Author: n7news

१७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली ;– ३ मे रोजी लॉकडाऊन संपत असतांना आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने आज जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. मात्र याच दिवशी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला होता. यानंतर ३ मे रोजी लॉकडाऊन संपेल की नाही याबाबत संभ्रम असतांना आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. अर्थात आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला...

Read More

दुकाने उघडण्यास केंद्र शासनाची सशर्त परवानगी

मुंबई : केंद्र सरकारने शनिवारपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मद्य विक्रीची दुकाने आणि मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार देशातील सर्व दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान करोना व्हायरचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या तसंच हॉटस्पॉट असेलेल्या ठिकाणांमध्ये मात्र दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत. ५० टक्के मनुष्यबळ, शारिरीक अंतराचे पालन, मास्क आणि हँड ग्लोव्हस्चा वापर अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली असली तरी राज्य सरकारांच्या निर्देशांची वाट दुकानदार पाहत...

Read More

जिल्ह्यात कोरोनचा संसर्ग वाढू न देण्यासाठी ‘इस्लामपूर मॉडेल’वर चर्चा

नंदुरबार दि.21-‍  जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करीत असून या संदर्भात प्रभावी ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील ‘इस्लामपूर मॉडेल’वर पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली.या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी, नंदुरबारचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एन.बोडके तसेच जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.श्री.राऊत यांनी इस्लामपूरने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या केंटेनमेंट आरखड्यानुसार प्रतिसाद यंत्रणा कार्यरत करण्यात आली. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची छाननी, त्यांचे मोबाईल ट्रॅकींग, अतिजोखमीच्या व्यक्तींना क्वॉरंटाईन करणे, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविणे, पॉझिटीव्ह व्यक्तींना आयसोलेशन कक्षात ठेवणे, कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींची 14 दिवस तपासणी, परिसराचे निर्जंतुकीकरण, जीवनावश्यक वस्तू घरपोच देणे,बफर झोनमधील सर्वेक्षण आदी उपाययोजना केल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याचे त्यांनीसांगितले.इस्लामपूरचा अनुभव नंदुरबार जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री पाडवी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी सांगलीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कार्ययोजनच्या विविध पैलूंची माहिती दिली. चर्चेतील मुद्यांचा अभ्यास करून नंदुरबार शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात यानुसार कार्यवाही करण्यात यावी. परिसरातील नागरिकांना प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी व नियमित वैद्यकीय तपासणी करावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.इस्लामपूर मॉडेलनुसार शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून परिसरात वैद्यकीय सर्वेक्षणावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना बाहेर पडू न देता त्यांना विविध सेवा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. चर्चेतील माहितीनुसार कारोना...

Read More

कोविड-19 प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नंदुरबार (प्रतिनिधी) -‍पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19 चा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य तपासणी, सीमाबंदी, स्वच्छता, मदत कार्य, रुग्णालय सज्जता अशा विविध पातळ्यांवर प्रशासनाने तयारी केली आहे. भविष्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमतेने सामारे जाण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 125 दवाखान्यात एकूण 1084 बेड्स आहेत. एक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात 52 बेड्स उपलब्ध आहेत. या कक्षात 11 रुग्ण दाखल आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 क्वॉरंटाईन कक्ष स्थापन करण्यात आली असून 334 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. 22 संशयित व्यक्तींना या कक्षांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर 24 व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्रिस्तरीय रचनेनुसार कोविड केअर सेंटर 6 असून त्याची क्षमता 334 आहे. कोविड हेल्थ सेंटर 5 असून त्याची क्षमता 210 आहे. कोविड हॉस्पिटल 1 असून त्याची क्षमता 100 बेड्सची आहे. जिल्ह्यात 3 व्हेंटीलेटर उपलब्ध असून 10 अतिरिक्त व्हेंटीलेटर्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. मुबलक प्रमाणात औषधे, सॅनिटायझर, मास्क उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रिसोर्स मॅपिंग करण्यात आले आहे. बीएसएल-3 लक्षणांनी बाधित असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी  100 कर्मचारी व इतर पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात विदेशातून प्रवास करून आलेल्य 48 प्रवासी आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात कोविड-19 आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत. जिल्ह्यात बाहेरील राज्य व जिल्ह्यातील मजूरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी 10 निवारा गृह स्थापन करण्यात आली असून त्याची क्षमता 614 आहे. अकोला,...

Read More

नवापुरच्या सीमा सुरक्षित करा आमदार शिरीष नाईक यांच्या सूचना

नवापूर (प्रतिनिधी) : गुजरातमधून येणारे मजूर तालुक्याची डोकेदुखी ठरली आहे. त्यांनी आहेत तेथेच थांबावे, असे आवाहन करीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी आता तालुक्यात येणारे सर्व रस्ते बंद केले जात आहेत. गावागावातील लोकांची त्यासाठी मदत घेण्यात येईल. शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल, असे आ. शिरीषकुमार नाईक यांनी सांगितले.नवापूर येथे पालिका सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. श्री. नाईक म्हणाले, तहसीलदारांनी रेशन दुकानदारांना सूचना कराव्यात, प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळेल कोणीही मनमानी कारभार करणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरात प्रभागनिहाय समित्या तयार करून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती संकलित करण्यात याव्यात, अश्या सूचना त्यांनी दिल्या.तालुक्यातील सीमेवर कडक बंदोबस्ताची आवश्यकता असल्याने आज नवापूर तालुक्यात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. परराज्यातून येणारे काही लोक छुप्या मार्गेने प्रवेश करीत आहेत, त्यांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कोणीही आपल्या गावात प्रवेश करणार नाही, याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी. अशी कुणी व्यक्ती गावात आल्या प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. सीमावर्ती भागातून कुणीही जिल्ह्यात घुसखोरी करणार नाही, याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी, असेही आमदारांनी सांगितले.नगराध्यक्षा श्रीमती हेमलता पाटील यांनी पालिकेमार्फत सुरू असलेल्या सुविधांची माहिती दिली.शहरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येईल. चाळीस ते पन्नास जणांना परिचारिकेचे प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांच्या मार्फत शहरातील नागरिकांची तपासणी होईल. २५५ आरोग्य पथक तालुक्यात कार्यरत आहेत. ते आपल्या कार्यात सतर्कता पाळत आहेत. ग्रामसुरक्षा दल सक्रिय झाली आहेत. सरपंच, पोलिस पाटील व लोकप्रतिनिधीही...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!