नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क ब चौ उमवि जळगाव डॉ एम जे रघुवंशी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ॲड. पी एन देशपांडे सर होते. यावेळी ॲड पी एन देशपांडे सरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जागतिक लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे म्हणून बेरोजगारी महागाई वाढत आहे. नोकरी मिळणे कठीण झाले आहे म्हणून युवकांनी स्वयं रोजगाराकडे वळावे असा मौलिक सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम जेरघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक लोकसंख्या वाढीमुळे कमी जागेत जास्त उत्पन्न घेत असल्यामुळे विविध रसायनांचा वापर होतो आणि त्यामुळे शेतीचा ऱ्हास होत आहोत असे सांगून एकत्र कुटुंब पद्धतीने मुलांमध्ये कशी संस्कारांची रुजवणूक होते याबद्दल मार्गदर्शन करतांना कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आपण आदर करावा असे आवाहन केले. ज्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एम आर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डी ए पाटील उपस्थित होते तत्पूर्वी कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ अमोल भुयार यांनी केली तर सूत्रसंचालन प्रा एम बी पाटील यांनी केले तर आभार प्रा मोईन शेख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ एफ आर खांडेकर डॉ दिनेश देवरे प्रा एम जी पाटील डॉ संजय कपले डॉ संदीप भावसार मनीष सावंत प्रा गंगाराम वसावे डॉ डी एस पाटील ,श्री पिंपळे यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक प्राध्यापके तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते