शिरपूर आगाराच्या एसटी ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्वागत !

धुळे विभागातील शिरपूर आगारात आज नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून सेवेला शुभारंभकरण्यात आला या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात...

Read More

NANDURBAR NEWS:-फरशी पुलाचे काम ठरले शेतकऱ्यांसाठी संकट; लोये परिसरातील शेते पाण्याखाली

नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील लोये गावाजवळ फरशी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने नाल्याला पूर आला असून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकांसह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी भरल्याने शेताचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा मोठ्या पाईपची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महसूल विभाग आणि कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे ऑनलाइन पूर्वसूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील, याची काळजी घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली...

Read More

NANDURBAR BREAKING: लायन्स क्लब नंदुरबारचा मोठा पुढाकार; नगरपालिकेचा बेघर वृद्धाश्रम एक वर्षासाठी घेतला दत्तक!

नंदुरबार शहरातून एक अत्यंत सकारात्मक आणि माणुसकीला उजाळा देणारी बातमी समोर येत आहे. ‘सेवा परमो धर्म:’ हाच संदेश देत ‘लायन्स क्लब नंदुरबार’ने शहरात सामाजिक सेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. गरजूंना अन्नदान करण्यासोबतच, क्लबने आता बेघर आणि निराधार वृद्धांनाही मायेचा आधार दिला आहे.भुकेलेल्यांना अन्न देणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. हाच वसा हाती घेत लायन्स क्लब नंदुरबार तर्फे शहरात अविरत अन्नदान उपक्रम राबविला जात आहे. नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दुपारी आणि सायंकाळी, अशा दोन्ही वेळेस मोफत अन्नदान केले जाते. एवढेच नव्हे, तर ‘निम्स’ हॉस्पिटल या ठिकाणीही सायंकाळच्या वेळी गरजूंना भोजन पुरविले जात आहे.या अवाढव्य आणि निरंतर चालणाऱ्या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची आवश्यकता भासत असते. याच पार्श्वभूमीवर, लायन्स क्लब नंदुरबारने शहरातील सर्व दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आपल्या हक्काच्या शहरातील कोणीही भुकेलेला झोपू नये, यासाठी नागरिकांनी या अन्नदान यज्ञामध्ये सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक क्लबचे अध्यक्ष, सचिव किंवा कोणत्याही सदस्याशी थेट संपर्क साधू शकतात.लायन्स क्लबचे सामाजिक कार्य इथेच थांबत नाही, तर त्यांनी आणखी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. नंदुरबार नगरपालिकेकडून चालविला जाणारा ‘बेघर व निराधार आधार वृद्धाश्रम’ लायन्स क्लबने पुढील एक वर्षासाठी पूर्णपणे दत्तक घेतला आहे.आता या वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्व गरजू आणि बेघर ज्येष्ठ नागरिकांना लायन्स क्लबतर्फे दोन्ही वेळचे सकस जेवण, चहा आणि नाश्ता दिला जाणार आहे. केवळ अन्नच नव्हे, तर त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत वैद्यकीय सुविधाही मोफत पुरविल्या...

Read More

“ब्रेकिंग न्यूज: चांदसैली घाटात भीषण दरड कोसळली; तळोदा-धडगाव संपर्क तुटला!”

सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण दरड कोसळली आहे. घाटातील माकड टेकडीजवळ ही मोठी दुर्घटना घडली असून, रस्त्यावर भलेमोठे दगड आणि मातीचा ढीग आलाय. यामुळे तळोदा-धडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी तब्बल ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.”नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात माकड टेकडीजवळ अचानक डोंगराचा कडा कोसळला. रस्त्यावर आलेले भलेमोठे दगड आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे या मार्गावरील वाहतूक शंभर टक्के ठप्प झाली आहे.घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन वसावे, कनिष्ठ अभियंता सुधाकर चौरे आणि पोलीस कर्मचारी अजय पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रस्त्यावरील दगडांचा आकार प्रचंड मोठा असल्याने आणि पाऊस थांबत नसल्याने हा रस्ता तातडीने सुरू करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान ४ ते ५ दिवस लागतील असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लहान वाहनांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा ‘अलर्ट’ अजूनही कायम असल्याने, प्रशासनाने नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घाटमार्गावरील प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे.””तर ही होती चांदसैली घाटातील दरड कोसळल्याची थेट अपडेट. आमचे प्रेक्षक आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आमचे आवाहन आहे की, पुढील काही दिवस चांदसैली घाटमार्गाने प्रवास करणे टाळा आणि...

Read More

NANDURABAR – दीड महिन्यानंतर समादीड महिन्यानंतर समाधानकारक पाऊस, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा…

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पिकांनाही मोठा फटका बसला होता. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या भागात आता पिकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड महिन्याच्या कोरड्या कालावधीनंतर झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणही आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला...

Read More

नंदुरबार – शाळा परिसरात माकडाचा धुमाकूळ, वन विभागाचे दुर्लक्ष,विद्यार्थी-शिक्षक भयभीत…..

