Category: कृषी

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग तपासणी

नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निंबोणी ता जि नंदुरबार येथे आज दिनांक 15/10/2024 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग तपासणी साठी व पाहणी करण्यासाठी आपल्या तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी या.श्री एस.एन.पाटील साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी मा.जाधव साहेब यांनी भेट दिली.शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग निमिर्तीसाठी आम्ही शालेय परिसरात सुंदर अशी परसबाग तयार करून त्यात सेंद्रिय खत टाकून विविध प्रकारचे भाजीपाला, फळभाज्या यांची लागवड केलेली आहे.भेंडी,वांगी,कारली,दोडकी, टमाटे अंबडचुका ,पालक मेथी ,दुधीभोपळा, कडीपत्ता, कोथिंबीर इत्यादी भाजीपाला लागवड करुन उत्पादीत भाजीपाला शालेय पोषण आहार मध्ये टाकून विद्यार्थ्यांना दिला जातो.शालेयपरिसर अतिशय सुंदर असा...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताचे भान जपत भारतीय स्टेट बॅंक एस.सी., एस.टी., बी.सी. कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना भारतीय स्टेट बॅंक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. गणेश वाघमारे, प्रेसिडेंट श्री. राकेश कांबळे, असिस्टंट जनरल सेक्रेटरी डॉ. मनोज पिंपळे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश पाटील आणि सरचिटणीस श्री. अमोल शिंदे यांची होती. या शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या यशस्वी आयोजनासाठी श्री. उल्हास लांडगे, श्री. प्रवीण देवरे, श्री. आनंदराव करनकाळ, श्री. दीपक सोनवणे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. वसंत पाटील, श्री. रावसाहेब पाटील, श्री. संजय बाविस्कर, श्री. बापू साळवे, श्री. नागसेन पेंढारकर, श्री. मनेश बिरारे आणि श्री. हरलाल मोरे यांचे विशेष योगदान लाभले. या शिबिराच्या नियोजनात श्री. देवेंद्र बोरसे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे संयोजन, समन्वय व प्रचार या बाबींचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमात अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केले. सामाजिक एकोपा, जबाबदारी आणि बांधिलकीचे दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काही तरी चांगले करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या रक्तदान शिबिराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. आयोजकांच्या सहकार्यामुळे आणि रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर अत्यंत...

Loading
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!