नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अनलॉक प्रक्रियेतील सुधारीत सूचना,  वेळोवेळी शिथिल करण्यात आलेले निर्बंध, सुट किंवा मुभा देण्यात आलेल्या बाबींसंदर्भातील आदेश कायम ठेवून  फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 च्या कलम 144 नुसार जिल्ह्यात 30 नोव्हेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीस मुदतवाढ देण्याचे आदेशित केले आहे.

सदर आदेशाचे सर्व नागरिकांनी पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.