विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३ समुपदेशक
नंदुरबार ( प्रतिनिधी ) :- शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? या विद्यार्थी व पालकांच्या मनामधील संभ्रम दूर करून करियर व विविध समस्याबाबत समुपदेशन करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात तीन समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.सध्या उन्हाळी सुट्टीचा कालावधी सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत दहावी – बारावी नंतर पुढे काय? शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू होणार ? यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन व्हावे, म्हणून राज्य शासनाने राज्यात सुमारे ४०३ समुपदेशक नेमले आहेत.विद्यार्थ्यांना हे समुपदेशकविविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना आवड , क्षमता , कल , अभिरुचीनुसार करिअर निवडीसाठी मदत, मानसिक , भावनिक व शारीरिक समस्यांवर मात करण्साठी समुपदेशन, ताण – तणाव , दुःख , नैराश्य , भीती , आर्थिक विवंचना , असुरक्षितता यावर मात करण्यासाठी योग्य समुपदेशन, इयत्ता दहावी व बारावीनंतर पुढे कोणती शाखा निवडावी , कोणता अभ्यासक्रम तसेच कोर्स निवडावा, कलागुणांना वाव देण्यासाठी , त्यांची बलस्थाने ओळखून सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी मदत, अभ्यासाबरोबर खेळ, कला, छंद, सकस आहार याचे महत्व सांगून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रोत्साहन, सामाजिक, कौटूंबिक, भावनिक समस्यांवर मात करण्यासाठी भावनिक आधार, दिव्यांगता, न्यूनगंड, कमतरता, दोष यावर मात करण्यासाठी समुपदेशन, अपयशावर मात करुन जीवन सुकर करण्यासाठी मार्गदर्शन, शालेय मित्र – मैत्रिणी, व्यक्तिगत आरोग्य बाबत येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी योग्य सल्ला, अभ्यास कसा करावा, वेळापत्रक कसे तयार करावे, मन शांती कशी राखावी यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नंदुरबार जिल्ह्यात श्री राजेंद्र सुखदेव माळी,...
Read More