स्तर निश्चिती करून अध्ययन अनुभव द्या!
नंदुरबार (प्रतिनिधी) :- तब्बल दिड वर्षांच्या दीर्घ अवकाशाचानंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळांमध्ये येत असून, या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून त्यांच्यासाठी सुयोग्य अध्ययन अनुभव निवडावे लागतील, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी यांनी केले.शासनाने ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरू करण्याची अधिसूचना जारी केली. त्या अनुषंगाने आज दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. काही ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला, तर काही ठिकाणी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील जिल्हा परिषद...
Read More