Month: April 2020

नंदुरबारात विद्यार्थी घेतायेत तंत्रस्नेही शिक्षण

नंदुरबार ( प्रतिनिधी) – आजच्या युगात तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व शाळा बंद आहे मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आज तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नंदुरबारच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने जबाबदारी घेत शिक्षकांना प्रशिक्षण दिले. तंत्रस्नेही शिक्षक आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव देत आहेत.नंदुरबारच्या पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत विद्यार्थ्यांना घरी बसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शाळेचे प्राचार्य श्री.मुकुंद इंगळे यांनी या उपक्रमाबाबत बोलतांना सांगितले की, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षाचे नियोजन केले असून, त्यांना विविध शैक्षणिक अनुभव गूगल व झूम फीचर्स द्वारे तसेच विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थांना संकल्पना समजण्यासाठी त्यांना लागणारी ई पुस्तके,पीपीटी, व्हिडिओ आणि कार्यपत्रक देत असतो. यात शिक्षक थेट विद्यार्थ्यांशी संपर्क करीत त्यांना शिकवत असतात. या वर्चुअल लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान आत्मसात होत आहे. याखेरीज 1 एप्रिलला विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा कारकीर्दीचा आढावाही वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे घेण्यात आला. शिक्षकांनी पालकांशी थेट वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे संवाद साधत विद्यार्थ्यांचा गुणपत्रकाची माहिती दिली. यात पालकांशी साधलेल्या चर्चेत थेट वर्चुअल (वास्तविक) लर्निंगद्वारे पालकांनीही शाळेच्या विलक्षण नियोजनाचे कौतुक केले. या स्तुत्य उपक्रमासाठी प्राचार्य श्री.मुकुंद इंगळे यांनी पोदार संस्थेचे विश्वस्त श्री.पवन पोदार, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख श्री.आनंद चावला तसेच शाळेला नाविन्यपूर्ण शैक्षणिक योजना हस्तांतरित करणाऱ्या श्रीमती. रेनी बिजलानी व सर्व टीमचे आभार मानले आहेत. या अनोख्या वर्चुअल (वास्तविक) लर्निंग पद्धतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक सुसंवाद साधला जात असून, लॉकडाऊनचा काळातही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत नसून...

Read More

कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वच्छाग्रहींचा पुढाकार

नंदुरबार-( प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या लढाईत जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत असलेले स्वच्छाग्रही सहभागी झाले असून, स्वच्छाग्रहीमार्फत ग्रामीण भागात स्वच्छ हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक च्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येऊन ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावात औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच ग्राम स्तरावर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छाग्रही यांच्यामार्फत कोरोना या संसर्ग आजारापासून बचाव होण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे, हात धुणे, तोंडाला नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीवजागृती करण्यात येत आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छतेविषयक बाबींवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व स्वच्छतेविषयक ग्रामपंचायत स्तरावर जाणीव जागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंसेवक म्हणून एक किंवा दोन असे एकूण ११४८ स्वच्छाग्रही नियुक्त करण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहीची ग्रामस्तरावरील स्वच्छते विषयक कामांसाठी शासनाला नेहमीच मदत होते. कोरोना विरुद्धच्या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणेबाबत राज्यस्तरावरून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावात काम करणेबाबत प्रोत्साहित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींनी कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थांच्या...

Read More

मोदींना पाहिजे यासाठी तुमची साथ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशभरात आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याबाबतची मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी केली जाईल. आपल्या देशात करोनाचे ५५० रुग्ण होते, तेव्हाच आपण २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा संकल्प केला. इतर देशांच्या तुलनेत चांगलं काम केल्यामुळेच परिस्थिती अत्यंत नियंत्रणात असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा १४ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारकडून नवीन लॉकडाऊनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे. सर्व वर्गांचा विचार करुन लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशवासियांकडून पंतप्रधान मोदी यांनी सात मुद्द्यांवर साथ मागितली आहे.या सात गोष्टींवर मागितली साथघरातील वृद्धांची विशेष काळजी घ्या, ज्यांना अगोदरच आजार असतील त्यांची आणखी काळजी घ्या. त्यांना करोनापासून वाचवा. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं काटेकोर पालन करा. घरात तयार मास्कचा वापर करा. स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाटी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या गोष्टी करा. करोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड करा आणि इतरांनाही याबाबत सांगा. शक्य तेवढं गरीब कुटुंबाची देखरेख करा आणि जेवणाची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय आणि उद्योगात तुमच्यासोबत काम करत असलेल्या सहकाऱ्यांविषयी सहवेदना ठेवा, त्यांना कामावरुन काढून टाकू नका. देशातील करोना युद्धातील डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलीस या सर्वांचा आदर करा, अशा सात गोष्टींसाठी साथ हवी असल्याचंही मोदी म्हणाले. विजय मिळवण्यासाठी ही सप्तपदी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. १. घरातील ज्येष्ठांची...

