नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह किंवा घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यासासाठी नागरिकांकडून मागणी आल्यास त्यास परवानगी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

उपविभागीय अधिकारी नंदुरबार, शहादा व तळोदा आणि कार्यकारी दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर नवापुर, अक्कलकुवा, अक्राणी यांनी त्यांच्यास्तरावरून ही परवानगी द्यावी आणि परवानगी दिलेल्या लग्नसमारंभाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.