जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांना डिजीटल वीज मीटरमुळे २ ते ३ पट जास्त बिले येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. दराडे यांना घेराव घातला.
आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाढीव बिलांचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. ठेकेदारांनी परवानगी न घेता शासनाचा धाक दाखवून डिजीटल मीटर बसवल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी डिजीटल मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत,डिजीटल मीटरच्या आधारे येणारी वीजबिले तोपर्यंत थांबवावीत ,रात्री अपरात्री होणारी वीज कपात थांबवावी , लेखी वीजबिल घरोघरी पोहोचवण्याची जुनी व्यवस्था सुरू करावी
येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्ह्यात एक दिवस जिल्हा बंद करून कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माळी, महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, बापू महाजन, दिनेश भोपे, ईम्तियाज पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते…

Byte – रीना पाडवी
महिला जिल्हाप्रमुख