कोरोना नियंत्रीत करण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करा- ॲड. के.सी.पाडवी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रीत करण्यासाठी प्रशासन चांगला प्रयत्न करत असून नागरिकांनी नियमित मास्क लावणे, साबणाने नियमित हात धुणे, शारिरीक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ॲड.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न...
Read More
