Author: Ramchandra Bari

कोरोना नियंत्रीत करण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करा- ॲड. के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रीत करण्यासाठी प्रशासन चांगला प्रयत्न करत असून नागरिकांनी नियमित मास्क लावणे, साबणाने नियमित हात धुणे, शारिरीक अंतर राखणे  या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ॲड.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न...

Read More

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.  जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे उघडले असून 75,125 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील  नदीतील पाणी काही कालावधीत तापी नदीत दाखल होण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचा पाणी विसर्ग अजून वाढणार आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 8 वाजता प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 25 हजार 61 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे 4 दरवाजे 2 मीटर उंचीने उघडण्यात आले असून 28 हजार 19 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले...

Read More

राज्यातील सुमारे पाऊणे चार हजार शिक्षक स्वगृही

नंदुरबार (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सुमारे पाऊणे चार हजार जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने सन २०२० ची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून, जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत आदेश देण्यात आले असल्याची माहिती, शासनाचे राज्य बदली समन्वयक तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी दिली. राज्य शासनाच्या २७/०२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली साठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. कोविड विषाणूच्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांच्या बदल्या होतील किंवा नाही? याबाबत प्रश्नचिन्ह...

Read More

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी 35 कोटींचा आराखडा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 35 कोटी 17 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 21 कोटी 10 लाख केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते. नवीन तलावाची निर्मिती, अस्तरीकरणाचे तळे, मत्स्य बोटुकले संचयन आदी  14 योजनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा शासनास सादर केला जाणार...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!