Author: Ramchandra Bari

тАШрдорд╛рдЭреЗ рдХреБрдЯреБрдВрдм рдорд╛рдЭреА рдЬрдмрд╛рдмрджрд╛рд░реАтАЩ рдореЛрд╣рд┐рдо рджреБрд╕рд▒реНрдпрд╛ рдЯрдкреНрдкреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╕рд░реНрд╡реЗрдХреНрд╖рдгрд╛рдд 33 рдХреЛрд░реЛрдирд╛рдмрд╛рдзрд┐рдд рдЖрдврд│рд▓реЗ

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात आजाराची लक्षणे आढळलेल्या  259 व्यक्तिंची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 33 कोरोना बाधित आढळले आहेत.  या टप्प्यातील सर्वेक्षणात जे कुटुंब बाहेरगावी गेले होते त्यांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील  सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी 6913 व्यक्तींना रक्तदाब, 105  कर्करोग, 4972 मधुमेह,  इतर आजार 989 आणि 218 व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. 212 व्यक्तींना ताप, 12 घसादुखी तर 2 व्यक्तींमध्ये एसपीओ-2 चे प्रमाण 95 पेक्षा कमी आढळले. यापैकी 355 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आणि यापैकी 73 टक्के व्यक्तिंची स्वॅब चाचणी करण्यात आली. सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार  721 घरांना भेटी दिल्या. एकूण  18 लाख 72 हजार 775 लोकसंख्येपैकी 16 लाख 95 हजार 625 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यात अक्कलकुवा 2 लाख 47 हजार 183, धडगाव 2 लाख 30 हजार 709, नंदुरबार 3 लाख 48 हजार 169, नवापूर  2 लाख 84 हजार 243, शहादा 4 लाख 9 हजार 855 आणि तळोदा तालुक्यातील 1 लाख 75 हजार 466 नागरिकांचा समावेश...

Read More

рдЧрд░реЛрджрд░ рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЖрд░реЛрдЧреНрдпрд╛рдЪреА рдХрд╛рд│рдЬреА

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी त्याच्या जन्मापूर्वी आईच्या प्रकृतीची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. गुटगुटीत आणि निरोगी बाळ सर्वांनाच आवडतं, मात्र असे बाळ जन्माला येण्यासाठी आईचे योग्य पोषण व्हावे, शरीरासाठी आवश्यक घटक तिला अन्नातून योग्य प्रमाणात मिळावे याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. हे टाळण्यासाठी गरोदर महिलांच्या आरोग्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात रोज एक आयएफए म्हणजे आयर्नची गोळी रात्री जेवणानंतर घेणे आवश्यक आहे. आईने कमीत कमी 100 दिवसांपर्यंत रोज आयएफएची गोळी घ्यायला हवी. आयर्न नवजात बालकांच्या योग्य मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. गरोदरपणात गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी रक्ताची पूर्तता आईपासून होत असते. एक ॲनॅमिक आई आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचवू शकत नाही.  ज्यामुळे बाळ जन्मापासून कमी वजनाचं आणि ॲनॅमिक होत. ॲनॅमिक गर्भवती महिला एका निरोगी महिलेच्या तुलनेत बाळंतपणाच्या वेळी रक्त जाण्यामुळे खूप अशक्त होते आणि त्यात तिचा मृत्यूही होऊ शकतो. आयर्नची गोळी खाण्यामुळे विष्ठा काळी येणे, बद्धकोष्ठ होणे, पोट खराब होणे, अस्वस्थ वाटणे आदी परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम गंभीर स्वरुपाचे नसून ते काही दिवसांत समाप्त होतात. काळी विष्ठा, बद्धकोष्ठता आणि पोट खराब झाल्यास तीन ते चार बाटल्या पाणी रोज प्यावे. आयर्नची गोळी रात्री जेवणानंतर घ्यावी. लिंबू, चिंच यासारख्या आंबट खाण्यामुळेही अस्वस्थता कमी होईल. आयर्नची गोळी घेण्याच्या एक तास आणि आणि नंतर चहा-कॉफी घेऊ नका, कारण त्यामुळे आयर्न शरीरात योग्य प्रकारे विरघळू शकणार नाही. जेवणात लिंबू, संत्री किंवा आवळा यासारखी फळं खावी,  त्याची आयर्नचं पचन होण्यास मदत होईल. गरोदरपणात आहारावरही योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. ...

Read More

рдСрдирд▓рд╛рдИрди рд░реЛрдЬрдЧрд╛рд░ рдореЗрд│рд╛рд╡реНрдпрд╛рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार  यांच्या संयुक्त विद्यमाने  28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी व उद्योजकांसाठी ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.             मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील आस्थापना/कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्त पदांद्वारे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी  सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojage.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची रिक्तपदे उद्योजकांकडून अधिसूचित करण्यात येत आहेत.  यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे योग्य किंवा ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती उद्योजकांच्या सोईनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील.             ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आणि उद्योजकांनी  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा प्लेस्टोअरमधून ‘महास्वयंम’ॲप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन त्यावर नोंदणी करावी.              ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा उमेदवारांनी व उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता अनिसा तडवी यांनी केले...

Read More

рд╕реЛрдпрд╛рдмреАрди рдмрд┐рдпрд╛рдгрд╛рдЪреА рд╕рд╛рдард╡рдгреВрдХ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याच्या विक्री केंद्रावर मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी ग्रामबिजोत्पादनातून उत्पादीत सोयाबीन बियाणे तांत्रिक पद्धतीने साठवणूक करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.  खरीप हंगाम 2020 मध्ये 20990 हे.पेरणी क्षेत्र असून 2021 मध्ये 21510 हेक्टर पेरणी क्षेत्र निश्चित केले आहे. बियाणे उत्पादनाठी कृषी विभागासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामबिजोत्पादन  कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन बियाणे प्रक्षेत्र भेटी, काढणी, मळणी, साठवणूकीबाबत उत्पादक शेतकरी यांचेशी समन्वय साधून नियोजन करण्यात आले...

Read More

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

рдЬрд╛рд╣рд┐рд░рд╛рдд

error: Content is protected !!