Author: Ramchandra Bari

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

नंदुरबार  :  डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी डासांची उत्पत्ती ठिकाणी परिसरात निर्माण होऊ देऊ नये, तसेच आवश्यक दक्षता बाळगून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी आर.बी.ढोले यांनी केले आहे. किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 2019 मध्ये एकूण 2002 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 153 डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील 298 असे 451 रुग्ण एन.एस.1 चे  आढळून आले आहेत. माहे एप्रिल 2020 मध्ये एकूण सरकारी रुग्णालयातील 163 रक्त जल नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात 6 डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील 6 असे 12 रुग्ण एन.एस.1 चे आढळून आले आहेत. मागील दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस या डासांच्या चावण्यापासून होत असल्याने तसेच या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.  घराजवळ असलेली नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत.अंगभर कपडे घालावेत, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, डास पळवून लावणाऱ्या क्रीम व कॉईल चा वापर करावा जेणे करुन डासोत्पत्तीला व आजार प्रसाराला प्रतिबंध होईल व डेंग्यू आजाराला टाळता येईल. डेंग्यू हा आजार नोटिफायबल आजार असल्यामुळे जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व खाजगी प्रयोगशाळांनी  रुग्णालयामध्ये डेंग्यू दुषित रुग्ण आढळून आल्यास त्याची सूचना त्वरीत जिल्हा हिवताप अधिकारी  कार्यालयास द्यावी. डेंग्यू या...

Read More

जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा – डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार – राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्य पद्धतीने विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जैव वैद्यकीय कचरा विघटनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाटील आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, उपचार, निदान, विलगीकरण दरम्यान तयार होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याचे संकलन पिवळ्या पिशवीत आवश्यक दक्षता घेऊन करण्यात यावे. वैयक्तिक स्तरावर वापरण्यात येणाऱ्या पीपीई कीट, मास्क आणि ग्लोव्हजचे संकलन  व्यवस्थितपणे होण्यासाठी घंटागाडी चालकांना सुचना देण्यात यावी. हा कचरा इतर कचऱ्यात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी. तालुका स्तरावर राष्ट्रीय हरीत लवादाच्या सूचनांनुसार कचरा संकलन करण्यात यावे. संबंधित विभागाने यासाठी समन्वयक अधिकारी नेमावा. होम क्वॉरंटाईन व्यक्तीच्या घरातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्यरितीने संकलन होईल याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्थेने घ्यावी, असे त्यांनी सांगितले. बैठकीत श्रीमती पाटील यांनी राष्ट्रीय हरीत लवादाच्या सुचनांची माहिती दिली. श्री.काकडे यांनी सादीकरणाद्वारे जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबतची माहिती दिली. बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि इतर संबंधीत अधिकारी उपस्थित...

Read More

कोविड संकटाच्या काळात एक नवी ‘उमेद’

नंदुरबार  – कोविड संकटाच्या काळात रोजगाराचे प्रश्न निर्माण होत असताना जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत संसर्ग पसरू नये यासाठी वापरण्यात येणारे मास्क तयार करण्याचा उपक्रम हाती घेऊन रोजगार निर्मितीचा एक चांगला पर्याय निवडला आहे. याशिवाय घरपोच किराणा माल पोहोचविणे आणि भाजीपाला विक्रीतूनही समूहांनी उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.  राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून ‘उमेद’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात  अभियानाची अंमलबजावणी प्रभाविपणे करण्यात येत आहे. एप्रिल 2020 अखेर एकूण 14 हजार 966 महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून 1 लाख 47 हजार 961 कुटूंबाचा समावेश या अभियानात करण्यात आलेला आहे. समूहांना गावस्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून स्थानिक गावातील 1000 महिला कार्यरत आहेत. कोविड संकटाचा सामना विविध स्तरावर करावा लागत असताना त्याचे संधीत रुपांतर करण्याचा प्रयत्न अभियानाच्या माध्यमातून समूहातील महिलांनी केला. त्यातून मास्क तयार करण्याची कल्पना पुढे आली. आतापर्यंत 13 हजार मास्क तयार करून त्यातील आरोग्य विभागाला 10 हजार व इतर विभागांना 3 हजार देण्यात आले आहे. मास्क तयार करताना आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालनदेखील करण्यात येत आहे. 16 समूहांच्या 13 म‍हिलांनी हे काम सुरू केले.  काही महिला घरातच वैयक्तिक स्वरुपात व काही सामुहिक स्वरुपात कोरोनापासून सुती कापडाचे मास्क तयार करीत आहे. मास्कची किंमत 10 ते 30 रुपये एवढी आहे. उत्पन्नासोबत कोविडशी लढण्यासाठी आवश्यक वस्तूची निर्मिती करण्याचे समाधानही मिळत असल्याची महिलांची भावना आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायत, व नंदुरबार ,नवापुर व शहादा तालुक्यातील विविध शासकीय विभागाकडूनही त्यांच्याकडे मास्कची मागणी होत...

