Category: अजब

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर  जिल्ह्यातदेखील येत्या 24 तासात पाऊस, अतिवृष्टी, तसेच जोराचे वादळवारे वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालयाकरीता निर्देश तालुक्यातील सर्व तहसिल कार्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत. या कक्षात महसूल, नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, विज वितरण, कृषी विभागातील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. नियंत्रण कक्षातून तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक,मंडल अधिकारी, कृषीसेवक यांच्याशी वेळोवेळी संपर्क करुन गावातील स्थितीचा आढावा घेण्यात यावा. याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाला (दूरध्वनी क्रमांक 02564-210006) अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील सर्व आपात्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावीत. तालुक्यातील असुरक्षित घरांचा आढावा घेऊन तेथील नागरिकांना तात्काळ समाजमंदीर, शाळा किंवा गावातील सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात यावे. नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावामध्ये खबरदारी म्हणून घंटागाडी, दवंडीद्वारे, सोशल मिडीयाद्वारे नागरिकांना चक्रीवादळाच्या दृष्टीने सुरक्षेबाबत अवगत करावे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परवानगी शिवाय आपले मुख्यालय सोडू नये. आरोग्य विभागातील ग्रामिण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आजपासून पुढील 24 तास कार्यरत राहतील. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वादळामुळे जिल्ह्यातील रस्ता खचणे, दरी कोसळणे व इतर अनुषंगीक घटनांची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत त्वरीत उपाययोजना कराव्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वादळामुळे इलेक्ट्रीक पोल पडणे, व त्यावरील तारा तुटणे व इतर अनुषंगीक घटना लक्षात घेता तात्काळ उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळादरम्यान मुख्य विद्युत जोडणी बंद करण्यात यावीत. संपर्क साधताना अडचण येऊ नये म्हणून सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी आपले भ्रमणध्वनी चार्ज करुन...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताचे भान जपत भारतीय स्टेट बॅंक एस.सी., एस.टी., बी.सी. कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना भारतीय स्टेट बॅंक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. गणेश वाघमारे, प्रेसिडेंट श्री. राकेश कांबळे, असिस्टंट जनरल सेक्रेटरी डॉ. मनोज पिंपळे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश पाटील आणि सरचिटणीस श्री. अमोल शिंदे यांची होती. या शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या यशस्वी आयोजनासाठी श्री. उल्हास लांडगे, श्री. प्रवीण देवरे, श्री. आनंदराव करनकाळ, श्री. दीपक सोनवणे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. वसंत पाटील, श्री. रावसाहेब पाटील, श्री. संजय बाविस्कर, श्री. बापू साळवे, श्री. नागसेन पेंढारकर, श्री. मनेश बिरारे आणि श्री. हरलाल मोरे यांचे विशेष योगदान लाभले. या शिबिराच्या नियोजनात श्री. देवेंद्र बोरसे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे संयोजन, समन्वय व प्रचार या बाबींचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमात अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केले. सामाजिक एकोपा, जबाबदारी आणि बांधिलकीचे दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काही तरी चांगले करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या रक्तदान शिबिराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. आयोजकांच्या सहकार्यामुळे आणि रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर अत्यंत...

Loading
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!