नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अक्राणी तालुक्यातील 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी वनबंधु कल्याण योजनेंतर्गत सजानिहाय उद्दिष्टानुसार 196 लाभार्थ्यांपैकी 73 लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे अंतिम निवड सोमवार 22 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्प कार्यालय तळोदा जि.नंदुरबार येथे होणार आहे. सोडतीदरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करावे. मास्क परिधान करुन निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अविषांत पंडा (तळोदा) यांनी केले आहे.