Author: Ramchandra Bari

विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३ समुपदेशक

नंदुरबार ( प्रतिनिधी ) :- शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? या विद्यार्थी व पालकांच्या मनामधील संभ्रम दूर करून करियर व विविध समस्याबाबत समुपदेशन करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात तीन समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.सध्या उन्हाळी सुट्टीचा कालावधी सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत दहावी – बारावी नंतर पुढे काय? शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू होणार ? यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन व्हावे, म्हणून राज्य शासनाने राज्यात सुमारे ४०३ समुपदेशक नेमले आहेत.विद्यार्थ्यांना हे समुपदेशकविविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना आवड , क्षमता , कल , अभिरुचीनुसार करिअर निवडीसाठी मदत, मानसिक , भावनिक व शारीरिक समस्यांवर मात करण्साठी समुपदेशन, ताण – तणाव , दुःख , नैराश्य , भीती , आर्थिक विवंचना , असुरक्षितता यावर मात करण्यासाठी योग्य समुपदेशन, इयत्ता दहावी व बारावीनंतर पुढे कोणती शाखा निवडावी , कोणता अभ्यासक्रम तसेच कोर्स निवडावा, कलागुणांना वाव देण्यासाठी , त्यांची बलस्थाने ओळखून सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी मदत, अभ्यासाबरोबर खेळ, कला, छंद, सकस आहार याचे महत्व सांगून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रोत्साहन, सामाजिक, कौटूंबिक, भावनिक समस्यांवर मात करण्यासाठी भावनिक आधार, दिव्यांगता, न्यूनगंड, कमतरता, दोष यावर मात करण्यासाठी समुपदेशन, अपयशावर मात करुन जीवन सुकर करण्यासाठी मार्गदर्शन, शालेय मित्र – मैत्रिणी, व्यक्तिगत आरोग्य बाबत येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी योग्य सल्ला, अभ्यास कसा करावा, वेळापत्रक कसे तयार करावे, मन शांती कशी राखावी यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नंदुरबार जिल्ह्यात श्री राजेंद्र सुखदेव माळी,...

Read More

मनरेगा अंतर्गत नवापूर तालुक्यात 15 हजार मजूरांना रोजगार द्या-डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात चांगले काम सुरू असून विविध यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करून 15 हजार मजूरांना काम उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. नवापूर येथे मनरेगाच्या कामांना भेट दिल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार राजेंद्र नजन, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायतीने एक मोठे काम आणि गाळ काढण्याचे काम सुरू करावे. सीसीटीची कामे सुरू करून त्याशेजारी वृक्षलागवड करण्यात यावी. वन विभागाने वनतळे किंवा वनतळ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे. ज्या ठिकाणी कुठलेच काम नसेल तिथे वनीकरणाचे काम सुरू करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कडवान येथील काळ काढण्याच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वराडीपाडा येथे सरपणी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यांनी गंगापूर येथील कामालाही भेट देवून कामांची माहिती घेतली आणि मजूरांशी संवाद साधला. लहान कडवान येथे 3000 घनमीटर गाळ काढण्यात येणार असून 30 लक्ष लीटर साठवण क्षमता वाढणार आहे. येथे 146 मजूर काम करीत आहेत. वराडीपाडा येथे 236 तर गंगापूर येथे 104 मजूर काम करीत असून तालुक्यात 6 हजारापेक्षा अधिक मजूरांना काम उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डॉ.भारुड यांनी गुजरात सीमेवरील आरटीओ चेकपोस्टला भेट दिली. मजूरांना राज्याच्या सीमेवर पोहोचविण्याची व्यवस्था करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर शहरातील काही भागात भेट देऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या...

Read More

जिल्ह्यांतर्गत बससेवा 22 मे पासून सुरू होणार – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश

नंदुरबार   : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोविड संसर्ग असलेला रुग्ण नसल्याने 22 मे पासून जिल्ह्यांतर्गत 50 टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ होणार आहे. आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये सुरू राहतील. टॅक्सी, कॅब आणि रिक्शा सुरू राहतील, तथापि केवळ वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी नेण्यास अनुमती राहील. चारचाकी वाहनाने देखील वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना अनुमती असेल. दुचाकी वाहनावर केवळ चालकाला (एका व्यक्तीस) अनुमती असेल. सर्व प्रकारच्या मालवाहतूक करता येईल. शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यासदेखील अनुमती असेल. शहरातील सर्व दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, जीवनावश्यक वस्तूंसाठीची ई-कॉमर्स सेवा, खाजगी कार्यालये, शेती संदर्भातील कामे, बँक, कुरीअर आणि डाक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, घरपोच सेवा देणारे हॉटेल्स, उपनिबंधक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालये सुरू ठेवण्यास अनुमती असेल. शासकीय कार्यालयात 100 टक्के उपस्थिती ठेवता येईल. प्रेक्षकाशिवाय वैयक्तिक व्यायामासाठी क्रीडांगणे सुरू ठेवण्यासही अनुमती राहील. मात्र समुह किंवा गट यांना अनुमती नसेल, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. शासकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या अनुज्ञतेसाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार नाही. दुकान मालकांनी करोनाविषयक सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा दिलेली मान्यता रद्द करण्यात येईल. हॉटेलमधील पार्सल सेवेलाच केवळ अनुमती असेल. रेल्वे, आंतरराज्य बससेवा, आंतरजिल्हा बससेवा, शॉपींग मॉल्स, चित्रपटगृहे, प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था,...

