवर झिप लाईनवर अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली. तोरणमाळच्या सिताखाई पॉईंटवर असलेल्या 3 हजार 500 फूट खोल दरीवर पर्यटकांच्या साहसी खेळासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या झिप लाईनवर एका पर्यटकाचा थरारक अनुभव घेण्याचा प्रयत्न असतानाच पर्यटक झिप लाईनवरून जात असताना अचानक तांत्रिक अडचणीमुळे तो दरीच्या मध्यभागीच अडकला. यामुळे परिसरात काही काळ मोठा थरार आणि घबराट पसरली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून झिप लाईनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अतिशय कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश...

Read More

इनंदुरबार – डिजीटल वीज मीटर प्रकरणी शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक,अधीक्षक अभियंत्यांना घेराव, 8 दिवसात कारवाई न झाल्यास गावबंद आंदोलन…

जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना डिजीटल वीज मीटरमुळे २ ते ३ पट जास्त बिले येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांना घेराव घातला.आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाढीव बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. ठेकेदारांनी परवानगी न घेता शासनाचा धाक दाखवून डिजीटल मीटर बसवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी डिजीटल मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत,डिजीटल मीटरच्या आधारे येणारी वीजबिले तोपर्यंत थांबवावीत ,रात्री अपरात्री होणारी वीज कपात थांबवावी , लेखी वीजबिल घरोघरी पोहोचवण्याची जुनी व्यवस्था सुरू करावीयेत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यात एक दिवस जिल्हा बंद करून कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी, महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, बापू महाजन, दिनेश भोपे, ईम्तियाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते… Byte – रीना पाडवीमहिला...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!