Author: Ramchandra Bari

शून्य गाठलायं… आता हवा निश्चय ! – डॉ.किरण मोघे, जि.मा.अ., नंदुरबार

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त होऊन बाहेर पडत असताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त आनंद दिसत होता आणि ते स्वाभाविक देखील होते. करोनाविरुद्धच्या या युद्धातील पहिल्या टप्प्यात त्यांनी यश मिळवून 19 रुग्णांना त्यापासून दूर नेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले होते. साधारण एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात पहिला कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी  जनतेशी सातत्याने संवाद साधत आपण यातून बाहेर येवू शकतो हा विश्वास निर्माण केला. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जाहीर झालेल्या संचारबंदीतही जनतेला कमी त्रास कसा होईल याची दक्षता घेण्यात आली. आजच्या यशात अनेक करोना वीरांचे योगदान आहे. पोलीस विभागाने अहोरात्र परिश्रम करून जिल्ह्याच्या सीमा संसर्गाच्यादृष्टीने सुरक्षित कशा राहतील याकडे विशेष लक्ष दिले. संचारबंदी मोडणाऱ्यांविरुद्ध प्रसंगी कठोर कारवाई करताना जनप्रबोधन आणि जनसेवेवरही भर दिला. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून रुग्णांची सेवा केली, प्रसंगी त्यांना मानसिक बळही दिले. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी मजूरांची व्यवस्था असो वा नियमांची अमलबजावणी, सतत व्यस्त होते. नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची भूमीकादेखील महत्वाची होती. अनेक ठिकाणी फवारणी, स्वच्छता, सीमाबंदी यावर भर देण्यात आला. कौतुकाची बाब म्हणजे ग्रामीण जनतेतदेखील जागृती पहायला मिळाली. ‘ॲन्टी कोविड फोर्स’च्या माध्यमातून मदतीसाठी अनेक तरुण पुढे आले. तर सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे केला. शासनस्तरावर धान्यवाटप, मजूरांच्या भोजनाची सुविधा, बाहेरील राज्यातील आपल्या नागरिकांना परत आणणे आदी विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. स्वत: मुख्यमंत्री नागरिकांशी सातत्याने संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वच्छता कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक,...

Read More

कोरोनामुक्त पोलिसांचे देशभक्तीपर गिताने स्वागत नंदुरबार पोलिसांचा अभिनव उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विरुद्धच्या लढ्यात मालेगाव येथे बंदोबस्तात तैनात असलेल्या नंदुरबारच्या एका पोलीस जवानाला याची लागण झाली. यातून पूर्णपणे बरा होऊन रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळवलेल्या या जवानाचे पोलिसांनी चक्क बँडच्या तालावर स्वागत केले.मालेगाव येथे बंदोबस्तादरम्यान कोरोना बाधीत झालेल्या नंदुरबारच्या पोलीस कर्मचाऱ्याचा सलग दुसरा अहवाल नकारात्मक आल्याने आज जिल्हा सामान्य रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला. या पोलीस कर्मचाऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी पोलीस अधिक्षकांसह पोलीस दलातील सारेच बडे अधिकारी त्याच्या स्वागतासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्यांना पुष्पहार घालत व त्यांच्यावर पुष्पवर्षाव करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या घरी पोलीस दलाने बँडच्या तालावर “हर करम अपना करेंगे,” हे देशभक्तीपर गित वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या परिसरातील नागरीकांनी देखील टाळ्या वाजवत त्याचे जोरदार स्वागत केले. नंदुरबार पोलिसांची एक तुकडी एप्रिल महिन्यात मालेगाव येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. त्यापैकी एकमेव जवानाला कोरोनाची लागण झाली होती. त्या जवानाला यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले.पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालुन लोक रक्षणाचे काम करत असल्याने नागरीकांनी घरात राहुन, त्यांना सहकार्य करावे. अत्यंत महत्वाच्या कामाखेरीज घराबाहेर पडु नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी यावेळी केले. तर कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस दलाचे आभार...