Read More

कोविड-19 प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नंदुरबार (प्रतिनिधी) -‍पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19 चा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य तपासणी, सीमाबंदी, स्वच्छता, मदत कार्य, रुग्णालय सज्जता अशा विविध पातळ्यांवर प्रशासनाने तयारी केली आहे. भविष्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमतेने सामारे जाण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 125 दवाखान्यात एकूण 1084 बेड्स आहेत. एक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात 52 बेड्स उपलब्ध आहेत. या कक्षात 11 रुग्ण दाखल आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 क्वॉरंटाईन कक्ष स्थापन करण्यात आली असून 334 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. 22 संशयित व्यक्तींना या कक्षांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर 24 व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्रिस्तरीय रचनेनुसार कोविड केअर सेंटर 6 असून त्याची क्षमता 334 आहे. कोविड हेल्थ सेंटर 5 असून त्याची क्षमता 210 आहे. कोविड हॉस्पिटल 1 असून त्याची क्षमता 100 बेड्सची आहे. जिल्ह्यात 3 व्हेंटीलेटर उपलब्ध असून 10 अतिरिक्त व्हेंटीलेटर्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. मुबलक प्रमाणात औषधे, सॅनिटायझर, मास्क उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रिसोर्स मॅपिंग करण्यात आले आहे. बीएसएल-3 लक्षणांनी बाधित असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी  100 कर्मचारी व इतर पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात विदेशातून प्रवास करून आलेल्य 48 प्रवासी आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात कोविड-19 आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत. जिल्ह्यात बाहेरील राज्य व जिल्ह्यातील मजूरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी 10 निवारा गृह स्थापन करण्यात आली असून त्याची क्षमता 614 आहे. अकोला,...

Read More

नवापुरच्या सीमा सुरक्षित करा आमदार शिरीष नाईक यांच्या सूचना

नवापूर (प्रतिनिधी) : गुजरातमधून येणारे मजूर तालुक्याची डोकेदुखी ठरली आहे. त्यांनी आहेत तेथेच थांबावे, असे आवाहन करीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी आता तालुक्यात येणारे सर्व रस्ते बंद केले जात आहेत. गावागावातील लोकांची त्यासाठी मदत घेण्यात येईल. शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल, असे आ. शिरीषकुमार नाईक यांनी सांगितले.नवापूर येथे पालिका सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. श्री. नाईक म्हणाले, तहसीलदारांनी रेशन दुकानदारांना सूचना कराव्यात, प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळेल कोणीही मनमानी कारभार करणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरात प्रभागनिहाय समित्या तयार करून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती संकलित करण्यात याव्यात, अश्या सूचना त्यांनी दिल्या.तालुक्यातील सीमेवर कडक बंदोबस्ताची आवश्यकता असल्याने आज नवापूर तालुक्यात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. परराज्यातून येणारे काही लोक छुप्या मार्गेने प्रवेश करीत आहेत, त्यांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कोणीही आपल्या गावात प्रवेश करणार नाही, याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी. अशी कुणी व्यक्ती गावात आल्या प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. सीमावर्ती भागातून कुणीही जिल्ह्यात घुसखोरी करणार नाही, याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी, असेही आमदारांनी सांगितले.नगराध्यक्षा श्रीमती हेमलता पाटील यांनी पालिकेमार्फत सुरू असलेल्या सुविधांची माहिती दिली.शहरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येईल. चाळीस ते पन्नास जणांना परिचारिकेचे प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांच्या मार्फत शहरातील नागरिकांची तपासणी होईल. २५५ आरोग्य पथक तालुक्यात कार्यरत आहेत. ते आपल्या कार्यात सतर्कता पाळत आहेत. ग्रामसुरक्षा दल सक्रिय झाली आहेत. सरपंच, पोलिस पाटील व लोकप्रतिनिधीही...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!