नंदुरबार (प्रतिनिधी) – ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडे त.त.व ग्रामपंचायत जयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26/07/24 रोजी पालक मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत कार्यालय जयनगर येथे नवीन शैक्षणिक धोरण 20-20 व कौशल्य विकास या विषयावर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच मा. श्री मोगराज सोनवणे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देणारी शिक्षण पद्धती आहे. शिवाय आपल्या मातृभाषेत आपल्याला आपल्या आवडीनुसार विषय व ज्ञान शाखांची निवड करता येईल कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखांचाही अभ्यास करू शकतो व आपल्या कलागुणांना चालना देऊ शकतो अशा प्रकारची ही शिक्षण पद्धती आहे . विद्यार्थी स्वयंभू विकास साध्य करेल व स्वतःच्या विकासाबरोबरच राष्ट्र विकासात त्यांचा अनमोल सहभाग असेल. त्याच बरोबर ग्रामविकास संस्थेला आता विज्ञान शाखेला शासन मान्यता मिळालेली आहे. म्हणून येत्या वर्षात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही 100% रोजगार सेल मधुन नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

तसेच पी एम उषा या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत 5 कोटी रुपये निधी मंजुरी मिळणारे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. म्हणून येत्या काळात विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी महाविद्यालय उपलब्ध करून देणार आहे. असा आशावाद व्यक्त केला. यावेळी प्राचार्यांनी शेतकरी पालकांना गावरान बियाण्याचे वाटप केले व गावरान बियाणे संवर्धन व विकासाची जबाबदरी दिली. व बियाणे संवर्धनाची अपेक्षा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल गोसावी यांनी केले त्यांनी संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकला व संस्थेने पंचक्रोशीत नावलौकिक कसा मिळविला आहे. यावर भाष्य केले.आणि पालकांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.


याप्रसंगी जयनगर गावचे उपसरपंच मा. श्री ईश्वर भाऊ माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले की मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे या महाविद्यालयाकडून मला जे काही संस्कार व शिक्षण मिळाले त्याचाच परिपाक म्हणून मला महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याबद्दल वनश्री पुरस्कार व आदिवासी जनसेवक पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामागे माझ्या कार्याबरोबरच माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनाचा व संस्काराचा सिंहाचा वाटा आहे. ते मी कधीच विसरणार नाही. त्याबरोबरच परिसरातील मुलांनी बामखेडा येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आव्हान केले.


याप्रसंगी पालकांचे प्रतिनिधी श्री आत्माराम गुरुजी यांनी मनोगत केले. पालक मेळाव्याचे समन्वयक म्हणून डॉ.गावीत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याणाच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी गावाचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पालक , विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक व श्री चक्रधर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच जयनगर इत्यादीचे सहकार्य लाभले होते. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले व आभार प्रकटन डॉ . गावीत सर यांनी मानले.