Category: कोरोना

सानुग्रह अनुदान नामंजूर झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार निवारण समितीकडे अपील करावे -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोविड- 19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे 50 हजार रुपयांचे सानुग्रह साहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या पोर्टलवर संबंधितांच्या नातेवाईकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणामुळे नामंजूर झाले असल्यास अशा प्रकरणासंदर्भात नातेवाईकानी अपील करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. कोविड-19’ मुळे मृत झालेल्या रुग्णांच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य वितरीत करण्याबाबत mahacovid19relief.in या पोर्टलवर सानुग्रह साहाय्य प्राप्त होण्याकामी ऑनालाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील काही अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले असल्यास अशा सर्व प्रकरणांबाबत अर्जदाराची सानुग्रह साहाय्य मिळण्याची संधी कायम राहील. मात्र, त्यासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. यापूर्वी ऑनलाईन केलेले अर्ज काही कारणामुळे नामंजूर झाले असल्यास, अशा अर्जाबाबत पुढील कार्यवाही करीता अर्जदाराने शासनाच्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर भेट दिल्यास अर्जदारास Appeal to GRC अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा यापूर्वीच भरलेला अर्ज योग्य आणि विश्वसनीय आहे. असे वाटत असल्यास प्रकरणाच्या फेरतपासणीकरीता अर्जदाराने संकेतस्थळावरील Appeal to GRC या संदेशावर क्लिक करुन GRC (तक्रार निवारण समिती) कडे अपील करावे. Appeal to GRC यावर क्लिक केल्यानंतर लागलीच निवेदन ऑनलाईन तक्रार निवारण समितीकडे सादर झाल्याचा संदेश पोर्टलवर दिसेल. सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार तक्रार निवारण समितीकडे असे प्राप्त अपील प्रकरणे समक्ष सुनावणीसाठी संधी दिली जाईल. याबाबत अर्ज करताना पोर्टलवर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या संदेशात तक्रार निवारण समितीकडे समक्ष उपस्थित राहावयाची तारीख, वेळ व स्थळ नमूद असेल. त्यावेळी अर्जदारांना आवश्यक ती सर्व...

Read More

जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2022-2023 या वर्षासाठी 372 कोटी 89 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. ‘कोविड-19’ पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार डॉ. हिना गावीत, जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार किशोर दराडे, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, जिल्हा...

Read More

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास व थुंकल्यास 200 रुपयांचा दंड

नंदुरबार, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास तसेच थुंकणाऱ्यांविरुध्द 200 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मात्र, हाच गुन्हा वारंवार केल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीं तसेच संस्था, आस्थापना विरुध्द 27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) व महाराष्ट्र कोविड-19 नियम 2020 चे कलम 3 नुसार दंडात्मक तसेच फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भाग असून तेथील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन सामग्रीचा व इतर बाबी विचारात घेता या आदेशातील निर्बंध कायम ठेवून दंडाची रक्कम कमी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये,  तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी मास्क न वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन...

Read More

31 डिसेंबर व नूतन वर्ष साध्या पद्धतीने साजरा करावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या तीव्रतेने पसरण्याची शक्यता असल्याने या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता 31 डिसेंबर व नूतन वर्ष  साध्या पद्धतीने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.             कोरानाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2021 रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2022 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने घराबाहेर न पडता नववर्षांचे स्वागत घरीच साधेपणाने आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा. जिल्ह्यात 25 डिसेंबर पासून रात्री 9 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून याचे पालन सर्व नागरिकांनी करावे.             31 डिसेंबर 2021 व नूतन वर्षांच्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी राहील. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतराचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच सदर ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नागरीकांनी 31 डिसेंबरच्या दिवशी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझरचा...

Read More

विशेष लसीकरण शिबीरास नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद चार दिवसात 85 हजार 768 लसवंत

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात चार दिवस विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चार दिवसात 85 हजार 768 एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 8 ते 11 डिसेंबर या दरम्यान राबविलेल्या या विशेष लसीकरण शिबिरात पहिल्या दिवशी 21 हजार 986 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात 18 ते 44  वयोगटातील 6 हजार 767  व्यक्तींनी पहिला डोस तर 7 हजार 204 व्यक्तींनी दुसरा डोस...

