नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यात शिथिल करण्यात आलेले निर्बंध व मुभा देण्यात आलेल्या बाबीसंदर्भातील आदेश कायम ठेवीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी संचारबंदीस (लॉकडाऊन) 31 डिसेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेशित केले आहे. आदेशाचे उल्लंघान करणाऱ्याविरोधात  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.