Category: कोरोना

सानुग्रह अनुदान नामंजूर झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार निवारण समितीकडे अपील करावे -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणामुळे नामंजूर झाले असल्यास अशा प्रकरणासंदर्भात नातेवाईकानी अपील करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. कोविड-19’ मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य वितरीत करण्याबाबत mahacovid19relief.in या पोर्टलवर सानुग्रह साहाय्य प्राप्त होण्याकामी ऑनालाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले असल्यास अशा सर्व प्रकरणांबाबत अर्जदाराची सानुग्रह साहाय्य मिळण्याची संधी कायम राहील. मात्र, त्यासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. यापूर्वी ऑनलाईन केलेले अर्ज काही कारणामुळे नामंजूर झाले असल्यास, अशा अर्जाबाबत पुढील कार्यवाही करीता अर्जदाराने शासनाच्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर भेट दिल्यास अर्जदारास Appeal to GRC अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा यापूर्वीच भरलेला अर्ज योग्य आणि विश्वसनीय आहे. असे वाटत असल्यास प्रकरणाच्या फेरतपासणीकरीता अर्जदाराने संकेतस्थळावरील Appeal to GRC या संदेशावर क्लिक करुन GRC (तक्रार निवारण समिती) कडे अपील करावे. Appeal to GRC यावर क्लिक केल्यानंतर लागलीच निवेदन ऑनलाईन तक्रार निवारण समितीकडे सादर झाल्याचा संदेश पोर्टलवर दिसेल. सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार तक्रार निवारण समितीकडे असे प्राप्त अपील प्रकरणे समक्ष सुनावणीसाठी संधी दिली जाईल. याबाबत अर्ज करताना पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या संदेशात तक्रार निवारण समितीकडे समक्ष उपस्थित राहावयाची तारीख, वेळ व स्थळ नमूद असेल. त्यावेळी अर्जदारांना आवश्यक ती सर्व...

Read More

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2022-2023 या वर्षासाठी 372 कोटी 89 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. ‘कोविड-19’ पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार डॉ. हिना गावीत, जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार किशोर दराडे, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, जिल्हा...

Read More

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास व थुंकल्यास 200 रुपयांचा दंड

नंदुरबार, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास तसेच थुंकणाऱ्यांविरुध्द 200 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मात्र, हाच गुन्हा वारंवार केल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीं तसेच संस्था, आस्थापना विरुध्द 27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) व महाराष्ट्र कोविड-19 नियम 2020 चे कलम 3 नुसार दंडात्मक तसेच फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भाग असून तेथील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन सामग्रीचा व इतर बाबी विचारात घेता या आदेशातील निर्बंध कायम ठेवून दंडाची रक्कम कमी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये,  तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी मास्क न वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन...

Read More

31 डिसेंबर व नूतन वर्ष साध्या पद्धतीने साजरा करावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या तीव्रतेने पसरण्याची शक्यता असल्याने या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता 31 डिसेंबर व नूतन वर्ष  साध्या पद्धतीने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.             कोरानाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2021 रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2022 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने घराबाहेर न पडता नववर्षांचे स्वागत घरीच साधेपणाने आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा. जिल्ह्यात 25 डिसेंबर पासून रात्री 9 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून याचे पालन सर्व नागरिकांनी करावे.             31 डिसेंबर 2021 व नूतन वर्षांच्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी राहील. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतराचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच सदर ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नागरीकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा...

Read More

विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात चार दिवस विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चार दिवसात 85 हजार 768 एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 8 ते 11 डिसेंबर या दरम्यान राबविलेल्या या विशेष लसीकरण शिबिरात पहिल्या दिवशी 21 हजार 986 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44  वयोगटातील 6 हजार 767  व्यक्तींनी पहिला डोस तर 7 हजार 204 व्यक्तींनी दुसरा डोस...

