Author: Ramchandra Bari

दररोज 100 वाहनांच्या कापसाची खरेदी करावी-जिल्हाधिकारी

नंदुरबार :  कापूस खरेदी प्रक्रीयेला वेग देऊन दररोज 100 वाहनातील कापसाची खरेदी होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. शहदा येथील कापूस खरेदी केंद्र आणि कॉटन मीलला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, पोलीस उप अधीक्षक सपकाळे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, गट विकास अधिकारी सी.टी.गोसावी  आदी होते. डॉ.भारुड म्हणाले, शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाचे सर्वेक्षण करण्यात यावे. शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू ठेवावी. योग्य नियोजन करून खरेदी प्रक्रीयेला वेग  देण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी  कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देऊन आडत विक्रेत्यांशी चर्चा केली. त्यांनी तहसील कार्यालयातील बैठकीत मनरेगा योजनेचा आढावा घेतला. शेतकऱ्यांचे ग्रुप करून कंपार्टमेंन्ट बंडींगची कामे घेण्यात यावी. सीसीटीची कामे घेताना सोबत वृक्षारोपणाची कामे घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.  मानमोडे आणि भुलाणे येथील कामांना डॉ.भारुड यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते मजूरांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. स्थानिक प्रशासनाने या टोप्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशीदेखील चर्चा केली. कोविड संकटानंतर शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंसेवकांचे चांगले सहकार्य घेता येईल. संकट आणखी काही काळ चालणार असल्याने स्वयंसेवकांनी उत्साह कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ.भारुड यांनी नगर पालिकेला भेट देऊन पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा...

Read More

दीड हजार विद्यार्थी व मजूर श्रमीक एक्स्प्रेसने गावाकडे रवाना

नंदुरबार :  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या जामिया संकुल येथील 1518 विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य 70 मजूर असे 1588 प्रवाशांना विशेष श्रमीक एक्स्प्रेसने  झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,अविश्यांत पांडा, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील,उपजिल्हाधिकारी कैलास कडलग,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उपशिक्षणअधिकारी डॉ.युनूस पठाण, रेल्वेचे सहायक परीचालन प्रबंधक गुलाबसिंग गहलोत, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी, प्रिन्सिपल रफीक जहागिरदार,  मौलाना जावेद पटेल आदी उपस्थित होते.  रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजूरांमध्ये नंदुरबार येथील 26, तळोदा 7, नवापुर 18 , शहादा 12 तसेच साक्री येथील 7 अशा 70 मजूरांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी व मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाली. प्रवाशांसह ही रेल्वे विद्यार्थी व मजूरांना घेवून गोहाटीच्या दिशेने 2 वाजून 40 ‍मिनीटांनी रवाना झाली. यावेळी श्री.पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना बसमधून उतरवून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्वांना रेल्वेत बसविण्यात...

Read More

कापूस खरेदीसाठी तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार :  जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी शिल्लक कापसाची माहिती घेण्यासाठी नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे  प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी व पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंत्रणेला दिले आहेत. शासनाने 24 एप्रिल पासून राज्यात कापूस खरेदीस पुन्हा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे. 26 मे अखेर नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 548 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली असून 2 हजार 201 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली. विविध कारणामुळे जिल्ह्यातील 3 हजार 347 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस विक्री होणे बाकी आहे.             राज्यात कापूस खरेदीचे बाजार मुल्य दर व शासनाचे हमीभाव दर यामध्ये तफावत आहे. कापूस खरेदीचे शासनाचे हमीदर हे बाजारातील दरापेक्षा जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील काही व्यापारी हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता आहे. तसेच लवकर पावसाळ्यास सुरूवात होणार असून जिल्ह्यातील  नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी शिल्लक कापसाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गावनिहाय  याद्या तयार करण्याचे आदेश सहायक निबंधक,सहकारी संस्था यांना देण्यात आले आहेत. शिल्लक कापसाच्या माहितीसाठी पथकाची नेमणूक         शेतकऱ्याकडील शिल्लक कापसाची माहिती संकलनासाठी तहसिलदारामार्फत नियोजन करण्यात यावे.  तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावनिहाय याद्या प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबधीत शेतकऱ्याच्या  सातबारा उताऱ्यावरील कापूस पिकाखाली एकूण क्षेत्राची आणि  शिल्लक कापसाची खात्री करण्यासाठी कापूस साठ्याचे शेतकऱ्यासह फोटो घ्यावेत. ही प्रक्रीया दोन दिवसात पूर्ण करावी. गाव निहाय तपासणी पंचनामा झालेल्या यादीपैकी प्रत्येकी 10 टक्के याद्यांची फेरतपासणी संबधीत तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी...

