Author: Ramchandra Bari

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त 71 रक्तदात्यांनी रक्तदान

नंदुरबार (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 जयंतीचे औचित्य साधत आज नंदुरबारमध्ये आयोजीत रक्तदान शिबिरात तब्बल 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना व कर्मचारी संगठना तसेच अहिल्या वाहिनी नंदूरबार जिल्हा यांच्यातर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिर प्रसंगी धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्ष आनंदा कुंवर, मल्हार सेना जिल्हाध्यक्ष कन्हैयालाल भिमराव धनगर, खासदार डॉ हिनाताई गावित, आमदार डॉ विजय कुमार गावित जिल्हापरिषद उपाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, सागर तांबोळी, विरेंद्र अहीरे, आदिवासी क्रांती दल जिल्हाध्यक्ष प्रवीण बागूल,  दीपक धनगर तसेच श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन चे जीवन माळी, रामकृष्ण पाटील, अरुण साळुंखे,महेंद्र झंवर, अजय देवरे. हितेश कासार. आकीब धोबी उपस्थित...

Read More

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अन्नधान्य वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी) – मे रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे नवापूर चौफुली भागातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप करण्यात आले. देशात कोरोना विषाणुचे संकट लक्षात घेता संपूर्ण देशात अहिल्याबाई होळकर जयंती अत्यंत साधेपणाने मात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर अत्यंत दानधर्मी, प्रजावत्सल व लोककल्याणकारी शासनकर्त्या होत्या. त्यांच्या सेवाभावी व दानधर्मी या गुणांचा आदर्श घेत धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे शहरातील नवापूर चौफुली भागातील गरीब गरजू लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेशाध्यक्षा धनश्री आजगे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर धनगर, योगेश बोरसे, लक्ष्मण धनगर, प्रकाश धनगर, किसन धनगर, मुकेश आजगे, प्रमोद रजाळे, उज्वल धनगर, दिपक धनगर, विकास बोरसे, मनोज महाले, भुषण महाले आदी समाज बांधव उपस्थित...

Read More

अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांची निवड.

शहादा (प्रतिनिधी ) –  अखिल भारतीय गुर्जर महासभा जनरल कार्यकारिणीची बैठक शनिवार दि.३०मे रोजी राजस्थानातील पुष्करच्या गुर्जर भवन इमारतीत आयोजित करण्यात आली होती.यावेळी सातपुडा साखर कारखाना शहादाचे चेअरमन बापूसाहेब दीपकभाई पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  बैठकीच्या प्रारंभी स्व. रामसरण भाटी (माजी अध्यक्ष) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यासोबतच समाजातील कोरोना योद्धा यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.  तद्नंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी आ. गोपीचंद गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकारणी सदस्य व कोरोना साथीच्या आजारामुळे उपस्थित नसलेले सदस्यांची मते दूरध्वनीने जाणून घेतले.त्यानंतर माजी राष्ट्रीय अध्यक्ष सहकार महर्षि पी.के.अण्णा पाटील यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले.श्री.पाटील यांना पुढील पाच वर्षे राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन व विस्तार करण्याची जबाबदारी देण्यात आली.यावेळी एकमताने सुरेंद्रकुमार नागर, (खासदार, राज्यसभा) यांना गुर्जर महासभेचे संरक्षक बनवले गेले. राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पाटील यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या पदाधिका-यांची घोषणा केली.  यांत मुख्यत: राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी गोपीचंद गुर्जर (माजी आमदार), नेपालसिंग कसाना, (प्रसिद्ध समाज सेवी), राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मुकेश गुर्जर, अहमदाबाद गुजरात, बच्चूसिंह गुर्जर जयपुर राजस्थान  यांचेसह काळजीवाहू राष्ट्रीय अध्यक्ष रामकिशोर दोगणे यांना मध्य प्रदेशच्या अध्यक्षांची जबाबदारी कायम करण्यात आली. यावेळी राजस्थान कार्यकारिणीचे अध्यक्ष रामप्रसाद धाबाई यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले. यावेळी अँड.रमेश धाबाई प्रदेशाध्यक्ष कायदा प्रकोष्ठ, अजमेर जिल्हा अध्यक्ष नथुलाल बजाड,  हरचंद पटेल अध्यक्ष अखिल भारतीय वीर गुर्जर सुधार समिती समिती पुष्कर ,रामअवतार गुर्जर नसीराबाद, शिवप्रकाश खटाणा, भागचंद चोपडा, गोपालकृष्ण डोई ,गोपाल गुर्जर...

