Category: निवडणूक

आदर्श निवडणूक आचारसंहिता

आदर्श निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct – MCC) म्हणजे निवडणुकीच्या काळात उमेदवार, राजकीय पक्ष व प्रशासनाने पाळायचे मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम. निवडणुका स्वच्छ, पारदर्शक, आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ही आचारसंहिता अत्यंत महत्त्वाची ठरते. निवडणूक आयोग ही आचारसंहिता निवडणूक जाहीर होताच लागू करतो आणि निवडणुकीचा संपूर्ण कालावधी संपेपर्यंत ती बंधनकारक असते. आचारसंहितेचा उद्देश आणि महत्त्व1. स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणुका: कोणताही पक्ष अथवा उमेदवार जनतेवर चुकीचा प्रभाव पाडू नये.2. राजकीय पक्षांमधील स्पर्धा नैतिक असावी: जाती-धर्मावर आधारित प्रचार रोखणे आणि द्वेषमूलक वक्तव्यांना आळा घालणे.3. प्रशासनाचा गैरवापर टाळणे: सत्ताधारी पक्षाने निवडणुकीदरम्यान सरकारी यंत्रणेचा किंवा निधीचा गैरवापर करू नये.4. वातावरण शांत...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

नंदुरबार – ईद मिलाद व गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन; आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा…

Anc – आगामी ईद मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख सण उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोखा राखत शांततेत साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि नागरिक या बैठकीस उपस्थित होते.बैठकीत आगामी सणांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था, धार्मिक कार्यक्रम तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. ईद मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण परस्पर बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढविणारे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. सणांच्या काळात अफवा, गैरसमज अथवा वादग्रस्त बाबींना खतपाणी घालणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेशांपासून नागरिकांनी दूर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश, फोटो, व्हिडिओ अथवा पोस्ट प्रसारित केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला. नागरिकांनी सोशल मीडियावर कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,नंदुरबार जिल्ह्यातील शांततेची आणि सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ईद मिलाद आणि गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा न देता साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले… Byte – अश्विनी सानपपोलीस अधीक्षक...

नंदुरबारमध्ये अजब कारभार! ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानाच्या प्रमाणपत्रावर चक्क ‘४० तारीख’!” “कॅलेंडरचे नियम बदलले का?

नंदुरबार येथील प्रसिद्ध ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानाच्या पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्रावर चक्क ‘४० तारीख’ टाकण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नियमांनुसार खाद्यपदार्थांच्या दुकानांना कीटक नियंत्रण म्हणजेच पेस्ट कंट्रोल करणे बंधनकारक असते. मात्र, हे प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित एजन्सीने किंवा कर्मचाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठत कॅलेंडरमध्ये अस्तित्वातच नसलेली ‘४० तारीख’ प्रमाणपत्रावर लिहून दिली आहे. या अजब कारभाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत”कॅलेंडरमध्ये महिना ३० किंवा ३१ दिवसांचा असतो, हे अगदी लहान मुलालाही माहिती असतं. फार-फार तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होतो. पण मित्रांनो, तुम्ही कधी ‘४० तारीख’ ऐकली आहे का? आश्चर्य वाटेल, पण नंदुरबारमध्ये चक्क ‘४० तारीख’ अस्तित्वात आल्याचे समोर आले आहे!नंदुरबार शहरातील एका प्रसिद्ध ‘जळगाववाला मावा कुल्फी’ दुकानात हा अजब आणि चक्रावून टाकणारा प्रकार पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी या कुल्फी दुकानदाराने आपल्या दुकानात पेस्ट कंट्रोल करून घेतले. पेस्ट कंट्रोल करणाऱ्या एजन्सीने त्यांना रीतसर प्रमाणपत्रही दिले. मात्र, हे प्रमाणपत्र देताना संबंधित कर्मचाऱ्याने त्यावर पुढील पेस्ट कंट्रोल करण्याची तारीख चक्क ‘४० तारीख’ लिहून दिली!””आता कॅलेंडरच्या नियमांनाच आव्हान देणारी ही ‘४० तारीख’ नेमकी आली कुठून? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दुकानदार आणि प्रशासकीय तपासणी करणाऱ्या यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या या प्रमाणपत्राचा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर मीम्स बनवायला सुरुवात केली असून, ‘या महिन्यात पगाराचे ४० दिवस मोजावे लागणार का?’ अशी विचारणा केली जात आहे.””महत्त्वाची प्रमाणपत्रे जारी करताना किंवा त्यावर सह्या-शिक्के मारताना संबंधित...

Nandurabar:नंदुरबारच्या शुभम पार्कमध्ये मध्यरात्री चोरट्यांची टोळी; नागरिकांमध्ये भीती

११ ऑगस्टच्या मध्यरात्री साडे दोन वाजता शुभम पार्क परिसरात काही संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्या. त्यावेळी कॉलनीतील एक व्यक्ती जागी झाली होती. त्याच व्यक्तीच्या घराच्या दिशेने एक संशयित व्यक्ती आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागून आणखी दोन जण आल्याचे दिसून आले. काही वेळ परिसरात हालचाल केल्यानंतर हे संशयित तेथून निघून गेले. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही साधारण ८ ते १० जणांची चोरट्यांची टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या हातात हत्यारे असल्याचेही सांगण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शुभम पार्क परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती...

