रामभक्तांच्या प्रयत्नांनी सुखरूप आलो, मालसर येथे अडकलेल्या भाविकांनी केले अनुभव कथन
नंदुरबार (प्रतिनिधी) :- भगवंत आणि संत दगाजी बापू यांच्या आशीर्वादाने आणि सर्व रामभक्तांच्या प्रयत्नांनी आम्ही प्रचंड मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर आलो. ज्या ज्या रामभक्तांनी या संकट काळात आम्हाला मदत केली, त्या सर्वांचे शतशः आभार, अशी प्रतिक्रिया मालसर, जि. बडोदा येथे रामधून कार्यक्रमासाठी गेलेल्या भक्तांनी दिली. नर्मदेच्या पुरात अडकलेले भाविक श्री वाल्मीक तांबोळी व श्री भरत पटेल यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गेल्या 38 वर्षापासून चौपाळा येथील प. पू. ब्रम्ह. संत दगाजी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली अखंड रामधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच प्रेरणेतून दरवर्षी श्रावण महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांवर जाऊन राम व श्रीकृष्णाच्या नामजपाचा कार्यक्रम चौपाळा येथील...
Read More