Read More

तृप्ती धोडमिसे सहाय्यक जिल्हाधिकारी पदी रुजू

नंदुरबार (प्रतिनिधी) – भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. त्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१९ बॅचच्या अधिकारी असून परीक्षेत भारतात १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. मूळच्या पुणे येथील असलेल्या श्रीमती धोडमिसे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील बी.टेक.झाल्या असून यापूर्वी त्यांनी एल अँड टी मध्ये इंजिनिअर आणि महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात सहायक आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रबोधिनीतुन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. नंदुरबार आकांक्षीत जिल्हा असल्याने काम करण्याची चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अनुभव पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असे श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले...

Read More

नंदुरबारात उरले ४ कोरोना बाधित

नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्ह्यासाठी आजचा दिवस आणखीन दिलासादायक ठरला असून आज ६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज या सर्वांचा दुसरा तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना रुग्णालयातुन डिस्जार्च मिळाला. यामुळे आता नंदुरबारच्या कोरोना उपचार केंद्रात ४ रुग्ण शिल्लक राहिले आहेत. हि संख्या शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जिल्हातील २१ जणांचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आला होता. यातील दोघांचा मृत्यु झाला असून या आधी ०९  जन कोरोना मुक्त झाले होते. आज आणखीन ०६ जन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उर्वरित ०४ जणांवरच उपचार सुरु आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये शहाद्यातील ५ तर अक्कलकुवा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या ९ जणांवर  रुग्णालयातुन बाहेर जांतांना फुलांची उधळण करण्यात आली. आज कोरोनामुक्त होवुन परतलेल्या रुग्णांमध्ये एका अॅम्ब्युलंन्स चालकांचा देखील समावेश होता. माजी सैनिक असलेल्या रुग्णवाहीका चालकाचा निरोपाच्या वेळेचा उत्साह पाहण्याजोगा होता.  आज माजी सैनिक असल्यासारखे भासत असल्याचे सांगत सर्व कोरोना बाधीतांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वोत्तम उपचार होत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा देखील या चालकाच्या स्वागतासाठी आवर्जुन उपस्थित...

Read More

धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घ्यावा

नंदुरबार   : मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार विभागामार्फत जिल्ह्यातील शिवण मध्यम प्रकल्प, कोरडी मध्यम प्रकल्प,नागन माध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारे योजना या चारही प्रकल्पातुन नदी व कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता वि.गं. खैरनार यांनी केले आहे. शिवण मध्यम प्रकल्पातून विरचक, बिलाडी, सुंदर्द, खामगाव, नारायणपुर, करणखेडा, बद्रिझिरा, गुजरभवाली, राजापूर, व्याहूर, धुळवद, ढेकवद, बालआमराई, काळंबा या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक के.डी.बागुल (भ्रमणध्वनी 7769859387) यांच्याशी संपर्क साधावा. नागन मध्यम  प्रकल्पातून नवागाव, दुधवे, सोनारे, तारपाडा, देवळीपाडा,भरडू, महालकडू या गावासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.आर.पाटील (भ्रमणध्वनी 9657573915) यांच्याशी संपर्क साधावा. कोरडी मध्यम प्रकल्पातून पळशी, पळसुन, डोंग, सागाळी, वडदा, खातगांव, वडफळी, बिलदा, जामदा, मळवाण, खडकी, छिर्वे, चोरविहीर, कडवान, वडसात्रा, चितवी या गावात पाणी सोडण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.जी.शिंदे (भ्रमणध्वनी 9890298318) यांचेशी संपर्क साधावा.  लघु पाटबंधारे योजना भुरीवेल प्रकल्पातून भुरीवेल, धुवा, आमपाडा या गावात पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील  लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी आर.झेड गावीत (भ्रमणध्वनी 9423313688) यांच्याशी संपर्क साधावा. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचे पाणी अर्ज भरून संबधित कर्मचाऱ्याकडे जमा करावेत. हे अर्ज गावातच नियुक्त कर्मचाऱ्याकडून भरून घेतले जातील. ग्रामपंचायतींनीदेखील पाणी  मागणी अर्ज भरुन नियुक्त कर्मचाऱ्याकडे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!