Author: Ramchandra Bari

मनरेगाच्या माध्यमातून 16 हजार मजूरांच्या हाताला काम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहिम

नंदुरबार : कोविड-19 च्या संकटात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 16 हजार 725 मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगा अंतर्गत शेल्फवर 32 हजार कामे ठेवण्यात आली असून 31 हजार अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. एकूण 363 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. अक्कलकुवा तालुक्यात 3736, अक्राणी 3130, नंदुरबार 1977, नवापूर 3160, शहादा 2742 आणि तळोदा तालुक्यात 1980 मजूर कामावर आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दुर्गम भागातील आदिवासी मजूरांना  रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर संख्येच्या बाबतीत जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असून 40 हजार मजूरांना रेाजगार उपलब्ध करून देत जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. मजूरांना एका दिवसासाठी 238 रुपये मजूरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत 100 टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. आतापर्यंत दीड कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  योजनेविषयी आणि उपलब्ध कामाविषयी माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कामांचे संनियंत्रण आणि येणाऱ्या अडचणी  दूर करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. कृषी विभागातर्फे 73, वन विभागातर्फे 93, सामाजिक वनीकरण विभागातर्फे 23 आणि...

Read More

बारा लाख लाभार्थ्यांना धान्याचे वाटप लॉकडाऊनच्या काळात गरजू नागरिकांना मोठा दिलासा

नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे रोजगार धोक्यात आले असताना सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत  वितरीत करण्यात आलेले स्वस्त धान्य आणि  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदळामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत  अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील 12 लाख 84 हजार 321 लाभार्थ्यांना  3097 मे.टन गहू आणि 10801 मे.टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी 6421 मे.टन तांदूळ मोफत वितरीत करण्यात आला आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचे 95 टक्के तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 97 टक्के अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 98 टक्के मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांव्यतिरिक्त साधारण 3 लाख 27 हजार केशरी कार्ड सदस्यांकरिता गहू व तांदूळ दुकानदारांमार्फत वितरीत करण्यात येत आहे. याशिवाय अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति कार्ड 1 किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. त्याकरीता 106 मे.टन तूरडाळ व 106 मे.टन चनाडाळ प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात 1061 स्वस्त धान्य दुकानदार असून आतापर्यंत 11 स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धान्य वाटप करताना तलाठी, ग्रामसेवक, केंद्र अधिकारी यांचेद्वारा लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेष पथकाद्वारे गोदामाचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना धान्याचा लाभ देण्यासाठी त्यांची ऑनलाईन नोंदणी तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी पाडवी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनीदेखील मोहिमस्तरावर हे काम करण्याचे निर्देश दिले असून धान्य वितरणात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हाभरात शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष मोहिम...

Read More

अडीच हजार नागरीक विशेष रेल्वेने उत्तर भारताकडे रवाना सोशल‍ डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन

नंदुरबार : आज सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे 1210 आणि पुर्णिया येथे 1290 नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. रेल्वेने गेलेल्या नागरिकात नवापूर, शहादा, येथील मजूर व अक्कलकुवाच्या जामिया संकुलातील आणि शहादा येथील एका संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.  सकाळपासून विविध वाहनाने या सर्वांना रेल्वे स्थानकात आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दोन व्यक्तीत  विशिष्ट अंतर ठेऊन त्यांना रेल्वे गाड्यात बसविण्यात आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक  करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनिल नंदावळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी आणि उप शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी रेल्वे स्थानक परिसरातले नियोजन उत्तमरितीने केले. दोन्ही दिवस मिळून चार रेल्वे गाड्यांद्वारे आतापर्यंत 4514 नागरिकांना बिहारच्या विविध भागात पाठविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन बिहारच्या प्रशासनाशी सातत्याने संपर्कात होते. जिल्ह्याच्या इतर भागात अडकलेल्या स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत...

Read More

नंदुरबारकरांसाठी दिलासा दायक बातमी

नंदुरबार जिल्ह्यातुन आज दिलासा दायक बातमी मिळाली असुन पहिल्या चार कोरोणा बाधीतांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात एका ७१ वर्षीय आजी बाईचा समावेश असुन एकाच कुटुंबातील असलेल्या या चारही जणांनी उपचाराबाबत समाधान व्यक्त केले आहे. इतकच नव्हे तर कोरोणावर मात करणाऱया या चारही जनांनी गरज भासल्यास आपला प्लाझमा देखील देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. १७ तारखेला नंदुरबार शहरातील अलीसाहब मोहल्ला मधील एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता आणि त्यांनतंर त्याच्या संपर्कातील आणखीन तीन कुटुंबीय देखील पॉझीटीव्ह आले होते. दरम्यान जिल्ह्यातील १९ कोरोणा बाधीतांपैकी एकाचा मृत्यु झाला असुन आता चार जण उपचार घेवुन घरी परतल्याने उपचार घेणाऱया कोरोणा बाधीतांची संख्या आता १४ इतकी राहीली...

Read More

जिल्ह्यातील आदिवासी मजूरांना आणण्यासाठी नियत्रंण कक्षाची स्थापना

नंदुरबार :  आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या  निर्देशानुसार राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या आदिवासी मजूर आणि विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार असून तेथून मिळालेल्या आदिवासी व्यक्तींच्या माहितीच्या आधारे वाहन व्यवस्था करून त्यांना जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी तळोदा आणि नंदुरबार प्रकल्प कार्यालय परस्पर समन्वयाने कार्य करीत आहे. राज्यातील तसेच परराज्यात असलेल्या जिल्ह्यातील  आदिवासी नागरिकांची माहिती संकलनाचे कामदेखील करण्यात येत आहे. पुणे येथून 480 व्यक्तींना  परत आणण्यात येत असून त्यापैकी जिल्ह्यातील 409 मजूर नंदुरबारकडे 17 बसेसद्वारे येत आहेत. त्यात नंदुरबार 45,नवापुर 15,शहादा 88,तळोदा 32,धडगाव 120 तर अक्कलकुवा तालुक्यातील 109 व्यक्तींचा समावेश आहे. सध्याच्या लॉकडाऊन स्थितीत स्थलांतरीत मजूर राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेला असून या कालावधीत रोजगार नसल्याने त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी व स्थलांतरित ठिकाणाहून मूळगावी येण्यासाठी पैसे उपलब्ध नाही. या आपत्तीच्या कालावधीत मजुराना मूळ गावी परतण्यासाठी आदिवासी विकास विभागाने 17 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहे. सदर बसेस संपुर्ण सॅनेटायझ करण्यात आल्या प्रत्येक बसमध्ये 12 मजूर बसविण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान  भोजनाची सोयही आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत आहे.             सर्व 409 मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन त्यांना जिल्ह्यात आल्यावर होम क्वॉरटाईन करण्यात येणार आहे. त्या सर्व मजूरांना जिल्हा क्रिडा संकुल,नंदुरबार येथे आणण्यात येणार आहे. या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नंदुरबार व तळोदा यांच्या समन्वयातुन तालुका निहाय सहा कक्षाची स्थांपना करण्यात आलेली आहे. त्यासाठी दोन्ही...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!