शहरातील डी आर हायस्कूल व डॉक्टर काणे प्राथमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूल शाळा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. हे माकड दिवसभर शाळेच्या आवारात फिरत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार सूचना देऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आज पुन्हा शाळेत माकडाने उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर माहिती मिळताच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पिंजरा सोबत आणला असतानाही तो लावण्यातच आला नाही त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शाळा परिसरात लहान मुले असल्याने माकड कोणावरही हल्ला करू शकते, अशी भीती पालक आणि शिक्षकांना आहे. गेल्या 3 दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माकड दिवसभर वर्गांजवळ, टाकीवर आणि झाडांवर फिरत असते. आम्हाला मुलांना सांभाळणे कठीण झाले आहे. वन विभागाने तात्काळ माकडाचा बंदोबस्त करावा. शाळा परिसरातील माकडाचा प्रश्न तातडीने सोडवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. Byte – घनश्याम...

Read More

नंदुरबार – सिताखाई पॉईंटवर तरुण 3 हजार फुटावर अडकला …

तोरणमाळच्या सीताखाई पॉईंटवर झिप लाईनचा अनुभव घेण्यासाठी उतरलेला तरुण मध्येच अडकला यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटवर झिप लाईनवर अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली. तोरणमाळच्या सिताखाई पॉईंटवर असलेल्या 3 हजार 500 फूट खोल दरीवर पर्यटकांच्या साहसी खेळासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या झिप लाईनवर एका पर्यटकाचा थरारक अनुभव घेण्याचा प्रयत्न असतानाच पर्यटक झिप लाईनवरून जात असताना अचानक तांत्रिक अडचणीमुळे तो दरीच्या मध्यभागीच अडकला. यामुळे परिसरात काही काळ मोठा थरार आणि घबराट पसरली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून झिप लाईनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अतिशय कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश...

Read More

इनंदुरबार – डिजीटल वीज मीटर प्रकरणी शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक,अधीक्षक अभियंत्यांना घेराव, 8 दिवसात कारवाई न झाल्यास गावबंद आंदोलन…

जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना डिजीटल वीज मीटरमुळे २ ते ३ पट जास्त बिले येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांना घेराव घातला.आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाढीव बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. ठेकेदारांनी परवानगी न घेता शासनाचा धाक दाखवून डिजीटल मीटर बसवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी डिजीटल मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत,डिजीटल मीटरच्या आधारे येणारी वीजबिले तोपर्यंत थांबवावीत ,रात्री अपरात्री होणारी वीज कपात थांबवावी , लेखी वीजबिल घरोघरी पोहोचवण्याची जुनी व्यवस्था सुरू करावीयेत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यात एक दिवस जिल्हा बंद करून कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी, महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, बापू महाजन, दिनेश भोपे, ईम्तियाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते… Byte – रीना पाडवीमहिला...

Read More

धुळे:- कॉलेजांसमोर हिरोगीरी करणाऱ्यांवर कारवाई पोलीसांनी कॉलेज बाहेर काढायला लावल्या “उठाबशा”

धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे शहर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच जे.आर. सिटी हायस्कूल परिसरात विनाकारण वावर करणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संबंधित युवकांकडून २५ उठाबश्या काढून घेत त्यांना समज देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा टवाळखोरी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

नंदुरबार – slug – गावित कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह भाषा : भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल…

Anc – माजी आदिवासी विकास मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याविरोधात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत विजय चौधरी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. गावित कुटुंबीयांबद्दल केलेल्या अपशब्दांमुळे पक्षाच्या आणि जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल ऑडिओ क्लिपची तपासणी केल्यानंतर विजय चौधरी यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेमुळे नंदुरबार मधे राजकीय खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. Byte – सतीश गायकवाडउपविभागीय पोलीस...

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करा -आ. डॉ. गावित समर्थकांची मागणी…

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्याबद्दल अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली नंदुरबारच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी आ डॉ विजयकुमार गावित व त्याच्या कुटुंबियांवर खोटे आरोप करत अपशब्द वापरत असल्याचे ऐकायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला. जिल्ह्याच्या विकासात डॉ. गावित यांचे मोठे योगदान असताना त्यांचा अपमान करणे निंदनीय असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी महामंत्री विजय चौधरी यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यासह गुन्हा नोंदवावा अशी लेखी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन सादर केले आहे . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील , नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते हिरालाल चौधरी, अविनाश माळी ,माजी जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे ,सागर तांबोळी ,नगरसेवक चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी यांच्या सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील जनतेमध्ये तीव्र संताप असून प्रसंगी जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे… Byte -दीपक...

शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू….

शिंदखेडा (प्रतिनिधी): शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकरी दगा लक्ष्मण सोनवणे यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दगा लक्ष्मण सोनवणे हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांना विषारी सर्पाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि डॉ. तेजस जैन यांनी त्यांना मृत घोषित केले.कै, दगा लक्ष्मण सोनवणे यांना दोन मुल एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे कर्ले गावावर शोककळा पसरली असून, शेतकऱ्याच्या अकाली निधनाने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये दुःखाचे वातावरण...