Navapur:-ऑर्डर घेत असताना युवकावर चाकूने हल्ला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

*नवापूर -नवापूर तालुक्यातील धडधड्या येथे दुकानावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ऑर्डर घेत असलेल्या युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. कृणाल गोसावी, नामक युवक गोपाल वेफर्स नवापूर येथे ऑर्डर घेण्याचे काम करतो. जुन्या किरकोळ वादातून *कमलेश गोसावी, विशाल गोसावी, सुमित गोसावी, अक्षय बंजारा* अशी 4 ते 5 मुलांनी कृणाल यांच्या छातीवर धारदार चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. कृणाल यांनी हात आडवा घालून व धक्का देऊन जीव वाचवला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या पायाला चाकू लागून 2 टाके पडले आहेत. या प्रकरणी *नवापूर पोलीस ठाण्यात BNS कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत. या संदर्भात आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिडितकडून करण्यात आली...

नंदुरबार :- विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा होणार; नंदुरबार पोलिसांचा चोख बंदोबस्त,आदिवासी बांधवांचे पोलिसांकडून स्वागत; शस्त्रे व आक्षेपार्ह साहित्य न आणण्याचे आवाहन…

9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस सर्वत्र साजरा करण्यात येती.विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात तसेच शहरात उत्साहाचे वातावरण असून, हा दिवस शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम, रॅली आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात येणाऱ्या आदिवासी बांधवांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व बंधुभावाचे वातावरण कायम ठेवत हा दिवस उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने मिरवणुकीत अथवा कार्यक्रमस्थळी शस्त्रे, धारदार वस्तू किंवा इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये आणि कोणालाही दुखापत होऊ नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.तसेच सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, कायद्याचे पालन करावे आणि शांततेत हा दिवस साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे….Byte – अश्विनी सानप पोलीस अधीक्षक...

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण: भाजप नेते विजय चौधरी जिल्हा रुग्णालयात दाखल

नंदुरबार व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले भाजप नेते विजय चौधरी यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. विजय चौधरी यांच्या विरोधात दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासा दरम्यान न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय चौधरी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून उपचार व निरीक्षण सुरू आहे. दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या प्रकरणात पुढील तपासा दरम्यान काय निष्पन्न होते याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष लागले...

Loading

All

Latest

शिरपूर आगाराच्या एसटी ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्वागत !

धुळे विभागातील शिरपूर आगारात आज नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन करून सेवेला शुभारंभकरण्यात आला या नव्या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवासी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात...

क्राईम

Latest

धुळे:- कॉलेजांसमोर हिरोगीरी करणाऱ्यांवर कारवाई पोलीसांनी कॉलेज बाहेर काढायला लावल्या “उठाबशा”

धुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे शहर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान विद्यावर्धिनी महाविद्यालय, कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच जे.आर. सिटी हायस्कूल परिसरात विनाकारण वावर करणाऱ्या काही युवकांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात संबंधित युवकांकडून २५ उठाबश्या काढून घेत त्यांना समज देण्यात आली. भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन किंवा टवाळखोरी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने...

“ब्रेकिंग न्यूज: चांदसैली घाटात भीषण दरड कोसळली; तळोदा-धडगाव संपर्क तुटला!”

सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण दरड कोसळली आहे. घाटातील माकड टेकडीजवळ ही मोठी दुर्घटना घडली असून, रस्त्यावर भलेमोठे दगड आणि मातीचा ढीग आलाय. यामुळे तळोदा-धडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी तब्बल ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.”नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे सातपुडा पर्वतरांगेतील चांदसैली घाटात माकड टेकडीजवळ अचानक डोंगराचा कडा कोसळला. रस्त्यावर आलेले भलेमोठे दगड आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे या मार्गावरील वाहतूक शंभर टक्के ठप्प झाली आहे.घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नितीन वसावे, कनिष्ठ अभियंता सुधाकर चौरे आणि पोलीस कर्मचारी अजय पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रस्त्यावरील दगडांचा आकार प्रचंड मोठा असल्याने आणि पाऊस थांबत नसल्याने हा रस्ता तातडीने सुरू करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान ४ ते ५ दिवस लागतील असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लहान वाहनांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा ‘अलर्ट’ अजूनही कायम असल्याने, प्रशासनाने नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घाटमार्गावरील प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे.””तर ही होती चांदसैली घाटातील दरड कोसळल्याची थेट अपडेट. आमचे प्रेक्षक आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आमचे आवाहन आहे की, पुढील काही दिवस चांदसैली घाटमार्गाने प्रवास करणे टाळा आणि...

Read More

NANDURABAR – दीड महिन्यानंतर समादीड महिन्यानंतर समाधानकारक पाऊस, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा…

पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पिकांनाही मोठा फटका बसला होता. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या भागात आता पिकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड महिन्याच्या कोरड्या कालावधीनंतर झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणही आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला...

Read More

नंदुरबार – शाळा परिसरात माकडाचा धुमाकूळ, वन विभागाचे दुर्लक्ष,विद्यार्थी-शिक्षक भयभीत…..

शहरातील डी आर हायस्कूल व डॉक्टर काणे प्राथमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूल शाळा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. हे माकड दिवसभर शाळेच्या आवारात फिरत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार सूचना देऊनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. आज पुन्हा शाळेत माकडाने उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या आरडाओरडीनंतर माहिती मिळताच वन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पिंजरा सोबत आणला असतानाही तो लावण्यातच आला नाही त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शाळा परिसरात लहान मुले असल्याने माकड कोणावरही हल्ला करू शकते, अशी भीती पालक आणि शिक्षकांना आहे. गेल्या 3 दिवसांपासून वारंवार तक्रारी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माकड दिवसभर वर्गांजवळ, टाकीवर आणि झाडांवर फिरत असते. आम्हाला मुलांना सांभाळणे कठीण झाले आहे. वन विभागाने तात्काळ माकडाचा बंदोबस्त करावा. शाळा परिसरातील माकडाचा प्रश्न तातडीने सोडवून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे. Byte – घनश्याम...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!