Read More

मृदा, जल आणि वृक्ष संवर्धनावर भर द्या-डॉ. राजेंद्र भारुड हरित सातपुडा अभियान राबविण्याचे आवाहन

नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हरित सातपुडा अभियान’ राबविण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून मृदा, जल आणि वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, तसेच ही जनचळवळ व्हावी यासाठी शिक्षकांची विशेष योगदान द्यावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरित सातपुडा अभियाना’च्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अविश्यांत पांडा, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, संदीप कदम, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, गावपरिसरातील मोकळ्या जागेत मृदसंधारणाची कामे घेण्यात यावीत आणि पावसाळ्यात याठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्षारोपण करताना स्थानिक पर्यावरणानुसार रोपांची निवड करावी. कृषी आणि वन विभागाने ‘गाव तेथे नर्सरी’ उपक्रम राबवावा. नर्सरीसाठी नाविन्यपूर्ण योजना किंवा सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती प्रात्यक्षिकांसह द्यावी. प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. माथा ते पायथा जलसंधारणाचे काम करून वृक्षारोपण करावे. जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांनी जनजागृतीचे काम करावे. वृक्ष संवर्धनाची नवी संस्कृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे आहे. असे केल्यास गावातून होणारे स्थलांतर कमी होऊन जंगलातील उत्पादनाचा आर्थिक लाभ स्थानिकांना होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अक्कलकुवा, धडगाव, तळोदा आणि शहादा या भागातील वृक्षारोपण अभियानाचे संनियंत्रण तीन अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करण्यात येऊन गावपातळीपर्यंत प्रत्येक घटकाची आणि यंत्रणेची अभियानातील भूमीका निश्चित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. वृक्षतोडीपासून होणारे नुकसान जनतेला समजावून सांगावे, 14 वा वित्त आयोग आणि पेसातील निधीच्या 25 ते 40 टक्के हिस्सा मृद, जल आणि वन संवर्धनासाठी उपयोगात...

Read More

नंदुरबार जिल्हा पारिषदेची २८ भरारी पथके

नंदुरबार(प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा सुरळीतपणे मिळत आहेत किंवा नाही? हे पाहण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाभरात अचानक २८ भरारी पथके पाठवून एकाच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायती आणि रोजगार हमी योजनेच्या कामाची पहाणी केली. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण होऊन, सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा जी सी यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात नागरिकांचा प्रत्यक्ष संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पशुवैद्यकीय दवाखाने यातील कामकाज कोरोना विषाणूच्या (covid-19) अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांनुसार सुरू आहे किंवा नाही? हे पाहण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या व उपस्थिती, आरोग्य केंद्रांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता, तेथील उपकरणे, केंद्रांच्या प्रशासकीय दप्तराची परिस्थिती; त्याचबरोबर औषधांचा उपलब्ध साठा, याबाबत माहिती घेण्यात येत असून, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मासिक सभा नियमानुसार नियमित होतात काय?, ग्रामसभा नियमांनुसार पार पडत आहेत काय?, ग्रामपंचायतीने विविध नोंदवह्या अद्ययावत ठेवल्या आहेत काय?, ग्रामपंचायतींची कर वसुली योग्यरीत्या केली जात आहे का?, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांची कामे योग्यरीत्या केली जात आहेत काय?, अशा पद्धतीची पाहणी या भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सुद्धा उपस्थित कर्मचारी वर्ग, त्यातील तांत्रिक कामाचा आढावा, साथीच्या रोगाबाबत दवाखान्यात ठेवण्यात आलेल्या नोंदवह्या, तसेच ग्रामस्थांसाठी दवाखान्याची माहिती भिंतीवर लावण्यात आली आहे काय? या बाबींचा भेटीतील पाहणी मुद्द्यांमध्ये समावेश आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरही या पथकांकडून भेटी देण्यात आल्या असून, कामावरील मजूर उपस्थिती तपशील, मजुरांना पुरवण्यात येणाऱ्या...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!