नदुरबार :-  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आदिवासी विकास विभागाने आज  खावटी अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील १५ लाख आदिवासी कुटुंबाना प्रत्येकी ३ हजारांप्रमाणे मदत केली जाणार आहे. यातील निम्मे म्हणजे १५०० रुपये मनिआर्डरने डीबीटी केली जाणार आहे. तर उर्वरीत 1500 रुपयांमध्ये जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा केला जाणार आहे.

  लॉकडाऊननंतर आदिवासी कुटुंबांच्या अर्थार्जनाची अडचण लक्षात घेवुन आदिवासी विकास विभागाने ही योजना तयार केली आहे. आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी ह्या योजनेबद्दल माहीती दिली.           राज्यातील सर्व  मनसरगा कामावरील आदिवासी जमातीचे सर्व कुटुंब , पारधी जमातीचे सर्व कुटुंब, तसेच  प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेले गरजू आदिवासी कुटुंबांना ह्या खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.  पुढील मंत्रीमंडळ बैठकीत योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता असुनस, सध्या आदिवासी खात्यात शिल्लक असलेल्या निधी आणि इतर ठिकाणाहुन या योजनेला अर्थपुरवठा होणार असल्याची माहीती आदिवासी विकास मंत्री अॅड के. सी. पाडवी यांनी दिली.