Author: Ramchandra Bari

संचार बंदी काळात दूध विक्रेत्यांना पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी

 नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या आठ दिवसाच्या  कडक संचारबंदी काळात दूध  विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी  जिल्ह्यातील दूध व्यावसायिक वाहनधारकांनी केली आहे.  यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनातर्फे दिनांक 22 ते 30 जुलै पर्यंत नंदुरबार सह शहादा तळोदा आणि नवापूर या शहरांमध्ये कडक संचारबंदी जारी करण्यात आली आहे . यात वृत्तपत्रे आणि दूध विक्रेत्यांना सूट देण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे दूध व्यवसायिकांनी  आभार मानले आहे.  परंतु जारी केलेल्या आदेशात संचार बंदी काळात केवळ कोरोना विषयी कामकाज करणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनाच पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचे  आदेशात नमूद केले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून दूध विक्रेते वाहनधारकांना  इंधनाची गरज असते.  याबाबत संबंधित  पेट्रोल पंप चालकांना  दूध व्यवसायिक  वाहनधारकांना  पेट्रोल भरून देण्याबाबतच्या सूचना करण्यात याव्यात. जिल्ह्य़ातील सर्व दुध विक्रेत्यांना आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची मुभा देण्याची मागणी  जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक वाहनधारकांतरफे विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल भटू लगडे तसेच गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी निवेदनाद्वारे केली...

Read More

शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाभर पोस्टर आंदोलन

नंदुरबार (प्रतिनिधी) :- शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने बुधवार दिनांक २२ जुलै २०२० रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी पोस्टर आंदोलनात नंदुरबार जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी  महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द करावी, तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन आदेशानुसार विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित अनुदान दयावे, या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी यांच्याद्वारा शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. याबाबत शिक्षक भरती तर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लाॅकडाऊनमुळे अनेक शिक्षक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यांनी पण घरात राहून कार्ड पेपरवर अधिसूचना रद्द करा,...

Read More

संचारबंदी काळात कृषी निविष्ठाची दुकाने सुरु राहणार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या कडक संचारबंदीच्या काळात चारही नगरपालीका/ नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी शेतीशी निगडीत खत व बी-बियाण्यांची  दुकाने सकाळी 7 ते 12 या वेळेत सुरु राहतील. चारही शहरात असलेल्या बँकाच्या आस्थापना नियमित वेळेत सुरु राहतील, तथापी बँक ग्राहकांसाठी बंद राहतील. गॅस एजन्सी मार्फत केवळ घरपोच गॅस सिलेंडर पोहोचविण्यास मुभा राहील. नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे,विसरवाडी,खांडबारा,प्रकाशा,खापर,मोलगी या ग्रामीण भागात लोकसंख्या अधिक असल्याने तसेच कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने या गावातील सर्व आस्थापना, दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास मुभा राहील.  ज्या ठिकाणी गर्दी होईल अथवा सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नसतील त्या ठिकाणी संबधित ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाकडून तात्काळ दुकाने बंद करण्यात येतील. संचारबंदी कालावधीत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या  विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या आदेशात नमुद केले...

Read More

महिला रुग्णालयाचे काम 31 जुलैपर्यंत पूर्ण करा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिला रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येत असल्याने इमारतीची आवश्यक कामे 31 जुलै पर्यंत पूर्ण करावीत आणि ऑक्सिजन व्यवस्थादेखील त्वरीत निर्माण करण्यात यावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. डॉ.भारुड यांनी इमारतीला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. त्याच्या समवेत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी होते. रुग्णांना सर्व चांगले उपचार दिले जातील यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात याव्यात. भविष्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. बेड्स व इतर अनुषंगीक व्यवस्था त्वरीत करण्यात यावी व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात इमारतीचा उपयोग होईल असे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी...

Read More

जिल्ह्यातील चार शहरात आठ दिवस कडक संचारबंदी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत चारही शहरात 22 जुलैच्या रात्री 12 वाजेपासून ते 30 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, सर्व खाजगी आस्थापना बंद राहील. शासकीय कार्यालये या कालावधीत सुरु राहील. या चारही शहरात केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा असेल. मात्र यासाठी रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. या शहरांमधील सरकारी कार्यालये मर्यादीत उपस्थितीत सुरू राहतील तथापि अभ्यागतांना कार्यालयास भेट देण्यास परवानगी नसेल. स्वस्त धान्य दुकानदारांनी वरील कालावधीत धान्य वाटप न झालेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटपाची सेवा पुरवावी. पेट्रोलपंपावर कोरोना विषयी कामकाज करणाऱ्या शासकीय ओळखपत्रधारक अधिकारी-कर्मचाऱ्यांना तसेच शासकीय वाहनांनाच पेट्रोल किंवा डिझेल देण्यात यावे. या व्यतिरिक्त अन्य वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये. सदर कालावधीत अक्कलकुवा व अक्राणी शहरातील सर्व  आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. 30 जुलैपर्यंत वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त आंतरजिल्हा प्रवासास पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. दुकाने आणि आस्थापनांनी 22 जुलै रोजी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार करावा. संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे  आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!