Category: आरोग्य

आरोग्यवर्धक ज्वारी..

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्यांबद्दल जागरुकता वाढविणे आणि तृणधान्य उत्पादनात अधिकाधिक वाढविणे, यासाठी प्रोत्साहन देणे, ही उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य यावर्षानिमित्त ठेवण्यात आली आहेत. ज्वारी धान्याची पौष्टिकता इतर तृणधान्यांच्या मानाने कशी चांगली आरोग्यवर्धक आहे. या विषयी थोडक्यात माहिती.             ज्वारीचे पोषणमुल्ये (प्रति 100 ग्रॅम ) उर्जा- 349 कि. कॅलरी, प्रथिने 11.6 टक्के, स्निग्ध पदार्थ 1.90, पिष्टमय पदार्थ- 72.60 टक्के, तंतुमय पदार्थ 1.60, फॉस्फरस- 222 मि.ग्रॅम, लोह सरासरी 4.10 मि. ग्रॅम कॅल्शियम-25 मि. ग्रॅम, व्हिटामिन बी 6-20 टक्के आहेत. ज्वारीचे आहारातील महत्व ज्वारी थंड, गोड, रक्तविकारहारक, पित्तशामक, रूक्ष असून कफ व वायुकारक आहे. पांढरी ज्वारी बलदायक व पथ्यकारक...

Read More

आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार; स्पीड बोटच्या सहाय्याने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सुविधा देणार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) नंदुरबार जिल्हा हा केंद्र सरकाराने आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केला असून आदिवासी दुर्गम भागात प्रतीकुल परिस्थितीत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सेवा दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. ते आज शहादा येथील ग्रामीण रूग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य जिजाताई ठाकरे, के.डी. नाईक, गुलाब ठाकरे,...

Read More

जिल्हा आरोग्य विभागातर्फे क्रिकेट सामन्यांचे आयोजन

नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभाग विभागातर्फे जिल्हा अंतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या मधील सुप्त गुणांना वाव मिळावा  म्हणून या स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आले होते .आज या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप पुंड सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी अमित पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार डॉक्टर संजीव वळवी, डॉ. हरिष कोकणी व आरोग्य विभागातील अधिकारी ,व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी जिल्हा कार्यालय...

Read More

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी ; विविध शासकीय इमारतींच्या निर्मितीतून कामकाज गतीमान होणार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही त्यामुळे नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अमर्याद संधी आहेत. तसेच जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध विभागांच्या निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इमारतींमुळे प्रशासकीय कामगाज गतीमान व अधिक सुविधांनीयुक्त होईल, असा विश्वास आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्य्यक्त केला आहे. ते आज नंदुरबार शहरात माता व बाल संगोपन रूग्णालय, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींच्या पायाभरणी...

Read More

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमजबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हास्तरीय कृतीदल समितीच्या बैठकीत दिल्यात.             जागरुक पालक, सुदृढ बालक बाल आरोग्य तपासणी अभियानांची जिल्हास्तरीय कृतीदल समितीची बैठक आज रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविद चौधरी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियांनातंर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व बालक, किशोरवयीन मुलाची सर्वांगीण आरोग्य तपासणी  करण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, वैद्यकीय व औषधी द्रव्ये विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय, नगर विकास, पंचायतराज तसेच समाज कल्याण विभागाच्या समन्वयाने काम करुन हे अभियांन यशस्वी करावे. या अभियानातंर्गत  जिल्ह्यातील 1 हजार 894 शासकीय, निमशासकीय शाळा  180, खाजगी व कनिष्ठ महाविद्यालय, 2 हजार 588 अंगणवाड्या, 3 बालगृह व अनाथालय, 10 दिव्यांग शाळा, अशा एकूण 4 हजार 675 शाळेतील 5 लाख 46 हजार 82 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. या अभियानासाठी ग्रामीण भागात उपकेंद्रनिहाय 290 पथक व शहरी भागात 20 असे एकूण 310 पथक नियुक्त केले आहे. या पथकामार्फत दररोज 150 मुला-मुलींची तपासणी केली जाईल. पथकासोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका राहणार आहे. या अभियानात प्रत्येक बालकाची काळजीपुर्वक...

Read More

लम्पी रोगांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधीत केलेली  पशूबाजार व गुरांची वाहतूक पुर्वरत  सुरु – मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज रोगांच्या प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील  किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी- विक्री व प्राण्याचे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली होती. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकानिहाय आढावा बैठकीत जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील प्राणी बाजार भरविणे व जिल्हयांतर्गत गुरांची वाहतूक करण्यास पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.           जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता 28 दिवसापुर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी गोजातीय प्रजातींच्या कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक राहील. संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक असून ते देण्यासाठी राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट -अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. गुरांची वाहतूक करतांना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम 2001 मधील नियम 47 अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, प्रक्षेत्रे व पशुबाजारामध्ये यापुढे टॅगींग व रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय गुराची खरेदी विक्री करुन नयेत. सदर आदेशाचे अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप निबंधक, कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था व अन्य अनुषंगीक...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!