Category: निवडणूक

आदर्श निवडणूक आचारसंहिता

आदर्श निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct – MCC) म्हणजे निवडणुकीच्या काळात उमेदवार, राजकीय पक्ष व प्रशासनाने पाळायचे मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम. निवडणुका स्वच्छ, पारदर्शक, आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी ही आचारसंहिता अत्यंत महत्त्वाची ठरते. निवडणूक आयोग ही आचारसंहिता निवडणूक जाहीर होताच लागू करतो आणि निवडणुकीचा संपूर्ण कालावधी संपेपर्यंत ती बंधनकारक असते. आचारसंहितेचा उद्देश आणि महत्त्व1. स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणुका: कोणताही पक्ष अथवा उमेदवार जनतेवर चुकीचा प्रभाव पाडू नये.2. राजकीय पक्षांमधील स्पर्धा नैतिक असावी: जाती-धर्मावर आधारित प्रचार रोखणे आणि द्वेषमूलक वक्तव्यांना आळा घालणे.3. प्रशासनाचा गैरवापर टाळणे: सत्ताधारी पक्षाने निवडणुकीदरम्यान सरकारी यंत्रणेचा किंवा निधीचा गैरवापर करू नये.4. वातावरण शांत...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताचे भान जपत भारतीय स्टेट बॅंक एस.सी., एस.टी., बी.सी. कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना भारतीय स्टेट बॅंक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. गणेश वाघमारे, प्रेसिडेंट श्री. राकेश कांबळे, असिस्टंट जनरल सेक्रेटरी डॉ. मनोज पिंपळे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश पाटील आणि सरचिटणीस श्री. अमोल शिंदे यांची होती. या शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या यशस्वी आयोजनासाठी श्री. उल्हास लांडगे, श्री. प्रवीण देवरे, श्री. आनंदराव करनकाळ, श्री. दीपक सोनवणे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. वसंत पाटील, श्री. रावसाहेब पाटील, श्री. संजय बाविस्कर, श्री. बापू साळवे, श्री. नागसेन पेंढारकर, श्री. मनेश बिरारे आणि श्री. हरलाल मोरे यांचे विशेष योगदान लाभले. या शिबिराच्या नियोजनात श्री. देवेंद्र बोरसे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे संयोजन, समन्वय व प्रचार या बाबींचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमात अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केले. सामाजिक एकोपा, जबाबदारी आणि बांधिलकीचे दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काही तरी चांगले करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या रक्तदान शिबिराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. आयोजकांच्या सहकार्यामुळे आणि रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर अत्यंत...

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!