नीट पेपर फुटी आंदोलनाला यश, शिवसेना उबाठा पक्षाचे विद्यार्थ्यांसोबत आनंदोत्सव….

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे नंदुरबारमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील नेहरू चौकात संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी पेढे आणि चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला तसेच पेपरफुटीविरोधी घोषणाबाजी केली.यावेळी बोलताना गुलाबराव वाघ यांनी नीटसारख्या राष्ट्रीय परीक्षेतील पेपरफुटी हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला गंभीर विश्वासघात असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला कारवाई करावी लागली असून हा विद्यार्थी शक्तीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात जिल्हाप्रमुख पंडित माळी, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाटील ,महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे सह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…Byte – पंडित माळी जिल्हाप्रमुख...

Loading

All

Latest

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचितच्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर मंतरवर NEET पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी ने आज रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा ने जाहीर पाठिंबा दिला. बंदच्या समर्थनार्थ नंदुरबार येथे तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. लाठीचार्जमध्ये अटक झालेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका, मृत विद्यार्थ्यांना शहीदाचा दर्जा व 1 कोटी नुकसान भरपाई, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत आणि पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच बीजेपी-आरएसएस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. विक्रम गावित म्हणाले, हे सरकार आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहे. नंदुरबार जिल्हा वंचितच्या बंदमध्ये पूर्णपणे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कॉ. रंजीत गावित, कॉ. करणसिंग कोकणी, कॉ. मनोहर वळवी, कॉ. राजेश वळवी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित...

धुळ्यात एलसीबीची मोठी कारवाई: तब्बल १२ किलो गांजा हस्तगत करत दोन जणांना ठोकल्या बेड्या

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अमली पदार्थ तस्करांविरोधात एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरात बेकायदेशीरपणे गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. दोन इसम एका ॲक्टिवा दुचाकीवरून (क्रमांक MH-18/BK-0311) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची विक्री करण्यासाठी डी.मार्ट जवळील विश्वकर्मा भवन येथे येत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोउनि अमित माळी व त्यांच्या पथकाने विश्वकर्मा भवन परिसरात सापळा रचला. संशयास्पद वाटणाऱ्या त्या दोन तरुणांना थांबवून राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच आणि फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत त्यांची झडती घेण्यात आली.या झडतीदरम्यान पोलिसांना त्यांच्या ताब्यातील गोणीत तब्बल १२ किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.याप्रकरणी आरोपींविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात NDPS (अंमली पदार्थ विरोधी) कायद्यांतर्गत गु.र.नं. २०९/२०२६ नुसार कलम ८(क), २०(ब), २(क), २२(क) आणि २९ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अंमलदार आरिफ पठाण, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील व सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. धुळे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले...

Read More

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहने

*अग्निशमन आपत्कालीन सेवेचे बळकटीकरणासह सक्षमीकरण* नंदुरबार (प्रतिनिधी)- अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहन नगर विकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे दिली आहे. अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्यासाठी व या सेवेचा सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने अग्निसुरक्षा अभियान राबविण्याचे निर्णय शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे. नंदुरबार शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता अग्निशमन वाहनाची गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नगर विकास विभागाकडे वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावाही केला होता. आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मागणीची दखल घेत अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला ९० लाखाचे १ अशा २ वाहनांना १ कोटी ८० लाखाच्या निधी मंजूर केला आहे. नंदुरबार शहराच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळेवर उपाययोजना करण्यासाठी नगर विकास विभागाकडे अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असता नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहनांना मंजुरी मिळालेली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. – आमदार चंद्रकांत...

Read More

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताचे भान जपत भारतीय स्टेट बॅंक एस.सी., एस.टी., बी.सी. कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना भारतीय स्टेट बॅंक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. गणेश वाघमारे, प्रेसिडेंट श्री. राकेश कांबळे, असिस्टंट जनरल सेक्रेटरी डॉ. मनोज पिंपळे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश पाटील आणि सरचिटणीस श्री. अमोल शिंदे यांची होती. या शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या यशस्वी आयोजनासाठी श्री. उल्हास लांडगे, श्री. प्रवीण देवरे, श्री. आनंदराव करनकाळ, श्री. दीपक सोनवणे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. वसंत पाटील, श्री. रावसाहेब पाटील, श्री. संजय बाविस्कर, श्री. बापू साळवे, श्री. नागसेन पेंढारकर, श्री. मनेश बिरारे आणि श्री. हरलाल मोरे यांचे विशेष योगदान लाभले. या शिबिराच्या नियोजनात श्री. देवेंद्र बोरसे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे संयोजन, समन्वय व प्रचार या बाबींचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमात अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केले. सामाजिक एकोपा, जबाबदारी आणि बांधिलकीचे दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काही तरी चांगले करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या रक्तदान शिबिराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. आयोजकांच्या सहकार्यामुळे आणि रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर अत्यंत...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!