Month: February 2020

बसेसला नंदुरबार ते संभाजीनगर फलक लावण्याची मागणी

नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आगार प्रमुखांना निवेदन नंदुरबार – नंदुरबारहुन औरंगाबादला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला नंदुरबार ते संभाजीनगर असे फलक कायमस्वरूपी लावण्यात यावे, अशी मागणी नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. नंदुरबारच्या आगार प्रमुखांना निवेदन देतांना. याबाबत नंदुरबारच्या आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे . त्यात म्हटले आहे की, नंदुरबार ते औरंगाबाद राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला औरंगाबाद ऐवजी नंदुरबार ते संभाजीनगर या नावाचे फलक लावण्यात यावे. राज्य परिवहन महामंडळाने सदर न लावल्यास मनसेतर्फे खर्चाने नंदुरबार संभाजीनगर असे फलक लावण्यात येतील. तसेच बसस्थानकातील प्रवासी व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करून पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपजिल्हाध्यक्ष ईश्वर ठाकूर, जिल्हा सचिव पवन गवळे, तालुकाध्यक्ष राकेश माळी, शहराध्यक्ष विवेक ठाकूर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जोशी, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुनील कोकणी, तालुकाध्यक्ष दिनेश मराठे, कामगार सेनेचे संपर्क अध्यक्ष अतुल पाटील, दीपक चौधरी, जयदीप चौधरी, विकी चौधरी, योगेश चौधरी, अनिल चौधरी आदींनी केली...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!