नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि  संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यातील 198 शेतकऱ्यांना सन 2017,2018 व 2019 या तीन वर्षांचे विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

            त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सुरेश अर्जुन गावीत, रा.करंजी बु, ता.नवापूर व पुंजू चिंधा भोये, रा.अजेपूर ता.जि.नंदुरबार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2017 (आदिवासी गट ) जाहीर झाला असून त्यांना २ मे रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम कृषी विभागाच्या यू ट्यूब चॅनलवर https://youtube/gPHbtqCsTbc वर प्रसारित होणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.