Read More

रोजगार हमीची जास्तीत जास्त कामे उपलब्ध करुन द्या -जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार : करोनामुळे अनेक मजुंराचा रोजगार गेला असून अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर खांदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील, कृषी उपसंचालक एम.एस.रामोळे उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, मनरेगातून जिल्ह्यात 5 हजार 144 कामे सुरु असुन 41 हजार 157 मजूराना कामे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातुन 75 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरु करण्यात यावीत. सध्या शेतीमजूरीची कामे ठप्प कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत कृषी विभागाने प्रत्येक तालुकास 5 हजार या प्रमाणे 30 हजार मजूराना कामे उपलब्ध करुन द्यावीत. एका कृषि सहायकास 5 कामे, कृषि पर्यवेक्षक 10, कृषि अधिकाऱ्याने किमान 15 कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.पावसाळ्यात मनरेगाची इतर कामे होत नसल्याने फळबाग लागवडीची 100 टक्के कामे केल्यासफळबागाच्या कामातुन 30 ते 35 हजार मजूराना रोजगार उपलब्ध करुन देणे शक्य होईल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी. मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देण्यात यावे. मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्यावी आणि लक्षणे आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावीत. काम करतांना पुरेसे अंतर ठेवून काम पूर्ण होईल याबाबत दक्षता...

Read More

महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आंदोलनाची नाही सहकार्याची गरज-संदीप बेडसे

शिंदखेडा(प्रतिनिधी):- आंदोलनातून भाजपानं कोरोना वारीयर्सच्या कार्यपद्धती वर शंका व्यक्त केली, यासाठी माय बाप जनता भाजपाला कदापि माफ करणार नाही, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी केला आहे. याबाबत धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात मुंबई ,पुणे मध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. कमी अधिक प्रमाणात सर्वच शहरात परिस्थिती वाईट असली तरी सुधारते आहे. महाविकास आघाडीचे सरकार जोमाने काम करित आहे. मालेगाव व धुळे या दोन शहरातील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढते आहे, मालेगाव व धुळे शहरात  एम.आय.एम पक्षाचे आमदार तर खासदार हे भाजप चे आहेत याउलट भाजपाने  सरकारच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवून हे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरल्याचे म्हटले आहे. याकरिता भाजपाने काल माझे अंगण माझे रणांगण, असा नारा देत महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. काळे झेंडे, काळ्या फिती काळ्या रंगाचेच मास्क घालून भाजपा नेत्यांनी आंदोलन केले.भाजपाच्या या आंदोलनाची अनेक स्तरातून टीका झाली आणि ते आंदोलन निंदनिय आहे, असेही म्हटले आहे. त्यातच धुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. आंदोलनातून भाजपानं कोरोना वारीयर्सच्या कार्यपद्धती वर शंका व्यक्त केली, यासाठी माय बाप जनता भाजपाला कदापि माफ करणार नाही.संकटात सापडलेला तुमच्या आमच्या जिल्ह्याला सावरण्यासाठी एकजुट महत्वाची आहे. असं असताना महाराष्ट्रद्रोही भाजपानं आंदोलन करून लढा देणाऱ्या महसूल अधिकारी- कर्मचारी डॉक्टर, आरोग्य अधिकारी- कर्मचारी ,पोलीस अधिकारी- कर्मचारी,आशा सेविका,शिक्षक, सफाई कर्मचारी आणि इतर सर्व प्रशासकीय यंत्रणेचा अपमान केला आहे. जनता हे कधी विसरणार...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!