नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च,2023 पर्यंत उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच 2 मार्च,2023 ते 25 मार्च,2023 पर्यत माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च,2023 व 2 मार्च,2023 ते 25 मार्च,2023 या कालावधीतील दहावी व बारावीच्या परिक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही.

 तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत  बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.