Read More

‘लाल परी’मुळे अनेकांची झाली कुटुंबाशी भेट जिल्ह्यातून 15 हजार मजूरांना राज्याच्या सीमेवर पोहोचविले बाहेरगावी अडकलेल्या 3 हजार नागरिकांना जिल्ह्यात आणले

नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आणि कुटुंबाच्या भेटीची ओढ असलेल्या अनेक मजूर आणि नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’ द्वारे जिल्ह्यातून 18 हजार मजूर आणि नागरिकांना  शेजारील राज्याच्या सीमेवर किंवा त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात आले, त्यापैकी फक्त नवापूर येथून 15 हजार प्रवाशांची सुविधा गेल्या आठवडाभरात करण्यात आली. गुजरात येथे काम करणारे हजारो मजूर नवापूर येथे  राज्याच्या सीमेवर अडकले होते. तहसीलदार उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक प्रशासनाने त्यांच्या प्रवाशासाठी  नियोजन केले. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रवासाचे मार्ग व वेळापत्रक निश्चित करण्यात आले. सर्व प्रवाशांना बसेसद्वारे नियोजनपूर्वक विविध ठिकाणी पाठविण्यात आले. सर्वाधिक प्रवाशांना मध्यप्रदेश सीमेवर बिजासन येथे सोडण्यात आले. हे सर्व मजूर उत्तर भारतातील होते. त्यासाठी 568 बसेस सोडण्यात आल्या. प्रत्येक बसेमध्ये साधारण 22 मजूरांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पाठविण्यात आले. बंगाल आणि ओरिसाकडे जाणाऱ्या मजूरांना गोंदियापर्यंत 78 बसेसद्वारे सोडण्यात आले. नंदुरबार आगाराच्या बसेसचा हा सर्वात लांबचा प्रवास होता. याशिवाय खेतीया 13,  नांदेड 1, वाशीम 2, खामगाव 1, अकोल 4, चंद्रपूर 1, औरंगाबाद 1, यवतमाळ 1, नागपूर 3, भंडारा 2, वर्धा 1 गडचिरोली 1, उमरगा 1, परभणी 1 आणि बीड येथे 1 बसद्वारे प्रवाशांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक बसेसची सुविधा नवापूर येथूनच करण्यात आली आहे.  नवापूर येथून एकूण 15 हजार 572 प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाच्या स्थळापर्यंत पोहोचविण्यात आले. सूक्ष्म नियोजन आणि सहकार्याची भावना  धुळे आणि साक्री आगारातूनही बसेस मागविण्यात आल्या होत्या. प्रत्येक बससाठी प्रवाशांची यादी करणे, प्रवाशांची संपर्क, त्यांची वैद्यकीय तपासणी याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले.  जय गुरुदेव संस्थेतर्फे...

Read More

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरू

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी  अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व केंद्रातील उपकरणे नियमितपणे सॅनिटाईझर करावे. केंद्राच्या ठिकाणी सर्वांनी फेस मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक राहील. केंद्राच्या ठिकाणी केंद्रचालक, ऑपरेटर यांना आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टंन्सीग, साबणाने हात धुणे व सॅनिटाईझर वापर करणे बंधनकारक राहील. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम करतेवेळी नाक,तोंड, डोळे यांना स्पर्श करु नये.  केंद्रात येणाऱ्या सर्व नागरिकांनी व्यक्तीगत स्वच्छता पाळावी. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वेळी बायोमॅट्रीक उपकरणांचे वापरानंतर स्वच्छ करावे. एखाद्या व्यक्तीस खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा व्यक्तींस केंद्रावर येण्यापासून परावृत्त करावे. प्रत्येक केंद्रावर युआयडीएआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्राच्या दर्शनी भागात लावाव्यात.  हॉटस्पॉटच्या ठिकाणी रहात असलेल्या कर्मचारी, नागरिक यांना अशा केंद्राच्या ठिकाणी जाण्यास मनाई राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती केंद्रावर जमा होणार नाही याची जबाबदारी संबंधित केंद्र चालकाची राहील. ज्या क्षेत्रात कन्टेमेंन्ट झोन लागू असेल किंवा करण्यात येईल अशा क्षेत्रातील केंद्रे बंद राहतील. वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येवून केंद्र सुरुळीतपणे सुरु ठेवण्यात यावेत.  सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमुद करण्यात आले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!