Author: Ramchandra Bari

जलसंधारणची कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार  :  जिल्ह्यात कृषी विभागाकडील पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची व जलसंपदा विभागाकडची अत्यावश्यक कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून पिण्यासाठी, सिंचनासाठी व औद्योगिक पाणीपुरवठ्याचे काम सुरळीतपणे सुरू ठेवावे. पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी व बंद नलिका, कालवे वितरण प्रणालीचे परिचलन करणाऱ्या किमान आवश्यक क्षेत्रीय अधिकारी आणि वाहनांना अंतर्गत अनुमती पत्र संबंधित अधीक्षक अभियंत्यांनी निर्गमित करावे.  क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रसार व बाधा होऊ नये यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शेतकऱ्यांशी एकत्रित बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नये. पावसाळ्यापूर्वी करावयाची देखभाल दुरुस्ती व धरण सुरक्षेची कामे त्वरेने हाती घ्यावीत. अशी कामे करताना मजूरांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी राहील. कंत्राटदारांनी या कामासाठी पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी. जलसंपदा विभागाकडची वाहने अन्य यंत्रणांनी परस्पर अधिग्रहीत करू नये.  बांधकामावरील मजूरांना बांधकामाचे ठिकाण सोडून इतरत्र फिरता येणार नाही, याची जबाबदारी साईट इंजिनिअर यांची असेल. राज्याच्या मुख्य सचिवांकडील 17 एप्रिल 2020 अन्वये अटी शर्तीच्या अधीन राहून ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांनी कर्मचारी व वाहने यांच्यासाठी त्यांच्यास्तरावरून आदेश काढावेत व त्याची एक प्रत पोलीस विभागाकडे द्यावी. कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत आणि ओळखपत्र जवळ बाळगण्याच्या सूचना देण्यात याव्यात , असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या आवाहनाला प्रतिसाद

नंदुरबार – कोरोना (Covid-19) या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात नव्हे तर जगभरात मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत. “आमचाही खारीचा वाटा” म्हणत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी अश्या तब्बल २० जणांनी रक्तदान करून देशसेवेच्या कार्याला मोलाचा हातभार लावला आहे.सध्या जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने जगभरातील समाजसेवी वृत्तीची प्रचिती वेगवेगळ्या उपक्रमांतून समोर येत आहे. अशातच नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला साथ देत जिल्हा परिषदेच्या २० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून देशसेवेच्या कार्याला हातभार लावला आहे. जिल्हा परिषद इमारतीमध्येच आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरावेळी सुरक्षित अंतराची काळजी घेत, वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्रमाने रक्तदान करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेखर रौदळ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) श्री भुपेंद्र बेडसे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थिती होते. नंदुरबार जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले असून, केंद्र शासनाच्या वर्गवारीनुसार हा जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे जनजीवन पूर्णतः बंदिस्त झाले आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले रक्तदान नक्कीच उपयुक्त ठरेल. कार्यालयात १० % कर्मचारी उपस्थितीचे शासनाचे आदेश असल्यामुळे आधीच मोजके कर्मचारी जिल्हा परिषदेच्या इमारतीत उपस्थित असतांना त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी या शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. दुसरीकडे इतर अनेक कर्मचारी रक्तदानासाठी...

