नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- औरंगाबाद क्षेत्र संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 17 मार्च 2021 रोजी आयोजित केलेल्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे.

या डाक अदालतीत टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार मोहम्मद खदिर, सहाय्यक निदेशक डाकसेवा, पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांचेकडे 10 मार्च पर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. तक्रार अर्जाचा नमुना www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद क्षेत्र यांनी कळविले आहे.