Author: Ramchandra Bari

दारूची होम डिलिव्हरी; राष्ट्रवादी नेते संदीप बेडसेंच्या मागणीला सरकार चा प्रतिसाद

धुळे (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी चे माजी जिल्हाध्यक्ष श्री संदिप बेडसे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती.गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रसरकारने ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरसकट मद्य विक्रीला परवानगी दिली होती. त्या निर्णयामुळे सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या निर्णयाला विरोध ही होत होता. मात्र, त्यावर काही पर्याय म्हणून दारूची होम डिलिव्हरी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते संदीप बेडसेंनी ट्विटर च्या माध्यमातून सरकारला केली होती. त्यावर सकारात्मक चर्चाही झाली होती. त्यांच्या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला आहे. अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.ई टोकनची सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. संकेतस्थळावर माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानांपैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास ई – टोकन मिळेल. सदर टोकनद्वारे ग्राहक आपल्या सोईच्या...

Read More

दशक्रिया विधीचा खर्च , कोरोना लढ्याला उपसचिव व पोलीस अधिक्षकांचा निर्णय

नंदुरबार(प्रतिनिधी):- वृद्धापकाळाने कैलासवासी झालेल्या आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी कोरोना संकटाच्या काळातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दशक्रिया विधी वैगरे सोपस्कार न करता, त्यासाठी अपेक्षित खर्चाची रक्कम थेट कोरोना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा आदर्श निर्णय शनिमांडळ येथील रहिवासी व मुंबई येथे शासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत पाटील बंधुद्वयांनी घेतला.जिल्ह्यातील शनिमांडळ येथील रहिवासी व सध्या दहिसर ( मुंबई ) येथे वास्तव्यास असलेल्या कै. सिंधुताई गिरीधर पाटील ( वय 81 ) यांचे, दहिसर येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीवर होणाऱ्या संभाव्य खर्चाची रक्कम कोरोना (कोव्हीड – 19) च्या लढ्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणगी म्हणून जिल्हाधिकारी , नंदुरबार यांना धनादेशाद्वारे सुपुर्द करण्यात आली. कै. सिंधूताईंचे पती श्री . गिरीधर लक्ष्मण पाटील, सुपुत्र श्री. संजय गिरीधर पाटील ( उपसचिव , सामाजिक न्याय विभाग , मंत्रालय , मुंबई ) आणि श्री . विजय गिरीधर पाटील, भा. पो. से. (पोलीस अधिक्षक, महामार्ग सुरक्षा पथक) यांनी हा निर्णय घेतला.पाटील कुटुंबियांनी दशक्रिया विधीसाठी लागणारा खर्च न करता, ती रक्कम रु . 51000 / ( रुपये एक्कावन्न हजार मात्र ) कोरोना (कोव्हीड – 19) च्या लढ्यात योगदान म्हणुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रदान केली. या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. पाटील कुटुंबियांच्यावतीने त्यांचे आप्तेष्ट श्री. देवराम चिंधा पाटील रा. शनिमांडळ तसेच नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, श्री. सुनिल नंदवाळकर यांनी हा धनादेश जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केला. याद्वारे सामाजिक रुढी – परंपराबाबत समाजात एक चांगला संदेश जावून निश्चितच अनेकांना याद्वारे प्रेरणा मिळणार...