Read More

सौ. इंदिरा राजपूत यांचा कोरोनाबाबत प्रबंध जागतिक संशोधकांच्या भुवया उंचावल्या

नंदूरबार ( प्रतिनिधी ) जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना अर्थात कोविड -१९ आजारावर नंदुरबारची कन्या सौ. इंदिरा जितेंद्रसिंग ( पिंटू ) राजपूत यांचा शोध प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाला असून, भारतातच उपलब्ध असणान्या मान्यताप्राप्त औषधांनी कोरोना आटोक्यात येवू शकतो, असा दावा प्रबंधात करण्यात आला आहे.  कोरोना विषाणूवरील लस शोधण्याच्या कार्याला आज सर्वच देश अग्रक्रम देत आहेत आणि लस उपलब्ध नसल्याने या विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात उपलब्ध असणाऱ्या उपचार पध्दतीचा सौ.राजपूत यांनी अभ्यास सुरु केला. या अभ्यासात त्यांना आपल्या उपचार पध्दतीला कोरोना विषाणूचे कवच भेदण्यात मर्यादा येत असल्याचे जाणवले आणि याबद्दल त्यांनी संशोधन करीत यासंबंधी आपला प्रबंध इंटरनॅशनल इंटरडीसीप्लीनरी रिसर्च जर्नल या आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठविला. १२ मे रोजी ऑनलाईन प्रसिध्द झालेल्या जर्नलच्या ताज्या आवृत्तीत सौ.राजपूत यांचा शोधप्रबंध प्रकाशित झाला असून, सदर जर्नलला ६.३ इतके मानांकन प्राप्त आहे. सदर प्रबंध रसायनशास्त्राच्या धातू धनभारीत ( मेटॅलीक आयन ) पध्दतीवर प्रकाश टाकणारा आहे. रसायनशास्त्राच्या अंगाने आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झालेला तो एकमेव प्रबंध आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी फक्त प्रतिविषाणू औषध ( अँटीव्हायरल ) द्वारे उपचार करण्यात येतात. या उपचारामुळे कोरोना विषाणूचे कवच भेदण्यात मर्यादा येतांना दिसत आहेत. प्रबंधात कोरोना विषाणूच्या मेदाच्या कवचावर काही विशिष्ठ औषधांची अभिक्रिया करुन मेदाचे कवच तोडता येवू शकत असल्याचा अभ्यास सादर करण्यात आला असून, कवच भेदल्यानंतर प्रथिने शिल्लक राहतात. या प्रथिनांवर अँटीव्हायरल औषधे परिणामकारक ठरु शकतील. कोरोनाच्या मेदाचे कवच भेदण्यासाठी जी औषधे वापरली जात आहेत, त्यासोबत प्रतिविषाणू औषधे ( अॅन्टीव्हायरल ड्रग ) वापरली गेली. तर...

Read More

खरीपासाठी पुरसे खत उपलब्ध जादा दराने खते विक्री केल्यास कारवाई होणार

नंदुरबार : जिल्ह्यात  दर महिन्याच्या मंजूर आवंटनानुसार खत प्राप्त होणार असल्याने शेतकऱ्यांनी अफवांवर  विश्वास ठेवू नये व आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे.  तसेच कृषी सेवा केंद्रांनी जादा दराने कृषि निविष्ठा विक्री केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील यांनी कळविले आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1 लाख 10 हजार 875 मे. टन रासायनिक खतांची उपलब्धता होणार आहे.  मागील शिल्लक साठा व या हंगामात आजपर्यंत प्राप्त खते मिळून 25527 मे. टन  एवढे पुरेसे रासायनिक खत आता उपलब्ध असून उर्वरीत खत मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे.  जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामात जवळपास 289800 हे. क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.  त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी इ. प्रमुख पिकांचा समावेश आहे.  त्यासाठी आवश्यक निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.  रासायनिक खत विक्रेत्याने शासनाकडून जाहीर झालेले दरपत्रक दर्शनी भागावर लावावे.  कोणत्याही विक्रेत्याने लिंकिंग करु नये अथवा जादा दराने निविष्ठ विक्री करु नये. जादा दराने विक्री केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे....

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!