नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ  नागरिकांच्या तक्रारींचे निवारण  आणि  त्यांना इतर सेवा देण्यासाठी  सामाजिक  न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत सर्व राज्यात ‘राष्ट्रीय हेल्पलाईन’ सुरू  करण्यात आली आहे.

राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.