Read More

एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकल कलावंताना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत 56 हजार कलाकारांना  प्रति कलाकार 5 हजार प्रमाणे 28 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी पात्र कलाकारांनी 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. एकल कलाकाराच्या अर्थसहाय्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील कलेवर गुजराण असणारा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कलाकार असावा. त्याचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बॅक खाते तपशिल, शिधापत्रिका विहीत नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत. एकल कलाकाराची निवड करण्यासाठी ‍ जिल्हास्तरीय समितीमार्फतलाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवून अर्जाची छाननी समितीमार्फत करण्यात येईल.जिल्हास्तरीय समितीने  पात्र केलेल्या कलाकाराची शिफारस यादी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना सादर करतील व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.  योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ डी.जी.नादगांवकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Nandurabar:नंदुरबारच्या शुभम पार्कमध्ये मध्यरात्री चोरट्यांची टोळी; नागरिकांमध्ये भीती

११ ऑगस्टच्या मध्यरात्री साडे दोन वाजता शुभम पार्क परिसरात काही संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्या. त्यावेळी कॉलनीतील एक व्यक्ती जागी झाली होती. त्याच व्यक्तीच्या घराच्या दिशेने एक संशयित व्यक्ती आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागून आणखी दोन जण आल्याचे दिसून आले. काही वेळ परिसरात हालचाल केल्यानंतर हे संशयित तेथून निघून गेले. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही साधारण ८ ते १० जणांची चोरट्यांची टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या हातात हत्यारे असल्याचेही सांगण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शुभम पार्क परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती...

Navapur:-ऑर्डर घेत असताना युवकावर चाकूने हल्ला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

*नवापूर -नवापूर तालुक्यातील धडधड्या येथे दुकानावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ऑर्डर घेत असलेल्या युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. कृणाल गोसावी, नामक युवक गोपाल वेफर्स नवापूर येथे ऑर्डर घेण्याचे काम करतो. जुन्या किरकोळ वादातून *कमलेश गोसावी, विशाल गोसावी, सुमित गोसावी, अक्षय बंजारा* अशी 4 ते 5 मुलांनी कृणाल यांच्या छातीवर धारदार चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. कृणाल यांनी हात आडवा घालून व धक्का देऊन जीव वाचवला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या पायाला चाकू लागून 2 टाके पडले आहेत. या प्रकरणी *नवापूर पोलीस ठाण्यात BNS कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत. या संदर्भात आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिडितकडून करण्यात आली...

नंदुरबार :- विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा होणार; नंदुरबार पोलिसांचा चोख बंदोबस्त,आदिवासी बांधवांचे पोलिसांकडून स्वागत; शस्त्रे व आक्षेपार्ह साहित्य न आणण्याचे आवाहन…

9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस सर्वत्र साजरा करण्यात येती.विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात तसेच शहरात उत्साहाचे वातावरण असून, हा दिवस शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम, रॅली आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात येणाऱ्या आदिवासी बांधवांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवत हा दिवस उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने मिरवणुकीत अथवा कार्यक्रमस्थळी शस्त्रे, धारदार वस्तू किंवा इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये आणि कोणालाही दुखापत होऊ नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.तसेच सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कायद्याचे पालन करावे आणि शांततेत हा दिवस साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे….Byte – अश्विनी सानप पोलीस अधीक्षक...

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण: भाजप नेते विजय चौधरी जिल्हा रुग्णालयात दाखल

नंदुरबार व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले भाजप नेते विजय चौधरी यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. विजय चौधरी यांच्या विरोधात दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासा दरम्यान न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय चौधरी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून उपचार व निरीक्षण सुरू आहे. दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणात पुढील तपासा दरम्यान काय निष्पन्न होते याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले...

शिरपूर आगाराच्या एसटी ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्वागत !

धुळे विभागातील शिरपूर आगारात आज नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून सेवेला शुभारंभकरण्यात आला या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात...

