Author: Ramchandra Bari

नंदुरबारात ८४ अहवाल निगेटिव्ह

नंदुरबार (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानरुप अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या लांबोळ्याच्या संशयीत महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आज दिवसभरात ८४ अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.सुरुवातीचे बरेच दिवस ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले असून नवापूर, तळोदा, धडगाव हे तीनही तालुके कोरोनामुक्त राहिले आहेत.आता पर्यत जिल्ह्यातून ९१२ स्वॅब नमुने तपा सणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत २१ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आले होते. त्यापैकी २ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून, तब्बल ९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता अॅक्टीव्ह कोरोणा रुग्णाची संख्या १० असुन त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज २२ जणांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले असून, आज दिवसभरात प्राप्त झालेले ८४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही ९८ अहवालांची प्रतिक्षा कायम...

Read More

रोहयो अंतर्गत कोळदा येथे कामाला सुरुवात

नंदुरबार :- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना आपल्या गावातच काम मिळावे, या हेतूने नंदुरबार तालुक्यातील कोळदा व दुधाळे येथे जलसंधारण दिनाचे औचित्य साधून गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आला.कोरोना विषणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत. आज महाराष्ट्र जलसंधारण दिनाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोळदा येथील 175 तर दुधाळे येथील 97 मजुर उपस्थित होते. त्यांना याठिकाणी महिनाभर पुरेल एवढे काम उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री दिनेश वळवी, ग्रामविस्तार अधिकारी श्री भैय्या निकम, ग्राम विकास अधिकारी श्री संजय देवरे, ग्रामसेवक श्री गणेश मोरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून हे काम सुरू करण्यात आले आहे. मजुरांना कामाच्या ठिकाणी तोंडाला रुमाल बांधूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सुरक्षित अंतर ठेवून काम करताना स्वतःची व परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. जिल्हाभरात रोजगार हमी योजनेची विविध कामे सुरू करण्यात आली असून, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला जात...

Read More

बाहेरून आलेल्या नागरिकांना आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन

नंदुरबार : राज्यातील विविध भागातून किंवा परराज्यातून आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी किंवा कामासाठी जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. कोविड-19 मुळे झालेल्या मृत्युच्या दोन्ही प्रकरणात रुग्णास आरोग्य तपासणी न करता आधी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. आजाराची लक्षणे वाढल्यावर त्यांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. वेळेवर आजाराचे निदान न झाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. ज्या रुग्णांची वेळेवर तपासणी करण्यात आली असे 9 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. इतर रुग्णांची प्रकृतीदेखील स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये व ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी  लक्षणे आढळताच जिल्हा  शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीदेखील कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांची माहिती त्वरीत शासकीय यंत्रणेस द्यावी. त्यासाठी ‍जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रण कक्षास 02564-210135 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या तहसील कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले...

Read More

शहादा येथे स्वनिर्मित मास्कचे मोफत वितरण सौ.स्वाती चव्हाण यांचा अनोखा उपक्रम

नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका समाजसेवी विचाराच्या दाम्पत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजवंतांसाठी उच्च प्रतीचे तब्बल एक हजार मास्क तयार करण्याचा संकल्प केलाय. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भूषण चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती चव्हाण यांनी संकल्प पुर्तीला सुरुवात केली असून, शहादा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक श्री पुंडलिक सपकाळे यांना १०० मास्क देऊन या उपक्रमाला सुरुवात केली.      जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जसोदानगर येथील रहिवासी सौ. स्वाती भूषण चव्हाण यांनी जगभरात  झपाट्याने वाढत असलेल्या कोविड 19 सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक पती भूषण चव्हाण यांच्या प्रोत्साहनाने स्वनिर्मित 1000 मास्क मोफत वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा शुभारंभ करत शहादा येथील उपविभागिय पोलीस उपअधीक्षक श्री.पुंडलीक सपकाळे यांच्या गस्त दरम्यांन  रस्त्यावर आढळणाऱ्या गरीब व गरजू लोकांना मोफत वितरण करण्यासाठी 100 मास्क भेट देण्यात आले. हे मास्क सौ स्वाती भूषण चव्हाण यांनी घरीच बनविले आहेत. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे कापड व इलास्टिक घेऊन त्याची कटिंग  श्रीमती मानिषा यांच्याकडून करून घेण्यात आली व सौ. चव्हाण यांनी स्वतः शिऊन घेतले. तयार करण्यात आलेले मास्क डिटर्जंटच्या पाण्यात धुऊन उन्हात वाळवले. त्यानंतर सर्व मास्कला इस्त्री करून निर्जंतुकीकरणासाठी त्यावर सेनेटराईजर स्प्रे केले आहेत.      कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क वापरणे प्रत्येकाला आवश्यक आहे,  त्यासाठी पोलिस उप अधिक्षक श्री. पुंडलीक सपकाळे हे गरजूंना नेहमी स्वतः मास्क वाटप करत असतांना व मास्क वापराचे महत्त्व पटवून देत असतानाचे व्हिडिओ व अनेक बातम्या दिसत होत्या,  त्या प्रेरणेतून या सेवेत आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून शहादा तालुक्यातील कु-हावद जि. प. शाळेतील शिक्षक श्री भुषण प्रताप चव्हाण आणि त्यांच्या...

Read More

“बस बस घरात” गाणे सोशल मीडियावर व्हायरल लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर देवेन्द्र बोरसे यांची प्रस्तुती

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभर विविध उपाय योजना केल्या जात असताना, शासनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. तरी देखील बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना जिव्हाळ्याचा सल्ला म्हणून नंदुरबार येथील देवेंद्र बोरसे नामक शिक्षकाने नावाजलेल्या सैराट या चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर जनजागृती गीत सादर केले आहे. सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून हे गीत जगभर व्हायरल झाले आहे. चीनच्या वूहान शहरातून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना (covid-19) या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात झाला आहे. संसर्गातुन पसरणाऱ्या या विषाणूने जगभरातील लक्षावधी नागरिकांचे प्राण घेतले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने 23 मार्च पासून देशात...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!