Read More

आरोग्य विषयक सूचनेसाठी 1921 टोल फ्री क्रमांक

नंदुरबार : नागरिकांना आरोग्य विषयक सूचना देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘आरोग्य सेतू आयव्हीआरएस’ सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनी आणि मोबाईलसाठी 1921 या टोल फ्री क्रमांकाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला  1921 क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे. कॉल बंद झाल्यावर त्यास या सेवेच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येईल. त्यास आरोग्य सेतू ॲपशी संबंधीत आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येईल. दिलेल्या उत्तराच्या आधारे लघुसंदेशाच्या (एसएमएस) माध्यमातून आपल्या प्रकृतीच्या सद्यस्थिती विषयी माहिती देण्यात येईल.  नंतर देखील नागरिकांना त्यांच्या प्रकृती विषयी संदेश देण्यात येतील. अधिकाधीक नागरिकांना या सेवेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही सेवा 11 भाषांमधून उपलब्ध करून देण्यात आली असून सेवेचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीस त्याने निवडलेल्या भाषेत एसएमएस येणार आहे. व्यक्तीने दिलेली माहिती ‘आरोग्य सेतू’ शी जोडली जाणार असल्याने नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना प्राप्त होऊ शकतील. अधिकाधीक नागरिकांनी आरोग्य विषयक सुरक्षेसाठी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि इतर कोणत्याही क्रमांकावरून संपर्क साधला गेल्यास माहिती देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे मुख्यमंत्री सहायता निधीला जिल्ह्यातून 20 लाख रुपये

नंदुरबार : कोविड-19 संसर्गामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी अनेक नागरिक आणि संस्था  मदतीसाठी पुढे सरसावले असून मुख्यमंत्री सहायता निधीला  19 लाख 22 हजार 148 आणि पीएम केअर निधीसाठी 8 लाख 65 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संकट सुरू झाल्यापासून अनेक व्यक्ती आणि संस्थांनी मदत कार्यात प्रशासनाला सहकार्य केले. भोजन व्यवस्था,  मजूरांना निवारा, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा स्वरुपात मोठ्या प्रमाणात मदत झाली. काहींनी  मास्क,सॅनिटायझर आणि साबणाचे ग्रामीण भागात वाटप केले. संकट मोठे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. वृद्धांपासून सहकारी संस्थांपर्यंत अनेकांनी आपापल्यापरिने योगदान दिले आहे. नागरिकांनी मदत कार्यासाठी पुढे यावे आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19 या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा फोर्ट मुंबई येथे स्वतंत्र बँक खाते असून खाते क्रमांक 39239591720 आहे. शाखा कोड 00300 तर आयएफएससी कोड एसबीआयएन 0000300 आहे. देणगीसाठी आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात...

Read More

गुजरातमधून 676 मजूर आपल्या गावी परतले आदिवासी विकास विभागाचे विशेष प्रयत्न

नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले 676 मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून देखील नागरिकांना जिल्ह्यात आणण्यात आले आहे. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या सुचनेनुसार दोन्ही प्रकल्प कार्यालयांनी मजूरांना परत आणण्यासाठी नियोजन केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाशी आणि जिल्ह्यातील समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क  साधण्यात आला. तिथल्या मजूरांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी शैलेश पाटील, अमोल मटकर, राहूल इधे आणि किरण मोरे या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. द्वारका येथील 220, पोरबंदर 55, वापी 103, आणंद 37, जामनगर 59, बडोदा 32, गांधीनगर 43, भरूच 102, दमण 25 अशा प्रकारे एकूण 676 मजूरांना परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सर्व मजूरांच्या जिल्हानिहाय याद्या तयार करून वाहनाची सोय केली.  आदिवासी विभागामार्फत न्यूक्लिअस बजेटच्या माध्यमातून वाहन खर्चाची सुविधा करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे यातील बरेचसे मजूर गावाकडे परतले असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.  सीमेवर सर्व मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच या मजूरांच्या भोजनाचीदेखील सोय करण्यात आली.  मजूरांचा रोजगार गेल्याने त्यांना मनरेगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे देखील प्रयत्न  प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. वसुमना पंत, प्रकल्प अधिकारी- सर्व मजूर विविध ठिकाणी विखुरलेले असल्याने त्यांना एका ठिकाणी आणून परत आणणे हे मोठे आव्हान होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयाने ते शक्य झाले. पुढच्या टप्प्यात या मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या गावात परतल्याचा त्यांना...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!