Read More

अत्यावश्यक कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार :  जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे  तात्काळ पूर्ण करण्याचे निदे्रश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व प्रमुख महामार्गाची कामे आणि दुरुस्ती करणे, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यक्षेत्रांतर्गत रस्ते, मलनि:स्सारणाची कामे, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामीण रस्ते तसेच पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची कामेदेखील वेळेत करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.  महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आणि इतर विद्युत विषयक कामे व दुरुस्ती, बीएसएनएल आणि इतर दूरसंचार कंपन्यांकडील दूरसंचार आणि इंटरनेट सेवा संचालन, लाईन दुरुस्ती आदी कामे पूर्ण करावीत. त्याबाबत खाजगी संस्थांना कामे पूर्ण करण्याबाबत बीएसएनएलने लेखी आदेश द्यावेत. रेल्वे विभागाची पावसाळ्यापूर्वीची  रेल्वे मार्गावरील करावयाची अत्यावश्यक कामे, तसेच स्टेश्न परिसरातील कामे, तसेच विविध विभागांची  पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असलेली कामे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बांधकामावरील मजूरांना बांधकामाचे ठिकाण सोडून इतरत्र फिरता येणार नाही, याची जबाबदारी साईट इंजिनिअर यांची असेल. राज्याच्या मुख्य सचिवांकडील 17 एप्रिल 2020 अन्वये अटी शर्तीच्या अधीन राहून ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांनी कर्मचारी व वाहने यांच्यासाठी त्यांच्यास्तरावरून आदेश काढावेत व त्याची एक प्रत पोलीस विभागाकडे द्यावी. कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत आणि ओळखपत्र जवळ बाळगण्याच्या सूचना देण्यात याव्यात , असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

खाजगी दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई

नंदुरबार :  आजारी नागरिकांच्या सोईसाठी जिल्ह्यातील सर्व मेडीकल दुकाने, सर्व रुग्णालये व क्लिनीक दैनंदिन वेळेनुसार सुरू ठेवण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाना बंद ठेवल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या दवाखान्यात रुग्णांची होणारी गर्दी टाळावी. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे. रुग्णांची दूरध्वनीद्वारे नोंदणी करावी. एका वेळेस एकच रुग्णास तपासणीसाठी बोलवावे. तपासणीस येणाऱ्या रुग्णाची तपासणी करताना शरीराचा कमीत कमी संपर्क येईल याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णाची तपासणी करताना ग्लोव्हज व मास्क वापरावे. रुग्णाशी कमीत कमी संपर्क येण्याच्यादृष्टीने रक्तदाब तपासणीस शक्यतो डिजीटल रक्तदाब तपासणी यंत्र वापरावेत. रुग्णांना रुग्णालयात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून येण्याबात सूचना द्याव्यात. प्रत्येक रुग्णाच्या तपासणीनंतर हात स्वच्छ धुवून घ्यावे. कोरोना संशयित रुग्णास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा. आदेशाचा उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (कोविड-19) उपाययोजना नियम 2020, भारतीय दंड संहितेमधील तरतूदीनुसार आणि भारतीय साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार दंडनीय तसे कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नंदुरबार : अक्कलकुवा येथील आणखी एक व्यक्तीचा स्वॅब अहवाल कोवडि-19 पॉझिटीव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. डॉ.भारुड यांनी अंबाबारी चेकनाक्यालाही भेट दिली आणि अक्कलकुवा येथील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. त्यांनी नवोदय विद्यालय येथे क्वॉरंटाईन केंद्राचीदेखील पाहणी केली. त्यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपविभागीय अधिकारी अविश्यांत पंडा, उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर आणि तहसीलदार  विजय कच्छवे होते. डॉ.भारुड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविण्याच्या सुचना दिल्या. ते म्हणाले, जिल्ह्याच्या सीमेबाहेरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारे प्रवेश देऊ नये. वैद्यकीय कारणासाठी जिल्ह्याच्या सीमेत येणाऱ्या व्यक्तीला क्वॉरंटाईन करण्यात यावे. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व सेवा घरपोच मिळतील याचे निट नियोजन करावे. प्रतिबंधीत क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती बाहेर जाणार नाही व बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. कोविड-19 बाधीत व्यक्तीची संपर्क साखळी त्वरीत शोधून त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना त्वरीत क्वॉरंटाईन करण्यात यावे व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्वॉरंटाईन केंद्रात आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक दक्षता घेण्यात याव्यात. नागरिकांना जीवनावश्यक धान्य व जीवनावश्यक व्सतू मिळण्यात कोणताही त्रास होणार नाही आणि वैद्यकीय सुविधा तात्काळ मिळतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!