नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ ही योजना राज्यात राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इच्छुक स्वंयसेवी संस्थेनी ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ सुरु करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगांवकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.