Author: Ramchandra Bari

हरित सातपुडा अभियानाबाबत आढावा अंतर्गत बैठक संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  हरित सातपुडा अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात  शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली. बैठकीस परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर.रोकडे, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षक आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले की, जिल्ह्यात अभियानाअंतर्गत प्रत्येक शाळेच्या परिसरातील मोकळी जागा, टेकडी तसेच उपलब्ध डोंगर व मैदाने याठिकाणी वृक्ष लागवड करावयाची आहे. प्रत्येक शाळेत उपलब्ध सुविधेनुसार नर्सरी उभारणे, मातीनाला बांध तयार करणे, पाणी अडवणे – जिरवणे यासारखे उपक्रम प्रात्यक्षिक स्वरुपात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन करायचे आहेत. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची तीन गटात विभागणी करून त्यांना समजेल अशा स्वरुपात चित्र व मोजक्या शब्दांच्या माध्यमातून पुस्तक तयार करुन आठवड्यातून अर्धातास वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षांची जोपासणा करणे याबाबतचे संस्कार विद्यार्थ्यांवरकरावयाचे आहेत, असे त्यांनी सांगीतले. पुस्तक तयार करतांना झाडाचे महत्व, त्यापासून मिळणारी सावली, वनौऔषधी उपयोग, पक्ष्यांना होणारा फायदा, जमिनीची धुप न होऊ देण्यात झाडांची भुमिका, मिळणारी फळे, झाडापासून मिळणारे ऑक्सीजन, पर्यावरण रक्षणात झाडांची भुमिका याबाबत चित्रात्मक स्वरुपात व बोलीभाषेत मजकूर तयार करावा. वृक्षारोपणासाठी  मोठया प्रमाणात रोपांची आवश्यकता असल्याने ‘शाळा तेथे रोपवाटीका’ हा उपक्रमदेखील घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. ही योजना यशस्वी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी लहान-लहान व्हीडीओ तयार करुन प्रत्येक शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत या व्हीडीओच्या माध्यमातुन उपक्रमाची माहिती पोहोचवावी. बालमनावर वृक्षारोपणाचे महत्व पटवुन देणारे संस्कार करण्याचे पवित्र कार्य शिक्षण विभागाने यशस्वी करावे.  फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध अशा विविध कामांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवावे. वरच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधीक स्वरुपात श्रमदान करुन घेत वृक्षारोपणात सहभागी करून...

Read More

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने सन 2019 मधील तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (TNNAA) प्रदान करण्यासाठी  खेळाडूंनी 20 जून पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. पुरस्कारासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळांडूची कामगिरी सन 2017, 2018, 2019 या तीन वर्षातील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमीन,पाणी, व हवेमधील असणे आवश्यक राहील. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असावी. पुरस्काराबाबत अधिक माहिती व अर्ज करीता https:dbtyas-youth.gov.in  या संकेतस्थळावर 20 जून 2020 पर्यंत प्रस्ताव सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी, साक्री नाका, खामगाव रोड, नंदुरबार येथे 10 जून 2020 पर्यंत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले...

Read More

राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनामार्फत राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासाकरिता राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवती व नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थाना प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी 26 जूनपर्यंत  प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.              युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, युवा कल्याण विभागामार्फत सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाच्या पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पुरस्काराबाबत अधिक माहिती व अर्ज करीता https://innovate.mygov.in/national-youth-awards-2018 व https://innovate.mygov.in/national-youth-awards-2019 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.             युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांनी  राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता आपले प्रस्ताव वरील संकेतस्थळावर 26 जून 2020 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, साक्री नाका, खामगाव रोड, नंदुरबार येथे 10 जून 2020 पर्यंत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले...

Read More

गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अक्कलकुवा(प्रतिनिधी) :कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील निवडक गावातील सुमारे 1000 गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बागलाण सेवा समिती नंदुरबार/नाशिक व ग्रेट ईस्टर्न सी.एस.आर.फाऊंडेशन मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार,उमटी,बोखाडी,बेडाकुंड,चिवलउतार,तोडीकुंड,वाडीबार,भरकुंड,साकलीउमर या गावातील गरीब व गरजु कुटुंबांना तसेच रोजगार गमावून गुजरात राज्यातुन आपल्या मूळगावी परत आलेल्या सुमारे 500 कुटुंबांना जीवनावश्यक साहीत्याचे वाटप करण्यात आले.यात खाद्यतेल,मिरची पावडर,हळद पावडर,मीठ,तुरदाळ,साखर,चहा पावडर,आंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण आदी साहीत्याचे किट बनवुन वाटप करण्यात आले.या आधी देखील बागलाण सेवा समितीने तेरे देस होमम्स या संस्थेच्या सहाय्याने 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे.आता पर्यंत 1000 कुटुंबांना साहित्याचे वितरण करण्यात आलेले आहे.जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण वेळी सोशल डिस्टनसिंग चे पालन करुन आरोशि प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पुष्पलता ब्राम्हणे यांनी उपस्थितांना कोरोना विषाणु पासुन बचावासाठी फिजिकल डिस्टंसिंग,वारंवार साबणाने हात धुणे,चेहऱ्याला,नाका – तोंडाला हात न लावणे,आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे.आदी प्रकारच्या सुचना देऊन कोरोना बाबत माहीती दिली.जीवनावश्यक वस्तुंची वेगवेगळ्या संस्था कडुन मदत मिळविण्यासाठी राजु शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले तर वस्तूंच्या वितरणासाठी तहसीलदार विजय कच्छवे यांनी सहकार्य केले.श्रीमती पुष्पलता ब्राम्हणे,श्रीमती आशालता पिंपळे,सुधिरकुमार ब्राम्हणे, स्वप्निल पवार,यांनी परिश्रम घेऊन गरिब व गरजु कुटुंबांपर्यत मदत पोहचविण्याचे काम यशस्वीरित्या पार...

Read More

जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा घेण्यासाठी  जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ. हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली वीर बिरसामुंडा सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दिशा समितीचे अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. गावीत म्हणाल्या, जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावामध्ये वीज, सिंचन, रस्ते,  प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत होणारी कामे त्वरीत पुर्ण करावीत. घरकुलात मूलभूत सुविधा देण्यात याव्यात व कामे दर्जेदार  होतील याकडे विशेष लक्ष द्यावे. नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे कामे त्वरीत पुर्ण करावे. वनपट्टाधारकांना सोलरपंप, विद्युत पुरवठा,सिचंनाची सोय त्वरीत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यानी दिल्या. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक,गट विकास अधिकारी यांच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली.  बैठकीत ग्रामीण विद्युतीकरण, प्रधानमंत्री हरघर बिजली, सोलर ऊर्जा, हर घर नल हर घर जल, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेजयल, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!