नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू असल्याने आचारसंहिता कालावधीत वाहनावर राजकीय पक्षाचे चिन्ह, झेंडा, शासकीय लोगो इत्यादिंचा वापर करून फिरणाऱ्या वाहनावर आणि संबंधित वाहन धारकांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी बालाजी  क्षीरसागर यांनी उपप्रादेशिक परिवहन  अधिकारी  कार्यालयाला दिले आहेत. आचारसंहिता कालावधीत वाहन धारकांनी आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.