जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून बसविलेल्या डिजिटल स्मार्ट मीटरमुळे सामान्य नागरिकांना अवाजवी वीज बिल आणि वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांना निवेदन देण्यात आले. युवासेना उपजिल्हाअधिकारी दिनेश भोपे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात म्हटले की, डिजिटल मीटर बसवल्यापासून घरगुती व शेतकरी ग्राहकांना मागील बिलाच्या तुलनेत 2 ते 3 पट जास्त बिल येत आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यात यामुळे आर्थिक समस्या वाढल्या आहेत. म्हणून डिजिटल मीटर तात्काळ काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, बिले तात्पुरती स्थगित करावीत आणि वीज खंडित करण्यापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे. या प्रश्नाची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर डिजिटल मीटर फोडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख *पंडित माळी*, युवासेना जिल्हाधिकारी *सागर पाटील*, *रमेश पाटील, सुनील सोनार, दिनेश सोनवणे* आदी पदाधिकारी उपस्थित होते.