NANDURBAR NEWS:-फरशी पुलाचे काम ठरले शेतकऱ्यांसाठी संकट; लोये परिसरातील शेते पाण्याखाली

नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील लोये गावाजवळ फरशी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने नाल्याला पूर आला असून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकांसह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी भरल्याने शेताचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा मोठ्या पाईपची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महसूल विभाग आणि कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ऑनलाइन पूर्वसूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील, याची काळजी घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली...

Loading

क्राईम

Latest

धुळे:- कॉलेजांसमोर हिरोगीरी करणाऱ्यांवर कारवाई पोलीसांनी कॉलेज बाहेर काढायला लावल्या “उठाबशा”

धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे शहर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच जे.आर. सिटी हायस्कूल परिसरात विनाकारण वावर करणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संबंधित युवकांकडून २५ उठाबश्या काढून घेत त्यांना समज देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा टवाळखोरी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने...

नंदुरबार – शाळा परिसरात माकडाचा धुमाकूळ, वन विभागाचे दुर्लक्ष,विद्यार्थी-शिक्षक भयभीत…..

शहरातील डी आर हायस्कूल व डॉक्टर काणे प्राथमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूल शाळा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. हे माकड दिवसभर शाळेच्या आवारात फिरत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार सूचना देऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आज पुन्हा शाळेत माकडाने उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर माहिती मिळताच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पिंजरा सोबत आणला असतानाही तो लावण्यातच आला नाही त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शाळा परिसरात लहान मुले असल्याने माकड कोणावरही हल्ला करू शकते, अशी भीती पालक आणि शिक्षकांना आहे. गेल्या 3 दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माकड दिवसभर वर्गांजवळ, टाकीवर आणि झाडांवर फिरत असते. आम्हाला मुलांना सांभाळणे कठीण झाले आहे. वन विभागाने तात्काळ माकडाचा बंदोबस्त करावा. शाळा परिसरातील माकडाचा प्रश्न तातडीने सोडवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. Byte – घनश्याम...

Read More

नंदुरबार – सिताखाई पॉईंटवर तरुण 3 हजार फुटावर अडकला …

तोरणमाळच्या सीताखाई पॉईंटवर झिप लाईनचा अनुभव घेण्यासाठी उतरलेला तरुण मध्येच अडकला यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटवर झिप लाईनवर अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली. तोरणमाळच्या सिताखाई पॉईंटवर असलेल्या 3 हजार 500 फूट खोल दरीवर पर्यटकांच्या साहसी खेळासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या झिप लाईनवर एका पर्यटकाचा थरारक अनुभव घेण्याचा प्रयत्न असतानाच पर्यटक झिप लाईनवरून जात असताना अचानक तांत्रिक अडचणीमुळे तो दरीच्या मध्यभागीच अडकला. यामुळे परिसरात काही काळ मोठा थरार आणि घबराट पसरली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून झिप लाईनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अतिशय कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश...

Read More

इनंदुरबार – डिजीटल वीज मीटर प्रकरणी शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक,अधीक्षक अभियंत्यांना घेराव, 8 दिवसात कारवाई न झाल्यास गावबंद आंदोलन…

जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना डिजीटल वीज मीटरमुळे २ ते ३ पट जास्त बिले येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांना घेराव घातला.आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाढीव बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. ठेकेदारांनी परवानगी न घेता शासनाचा धाक दाखवून डिजीटल मीटर बसवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी डिजीटल मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत,डिजीटल मीटरच्या आधारे येणारी वीजबिले तोपर्यंत थांबवावीत ,रात्री अपरात्री होणारी वीज कपात थांबवावी , लेखी वीजबिल घरोघरी पोहोचवण्याची जुनी व्यवस्था सुरू करावीयेत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यात एक दिवस जिल्हा बंद करून कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी, महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, बापू महाजन, दिनेश भोपे, ईम्तियाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते… Byte – रीना पाडवीमहिला...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!