नंदुरबार दि.26 :  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या तसेच नवीन पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे ,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे उपस्थित होते.