Read More

एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकल कलावंताना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत 56 हजार कलाकारांना  प्रति कलाकार 5 हजार प्रमाणे 28 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी पात्र कलाकारांनी 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. एकल कलाकाराच्या अर्थसहाय्यासाठी पात्रता व अटी : अर्जदार महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील कलेवर गुजराण असणारा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कलाकार असावा. त्याचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बॅक खाते तपशिल, शिधापत्रिका विहीत नमुन्यातील अर्जासोबत जोडावीत. एकल कलाकाराची निवड करण्यासाठी ‍ जिल्हास्तरीय समितीमार्फतलाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवून अर्जाची छाननी समितीमार्फत करण्यात येईल.जिल्हास्तरीय समितीने  पात्र केलेल्या कलाकाराची शिफारस यादी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना सादर करतील व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.  योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,‍ डी.जी.नादगांवकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

शिरपूर आगाराच्या एसटी ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्वागत !

धुळे विभागातील शिरपूर आगारात आज नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून सेवेला शुभारंभकरण्यात आला या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात...

NANDURBAR NEWS:-फरशी पुलाचे काम ठरले शेतकऱ्यांसाठी संकट; लोये परिसरातील शेते पाण्याखाली

नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील लोये गावाजवळ फरशी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने नाल्याला पूर आला असून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकांसह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी भरल्याने शेताचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा मोठ्या पाईपची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महसूल विभाग आणि कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ऑनलाइन पूर्वसूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील, याची काळजी घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली...

NANDURBAR BREAKING: लायन्स क्लब नंदुरबारचा मोठा पुढाकार; नगरपालिकेचा बेघर वृद्धाश्रम एक वर्षासाठी घेतला दत्तक!

नंदुरबार शहरातून एक अत्यंत सकारात्मक आणि माणुसकीला उजाळा देणारी बातमी समोर येत आहे. ‘सेवा परमो धर्म:’ हाच संदेश देत ‘लायन्स क्लब नंदुरबार’ने शहरात सामाजिक सेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. गरजूंना अन्नदान करण्यासोबतच, क्लबने आता बेघर आणि निराधार वृद्धांनाही मायेचा आधार दिला आहे.भुकेलेल्यांना अन्न देणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. हाच वसा हाती घेत लायन्स क्लब नंदुरबार तर्फे शहरात अविरत अन्नदान उपक्रम राबविला जात आहे. नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि सायंकाळी, अशा दोन्ही वेळेस मोफत अन्नदान केले जाते. एवढेच नव्हे, तर ‘निम्स’ हॉस्पिटल या ठिकाणीही सायंकाळच्या वेळी गरजूंना भोजन पुरविले जात आहे.या अवाढव्य आणि निरंतर चालणाऱ्या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची आवश्यकता भासत असते. याच पार्श्वभूमीवर, लायन्स क्लब नंदुरबारने शहरातील सर्व दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आपल्या हक्काच्या शहरातील कोणीही भुकेलेला झोपू नये, यासाठी नागरिकांनी या अन्नदान यज्ञामध्ये सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक क्लबचे अध्यक्ष, सचिव किंवा कोणत्याही सदस्याशी थेट संपर्क साधू शकतात.लायन्स क्लबचे सामाजिक कार्य इथेच थांबत नाही, तर त्यांनी आणखी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. नंदुरबार नगरपालिकेकडून चालविला जाणारा ‘बेघर व निराधार आधार वृद्धाश्रम’ लायन्स क्लबने पुढील एक वर्षासाठी पूर्णपणे दत्तक घेतला आहे.आता या वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्व गरजू आणि बेघर ज्येष्ठ नागरिकांना लायन्स क्लबतर्फे दोन्ही वेळचे सकस जेवण, चहा आणि नाश्ता दिला जाणार आहे. केवळ अन्नच नव्हे, तर त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत वैद्यकीय सुविधाही मोफत पुरविल्या...

“ब्रेकिंग न्यूज: चांदसैली घाटात भीषण दरड कोसळली; तळोदा-धडगाव संपर्क तुटला!”

सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण दरड कोसळली आहे. घाटातील माकड टेकडीजवळ ही मोठी दुर्घटना घडली असून, रस्त्यावर भलेमोठे दगड आणि मातीचा ढीग आलाय. यामुळे तळोदा-धडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी तब्बल ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.”नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात माकड टेकडीजवळ अचानक डोंगराचा कडा कोसळला. रस्त्यावर आलेले भलेमोठे दगड आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे या मार्गावरील वाहतूक शंभर टक्के ठप्प झाली आहे.घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन वसावे, कनिष्ठ अभियंता सुधाकर चौरे आणि पोलीस कर्मचारी अजय पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रस्त्यावरील दगडांचा आकार प्रचंड मोठा असल्याने आणि पाऊस थांबत नसल्याने हा रस्ता तातडीने सुरू करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान ४ ते ५ दिवस लागतील असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लहान वाहनांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा ‘अलर्ट’ अजूनही कायम असल्याने, प्रशासनाने नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घाटमार्गावरील प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे.””तर ही होती चांदसैली घाटातील दरड कोसळल्याची थेट अपडेट. आमचे प्रेक्षक आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आमचे आवाहन आहे की, पुढील काही दिवस चांदसैली घाटमार्गाने प्रवास करणे टाळा आणि...

NANDURABAR – दीड महिन्यानंतर समादीड महिन्यानंतर समाधानकारक पाऊस, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा…

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पिकांनाही मोठा फटका बसला होता. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या भागात आता पिकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड महिन्याच्या कोरड्या कालावधीनंतर झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणही आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला...

Loading

क्राईम

Latest

धुळे:- कॉलेजांसमोर हिरोगीरी करणाऱ्यांवर कारवाई पोलीसांनी कॉलेज बाहेर काढायला लावल्या “उठाबशा”

धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे शहर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच जे.आर. सिटी हायस्कूल परिसरात विनाकारण वावर करणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संबंधित युवकांकडून २५ उठाबश्या काढून घेत त्यांना समज देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा टवाळखोरी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने...

इनंदुरबार – डिजीटल वीज मीटर प्रकरणी शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक,अधीक्षक अभियंत्यांना घेराव, 8 दिवसात कारवाई न झाल्यास गावबंद आंदोलन…

जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना डिजीटल वीज मीटरमुळे २ ते ३ पट जास्त बिले येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांना घेराव घातला.आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाढीव बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. ठेकेदारांनी परवानगी न घेता शासनाचा धाक दाखवून डिजीटल मीटर बसवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी डिजीटल मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत,डिजीटल मीटरच्या आधारे येणारी वीजबिले तोपर्यंत थांबवावीत ,रात्री अपरात्री होणारी वीज कपात थांबवावी , लेखी वीजबिल घरोघरी पोहोचवण्याची जुनी व्यवस्था सुरू करावीयेत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यात एक दिवस जिल्हा बंद करून कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी, महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, बापू महाजन, दिनेश भोपे, ईम्तियाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते… Byte – रीना पाडवीमहिला...

Read More

नंदुरबार – slug – गावित कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह भाषा : भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल…

Anc – माजी आदिवासी विकास मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत विजय चौधरी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. गावित कुटुंबीयांबद्दल केलेल्या अपशब्दांमुळे पक्षाच्या आणि जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल ऑडिओ क्लिपची तपासणी केल्यानंतर विजय चौधरी यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेमुळे नंदुरबार मधे राजकीय खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. Byte – सतीश गायकवाडउपविभागीय पोलीस...

Read More

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करा -आ. डॉ. गावित समर्थकांची मागणी…

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याबद्दल अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली नंदुरबारच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी आ डॉ विजयकुमार गावित व त्याच्या कुटुंबियांवर खोटे आरोप करत अपशब्द वापरत असल्याचे ऐकायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला. जिल्ह्याच्या विकासात डॉ. गावित यांचे मोठे योगदान असताना त्यांचा अपमान करणे निंदनीय असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महामंत्री विजय चौधरी यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यासह गुन्हा नोंदवावा अशी लेखी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन सादर केले आहे . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील , नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते हिरालाल चौधरी, अविनाश माळी ,माजी जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे ,सागर तांबोळी ,नगरसेवक चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी यांच्या सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेमध्ये तीव्र संताप असून प्रसंगी जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे… Byte -दीपक...

Read More

शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू….

शिंदखेडा (प्रतिनिधी): शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकरी दगा लक्ष्मण सोनवणे यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दगा लक्ष्मण सोनवणे हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांना विषारी सर्पाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि डॉ. तेजस जैन यांनी त्यांना मृत घोषित केले.कै, दगा लक्ष्मण सोनवणे यांना दोन मुल एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे कर्ले गावावर शोककळा पसरली असून, शेतकऱ्याच्या अकाली निधनाने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये दुःखाचे वातावरण...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!