Month: April 2020

57 हजार नागरिकांनी डाऊनलोड केले ‘आरोग्य सेतू’

नंदुरबार : कोविड-19 च्या संसर्ग ओळखण्यासाठी व त्यापासून बचावासाठी तयार करण्यात आलेले ‘आरोग्य सेतू’ ॲप  जिल्ह्यातील 57 हजार 627 नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. केंद्र सरकारने हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. या ॲपवर आपली माहिती भरल्यास गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती असल्यास ॲपद्वारे पूर्वसुचना मिळू शकते. त्यासोबत कोरोनापासून बचाव कसा करावा याची माहितीदेखील या ॲपवर देण्यात आली आहे. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या अॅपचा वापर करणे आवश्यक आहे. विशेषत: बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. कोरोना बाधिकताची संपर्क साखळी ओळखण्यासाठीदेखील या ॲपचा उपयोग होणार असल्याने नागरिकांनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात तरुणाईचा प्रतिसाद ‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी 3 हजारावर नोंदणी

नंदुरबार : कोविड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तरुणाईने ‘जोश-ए-वतन बढाए जा’ या भावनेने मोठ्या प्रमाणत ‘ॲण्टी कोविड फोर्स’साठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. सोबत एनसीसी विद्यार्थी, शिक्षक आणि नेहरु युवा केंद्राच्या सदस्यांनीदेखील यात सहभाग घेतला आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत असल्याने सुरक्षेवर बराच ताण पडतो. शिवाय या संकटाच्या काळात अनेक ठिकाणी मदतीसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी एसीएफची संकल्पना राबविण्याचे ‍निश्चित केले. त्याला नेहरु युवा केंद्र आणि शिक्षकांकडून तात्काळ प्रतिसाददेखील मिळाला. एनवायकेचे 183 सदस्य, 161 शिक्षक आणि एनसीसीच्या 61 विद्यार्थ्यांनी एसीएफमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. गावपातळीवरदेखील मनुष्यबळची आवश्यकता असल्याने तिथल्या युवकांना सहभागी करून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करून देण्यात आली. नोंदणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक संवादाद्वारे केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 2 हजार 847 स्वयंसेकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक 1154 नंदुरबार, 786 शहादा, 368 नवापूर, 301 तळोदा, 167 अक्कलकुवा आणि 71 व्यक्तीं तळोदा तालुक्यातील आहेत. यातील बहुतेक 20 ते 30 वयोगटातील तरुण आहेत. पोलीसांना मदतीसाठी 1498, क्वॉरंटाईन केंद्राची देखरेख 48, निवारा केंद्र 52, स्वच्छता कार्य 88,  नगरपालिकेला सहकार्य 82 आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी 341 स्वयंसेवकांनी तयारी दर्शविली आहे. फेसबुकच्या माध्यमातूनदेखील अनेक तरुणांनी आपले मोबाईल क्रमांक देऊन सहकार्याची तयारी दर्शविली आहे. देशभक्तीच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपण काही वाटा उचलू इच्छितो अशा आशयाच्या प्रतिक्रीया युवकांनी दिल्या आहेत. काहींनी वाहन सुविधा, जीवनावश्यक वस्तू देण्याची तयारी दर्शविली आहे. तर लॉकडाऊनमुळे गावाकडे आलेल्या सुरक्षा रक्षकांनीदेखील यात सहभाग घेण्याचे मान्य केले आहे....

Read More

दुकाने उघडण्यास केंद्र शासनाची सशर्त परवानगी

मुंबई : केंद्र सरकारने शनिवारपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मद्य विक्रीची दुकाने आणि मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पत्रकानुसार देशातील सर्व दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील निवासी भाग आणि परिसरातील दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान करोना व्हायरचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या तसंच हॉटस्पॉट असेलेल्या ठिकाणांमध्ये मात्र दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत. ५० टक्के मनुष्यबळ, शारिरीक अंतराचे पालन, मास्क आणि हँड ग्लोव्हस्चा वापर अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली असली तरी राज्य सरकारांच्या निर्देशांची वाट दुकानदार पाहत...

Read More

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात तरुणाई उतरली

नंदुरबार : कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था प्रशासनाला सहकार्य करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीदेखील मदतकार्यात पुढाकार घेतला आहे. विविध भूमीकांमध्ये हे विद्यार्थी प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. विशेषत: कपड्याचे घरगूती मास्क तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजनचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी स्वयंस्फुर्तीने जनजागृती कार्यात  उतरले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी हे ॲप डाऊनलोड करण्याबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनादेखील या ॲपचे  महत्व सांगितले. आशा स्वयंसेविकेच्या सोबत घरोघरी जाऊन कोरोनाची माहिती असो वा सर्वेक्षण, विद्यार्थ्यांनी चांगले सहकार्य केले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क महत्वाचा असल्याने काही स्वयंसेवकांनी आपल्या अंगी असलेल्या शिवणकलेचा उपयोग करीत मास्क शिवले व त्याचे वाटप केले. विशेष म्हणजे यात विद्यार्थींनींसोबत विद्यार्थ्यांचादेखील सहभाग आहे. आपापल्यापरिने स्थानिक स्तरावर कपडा उपलब्ध करून घेत हे विद्यार्थी मास्क शिवत आहेत. या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. आरएफएनएस महाविद्यालय अक्कलकुवा, एसटी को ऑप  एज्युकेशन सोसायटी शहादा, जीटीपी कॉलेज नंदुरबार, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा, कला महाविद्यालय बामखेडा अशा जिल्ह्यातील विविध भागात असेलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबविला आहे.  विद्यार्थ्यांनी कपड्याची व्यवस्था जमेल तशी केली. काहींनी दुकानातून आणला तर काही विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या शर्टपीसचा वापर केला. काहींनी घरातील जुने कापड उपयोगात आणले. थोडेथोडे करून काम वाढत गेले आणि आता उत्साहाने विद्यार्थी यात सहभाग घेत आहेत. पोलीस मित्र म्हणून सुरक्षेचे काम ,सॅनिटायझरचे वाटप, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, साबण...

Read More

रिक्त पदे भरतांना कौशल्य विकास विभागाकडून पात्र उमेदवारांच्या याद्या घेणे बंधनकारक

नंदुरबार : शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सहकारी  संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी आस्थापना (25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असणारी )  यांनी रिक्तपदे भरतांना कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in   संकेतस्थळावर रिक्तपदे अधिसूचित करणे बंधनकारक असून पात्र उमेदवारांच्या याद्या डाऊनलोड करुन सदर यादी व जाहिरातीनुसार आलेले अर्ज यामधून पात्र उमेदवारांची विहित पद्धतीनुसार निवड करण्यांत यावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रा. म. कोल्हे यांनी कळविले आहे. अनेक शासकीय, निमशासकीय कार्यलये, महामंडळे, सरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि खाजगी आस्थापना (25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असणारी ) त्यांच्याकडील रिक्तपदे केवळ वृत्तपत्रात जाहीरात प्रसिद्ध करून थेट नियुक्तीद्वारे भरीत आहेत.  याबाबत स्थानिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुर्वीचे सेवायोजन कार्यालये यांना कोणतीही सुचना न देता कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.  त्यामुळे सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा अधिनियम 1959 व सर्वेाच्च न्यायालयाने दिलेले आदेश यांचे अधिन राहून सर्व आस्थापनांनी रिक्तपदे भरण्याची कार्यवाही करावी. रिक्तपदे भरतांना कायद्याचे उल्लंघन केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल, असेही श्री. कोल्हे यांनी कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!